एक्स्प्लोर

दुष्काळात तेरावा! पुराचे अश्रू पुसेपर्यंत पुन्हा पाऊस कोसळला; लातुरात 3 पूल पाण्याखाली, रस्ते ठप्प, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Latur Rain: रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Latur News:लातूर जिल्ह्यात पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत रात्रभर मेघगर्जनेसह पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे अनेक रस्ते, पूल आणि शेतं पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर इतका होता की नागरिकांना घराबाहेर जाणे कठीण झाले असून, रस्त्यांवर वाहतुकीची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. (Latur Flood)

पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प

निलंगा तालुक्यातील उस्तुरी, टाकळी आणि बडूर मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. सांगवी, जेवरी, अंबुलगा बुद्रुक तसेच निलंगा ग्रामीण भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. लातूर ग्रामीणमधील मुरुड आणि परिसरातील अनेक भागांतही सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. नागरिकांनी रस्त्यावर जाण्यापासून स्वत:ला वाचवले तर काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याचे अहवाल देखील मिळाले आहेत.

पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा

रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाने पावसामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नदी-नाले ओलांडताना आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून सावधगिरी बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे.

पाच दिवसांच्या उन्हामुळे शेतकऱ्यांनी शेतीकामांना वेग दिला होता. अनेकांनी सोयाबीन काढणीस सुरुवात केली होती. मात्र, या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावर पुन्हा एकदा पावसाने पाणी फेरल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

नदी-नाल्यांना पूर ,जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागांत पाणी रस्त्यांवर येऊन वाहतुकीला पूर्णतः अडथळा निर्माण केला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, आपत्कालीन मदतीसाठी प्रशासनाचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी आणि प्रवासी सर्वच चिंता व्यक्त करत आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळून सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे, कारण अजून काही तास पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन सातत्याने नजर ठेवत आहे आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी तत्पर आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
Embed widget