![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Wheat Crop : नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका, गव्हाची शेती बहरली; उत्पादनात वाढ होणार
Wheat Crop : नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका आहे. हे वातावरण गव्हाच्या पिकासाठी पोषक आहे.
![Wheat Crop : नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका, गव्हाची शेती बहरली; उत्पादनात वाढ होणार Agriculture News Favorable environment for wheat crop in Nandurbar district Wheat Crop : नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका, गव्हाची शेती बहरली; उत्पादनात वाढ होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/9f04bd6cf3ad6e0c409c0526060ee50f1675399089814339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Wheat Crop News : सध्या वातावरणात सातत्याने बदल (Climate Change) होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. गेल्या आठवडाभरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे गव्हाच्या (Wheat) पिकावर मावा थिप्स यासारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळं गव्हाचे पीक धोक्यात आले होते. मात्र त्यानंतर वातावरण निरभ्र झाल्यानंतर थंडीचा कडाका कायम राहिला असल्याने गव्हाच्या पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात सर्वत्र गव्हाची शेती बहरली आहे.
गव्हाला दर कायम राहतील याची शाश्वती सरकारने द्यावी
सध्या नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी ढगाळ वातावरणाच्या संकटातून सावरला आहे. जिल्ह्यात सर्वत्र गव्हाची शेती बहरली आहे. त्यामुळं यावर्षी गव्हाचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल. मात्र, बाजारपेठेतील भाव कायम राहण्याची शाश्वती सरकारने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बदलत्या हवामानाचा शेती पिकांना फटका
देशातील शेतकऱ्यांना सातत्यानं विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट शेतकऱ्यांसमोर उभी राहत आहेत. सध्या हवामान बदलाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. देशाच्या विविध राज्यांसह महाराष्ट्रात (Maharashtra) कधी थंडीचा कडाका तर कधी पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसत आहे. गहू, हरभरा, मोहरीनंतर आता कांदा पिकाला देखील वाढती थंडी आणि पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. गतवर्षी खरीप हंगामात पूर आणि पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कापूस सोयाबीन पिकांसह फळबागांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला होता. यामध्ये शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. सध्या देशातील अनेक भागात कडाक्याची थंडी दव आणि पावसामुळे यामुळे पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. बदलत्या वातावरणामुळे आणि पिकांवर पडत असलेल्या रोगराईमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. तसेच उत्पन्नात मोठी घट होत आहे. यामुळं शेतकरी संकटात आर्थिक संकटात सापडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)