एक्स्प्लोर

Sangli News: कृष्णा नदीत सोडण्यात आलेल्या मळीमिश्रीत पाण्याने मगरीच्या पिलांची दमछाक

Sangli News: मळीमिश्रीत पाण्यामुळे नदीतील पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे. यातील एक मगरीचे पिल्लू, तर मळीच्या फेसात अत्यंत अत्यवस्थ असल्याचे काही प्राणिमात्रांना दिसून आले.

Sangli News: सांगलीत कृष्णा नदीत सोडण्यात आलेल्या मळीमिश्रीत पाण्याने मगरीच्या पिलांची दमछाक होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर येथे नदी पात्रात दोन दिवसांपूर्वी मळीमिश्रीत पाणी सोडल्याचे दिसून आले होते. आता या मळीमिश्रीत पाण्यामुळे नदीतील पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे. यामुळं नदीतील मगरीची पिल्लंही पाण्याबाहेर पडताना दिसत आहेत. यातील एक मगरीचे पिल्लू, तर मळीच्या फेसात अत्यंत अत्यावस्थ असल्याचे काही प्राणिमात्रांना दिसून आले. यातून मळीमिश्रीत पाण्यामुळे मगरीच्या पिल्लांचाही जीव धोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे. 

साखर कारखान्यांनी पाण्यात मळी सोडल्याने शनिवारपासून (8 जुलै) नदीकाठावर फेस जमा झाल्याचे पहायला मिळत होते. प्रदुषित पाण्यामुळे मगरींच्या पिलांची घालमेल सुरु झाली असून अस्तित्वासाठी काठावर आलेली पिले घारीचे लक्ष बनत आहेत. पलूस तालुक्यातील आमणापूर येथील ग्रामस्थांना मगरीची अनेक पिलं जागोजागी सतत पाणवठ्यावर येऊन बसलेली पहायला मिळत होती. त्यांचा आकार सुमारे अकरा ते बारा इंच होता. या पिलांची प्रदुषित पाण्यामुळे दमछाक झाल्याचे पहायला मिळत होते. या पिल्लांना टिपण्यासाठी चार ब्राह्मणी घारींच्या घिरट्या घिरट्या घालत होत्या. गतवर्षी मळीमिश्रीत पाण्यामुळे जुलैमध्ये लाखो मासे मृत्युमुखी पडले होते. यावर्षी मगरीच्या पिल्लांचा जीवावरही संकट ओढावल्याचे दिसत आहे.

गतवर्षी जुलै महिन्यात मासे तर यंदा मगरींवर संक्रांत आली. दुषित पाण्यामुळे जलचक्र विस्कळीत होत असून, पाणी पिणाऱ्या नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु, याबाबत संबंधित कोणीच तोंड उघडायला तयार नाही. नदीत मळीमिश्रित पाणी सोडणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा, अशी संतापजनक मागणी जोर धरत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कृष्णा नदीमध्ये, काठावर मगरी मृत होण्याचे प्रकार यापूर्वीही झाले आहेत. मासेही वारंवार मृत होतात नदी प्रदुषणाच्या प्रश्नाकडे लक्ष कोण देणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरवर्षी कृष्णा नदीला पहिले पाणी आल्यानंतर काही कारखान्याकडून मळीमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. काही महिन्यांपूर्वी मळीमिश्रित पाणी सोडल्याने अंकली जवळील नदीकाठी मृत माशांचा खच लागला होता. आता पुन्हा मळीमिश्रीत पाणी नदीत सोडले जात असल्याने नदीत केल्या जाणाऱ्या या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा समोर आला असून अशा पध्दतीने नदीत मळीमिश्रीत पाणी सोडणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Embed widget