एक्स्प्लोर

Raju Shetti on Murlidhar Jadhav : मुरलीधर जाधवांची तडकाफडकी उचलबांगडी अन् उद्धव ठाकरेंच्या मातोश्री भेटीवर राजू शेट्टी काय म्हणाले?

Raju Shetti : मुरलीधर जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा जिल्ह्यात राजकीय भूवया उंचावल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) आणि विशेष करून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही (Hatkanangale Lok Sabha Constituency) उमटले. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी या भेटीवर जाहीर नाराजी व्यक्त करताना थेट राजू शेट्टी यांच्यावर तोफ डागली. यानंतर मुरलीधर जाधव यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडूनही कारवाई करण्यात आली आहे.

मुरलीधर जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा जिल्ह्यात राजकीय भूवया उंचावल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरे यांची भेट आणि मुरलीधर जाधव यांच्या हकालपट्टीवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी किंवा महायुती दोन्ही बरोबर जाणार नसल्याचा पुनरुच्चार केला. 

मुरलीधर जाधव यांनी किमान माझी पत्रकार परिषद पाहायला हवी होती

राजू शेट्टी यांनी सांगितले की, मातोश्रीवर झालेली उद्धव ठाकरेंसोबतची बैठक अराजकीय होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागांवर आपलं लक्ष केंद्रित करेल. मुरलीधर जाधव यांनी किमान माझी पत्रकार परिषद पाहायला हवी होती. ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांची काय नाराजी आहे हे मला माहिती नाही. कदाचित शिवसेना पक्षातील हा अंतर्गत प्रश्न असू शकतो. दोन्ही आघाड्यांमध्ये साखर कारखानदार खचाखच भरले आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा अपक्ष लढली आणि जिंकली तशीच निवडणूक यावेळी लढली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

राजू शेट्टींबाबत काय म्हणाले मुरलीधर जाधव? 

मातोश्रीवर राजू शेट्टी यांनी भेट घेतल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी खोचक शब्दात टीका केली होती राजू शेट्टी हा माणूस असा आहे की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत.2014 ला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून, स्वतःचं डिझेल घालून निवडून आणलं होतं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या, भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली आणि हेच राजू शेट्टी भाजपच्या गोटात जाऊन बसले. म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली.

उद्धव साहेबांना माझी विनंती आहे की, पाच वर्षे शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, 19 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय. माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मी लढवला पाहिजे. 2005 ला पक्ष फुटला त्यावेळीसुद्धा आम्ही पक्षासोबत राहिलो. गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी सुद्धा आम्ही साहेब तुमच्यासोबत राहिलो. जयसिंगपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी महामोर्चे काढले, असं जाधव म्हणाले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात

व्हिडीओ

Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
Embed widget