एक्स्प्लोर

Maharashtra Weather: राज्यभरात मुसळधार पावसाचा हैदोस; चार दिवसात 21 जणांचा मृत्यू, नांदेडमध्ये सर्वाधिक मृतांची संख्या, बळीराजा आर्थिक संकटात

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात 15 ते 19 या चार दिवसांच्या कालावधीत  21 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून यामध्ये सर्वाधिक 8 जणांचा मृत्यू हा एकट्या नांदेड (Nanded)जिल्ह्यात झाला आहे. 

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना दमदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या चार दिवसापासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी (Rain Weather Alert) पाहायला मिळत आहे. ज्याप्रकारे अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे पुरात वाहून, घर कोसळून,वीज पडून, त्यासोबतच भिंत पडून आतापर्यंत 21 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याचे समोर आलं आहे. तर दहा जण यामध्ये जखमी झाले आहेत.  15 ते 19 या चार दिवसांच्या कालावधीत  21 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून यामध्ये सर्वाधिक 8 जणांचा मृत्यू हा एकट्या नांदेड (Nanded)जिल्ह्यात झाला आहे. 

नांदेड मधील पावसाने मृतांची संख्या 8 वर,शोधकार्य सुरूच

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील 18 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीत हसनाळ या गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे आता पर्यंत 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर मुखेड - उदगीर रस्त्यावरील धडकनाळ येथील पुलावरून एक कार आणि एक ऑटोमधील सात जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. यातील 3 जणांना वाचविण्यात उदगीर अग्निशमन दलाला यश आले असून उर्वरित 4 बेपत्ता जणांपैकी 3 जणांचा मृतदेह सापडले आहेत. चार बेपत्ता व्यक्तींपैकी तीन व्यक्ती मयत झाले असून तिघांचे मृतदेह सापडले आहेत. 

पाच दिवसांमध्ये झालेल्या पावसाने 2745 हेक्टर वरील खरीप पिकांना फटका 

मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बीड जिल्ह्यात उसंत घेतलीय. मात्र पाच दिवसात झालेल्या पावसानं 2745 हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसला आहे. तर दोन जणांसह चार जनावरांचा पुरात मृत्यू झालाय. बीड जिल्ह्यात 14 ऑगस्ट पासून दमदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर आज सकाळी पावसाने उसंत घेतलीय. यादरम्यान 2745 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाचा आहे. 89 गावातील 4907 शेतकऱ्यांचं हे नुकसान झाले आहे. परळी मध्ये पुरात दोघेजण वाहून गेले. तर चार जनावरांचाही मृत्यू झाला. दोन कच्ची घरे, चार पक्की घरे आणि तीन झोपड्यांची पडझड झाली.

तालुका निहाय झालेले नुकसान

- बीड - 250
- गेवराई - 700
- माजलगाव - 200
- केज - 1015
- परळी - 560
- अंबाजोगाई - 20

एकूण 2745 हेक्टरवर हे नुकसान झाले आहे. दरम्यान पाच दिवसांमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

आणखी वाचा

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget