एक्स्प्लोर

Kolhapur News: पावसाने लेट केल्यास 'पाणीदार' कोल्हापुरात 'पाणीबाणी' अटळ; जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 16.78 टीएमसी पाणी

Kolhapur News: कोल्हापुरात नद्यांनी तळ गाठला असतानाच धरणामधूनही गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडण्यात आल्याने धरणांची सुद्धा तीच अवस्था आहे.

Kolhapur News: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मोसमी पावसाने वेळेत आगमन न केल्यास परिस्थिती चिंताजनक होण्याची चिन्हे आहेत. पाणीदार जिल्हा ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये आजघडीला प्रमुख आठ धरणांमध्ये 16.78 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे कोल्हापूरवर पाण्याची टांगती तलवार आहे. नद्यांनी तळ गाठला असतानाच धरणामधूनही गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडण्यात आल्याने धरणांची सुद्धा तीच अवस्था आहे. पाटबंधारे विभागाकडून गेल्या महिनाभरापासून उपसाबंदीच्या माध्यमातून पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचा प्रयत्न केला आहे. 

जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची स्थिती

जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या राधानगरी धरणात केवळ 1.89 टीएमसी पाणी आहे. गतवर्षी याचवेळी 2.38 टीएमसी पाणी होते. दुधगंगा धरणामध्ये 2.08 टीएमसी पाणी असून गतवर्षी याचवेळी 7.02 टीएमसी पाणी होते. तुळशी धरणामध्ये 1.09 टीएमसी पाणी असून गतवर्षी याचवेळी 1.64 टीएमसी पाणी होते. कासारी धरणामध्ये 0.61 टीएमसी पाणी असून गतवर्षी याचवेळी 0.71 टीएमसी पाणी होते. कुंभी धरणामध्ये 1.13 टीएमसी पाणीसाठा असून गेल्यावर्षी 1.27 टीएमसी पाणीसाठा होता. पाटगाव धरणात 0.92 टीएमसी पाणी असून गेल्यावर्षी 1.34 टीएमसी होते. कडवी धरणात 0.90 पाणी असून गेल्यावर्षी 0.78 टीएमसी होते. वारणा धरणात 8.16 टीएमसी पाणी असून गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये 5.62 टीएमसी होते. 

उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांनी तळ गाठणे नवीन नसले, तरी धरणामधील पाणी असल्याने चिंता करण्यासारखी परिस्थिती नव्हती. यंदा मात्र, या सर्वांना अपवाद झाला असून धरणांची स्थिती सुद्धा चिंताजनक आहे. त्यामुळे मोसमी वेळेत आगमन न केल्यास परिस्थिती आव्हानात्मक होऊ शकते. मे महिन्याचा अखेर येऊनही धरणातील पाण्याचा शेतीसाठी उपसा सुरु आहे. दुसरीकडे, शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी नऊ फुटांवर आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यावर मर्यादा आल्याने नदीकाठच्या गावांचे पावसाकडे लक्ष लागले आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली, तरी तापमानामुळे नद्यांच्या पाणी पातळीवर फारसा फरक पडलेला नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धाBadlapur Case : चिमुकलीच्या कुटुंबाचं एन्काउंटरवरून फायरिंगMalad Bridge Inauguration : उद्घाटनाचा मुद्दा; काँग्रेस भाजपात राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget