एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यातील धामणी नदीवरील बळपवाडी ते पाटीलवाडी दरम्यानचा बंधारा वाहून गेला; लाखो रुपयांचे नकुसान 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी (Radhanagari) तालुक्यातील धामणी नदीवरील (Dhamani River) बळपवाडी ते पाटीलवाडी दरम्यान शेतकऱ्यांनी घातलेला मातीचा बंधारा (Dhamani Bandhara) वाहून गेला आहे.

Kolhapur News :  कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी (Radhanagari) तालुक्यातील धामणी नदीवरील (Dhamani River) बळपवाडी ते पाटीलवाडी दरम्यान शेतकऱ्यांनी घातलेला मातीचा बंधारा (Dhamani Bandhara) वाहून गेला आहे. पाण्याच्या प्रचंड आलेल्या दाबामुळे आज सकाळी 7 वाजता हा बंधारा  वाहून गेला. त्यामुळे नजीक असणाऱ्या शेतीमध्ये पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बंधारा फुटण्याला पाटबंधारे विभाग पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.

धामणी नदीवर मातीचे बंधारे घालण्याचे काम 

दरम्यान, म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील धामणी नदीवर शेतकरी स्वखर्चातून मातीचे बंधारे घालण्याचे काम करत आहेत. धामणी नदीवर 9 ठिकाणी असे बंधारे घालण्याचे काम सुरू आहे. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी असे मातीचे बंधारे येथे दरवर्षी घातले जातात. राई (ता. राधानगरी) येथील धामणी प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात धामणी नदी कोरडी पडते. येथे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळे चौके ते पनोरेपर्यंत नऊ ठिकाणी धामणी नदीवर शेतकरी स्वखर्चातून मातीचे बंधारे घालतात. यासाठी लाखो रुपये शेतकरी स्वतः जमा करतात. 

जेसीबीच्या सहाय्याने 5 दिवस स्वतः राबून असे बंधारे घातले जातात. परिसरात उसासह अन्य पिके घेतली जातात. पावसाळ्यानंतर धामणी नदी चार महिने दुथडी भरून वाहते. मात्र मेमध्ये धामणी नदी कोरडी पडते. त्यामुळे शेतकरी दरवर्षी लाखो रुपये स्वखर्चातून मातीचे बंधारे घालतात. 

कोल्हापूर पद्धतीतील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम 3 महिन्यातच गेले वाहून

दरम्यान, म्हासुर्ली-चौधरवाडी दरम्यानच्या पाटबंधारे विभागाच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची मे महिन्याच्या अखेरीस केलेली दुरुस्ती पावसाळ्यातील अवघ्या दोन-तीन महिन्यातच वाहून गेली आहे. नोव्हेंबर महिन्यात मातीचा बांध घालताना शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने पाटबंधारे विभागाच्या निकृष्ट कामाचा पंचनामा झाला आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. 

संबंधित सर्वच बंधाऱ्याच्या कामाची तसेच अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. धामणी खोऱ्याला स्वातंत्र्यपूर्व काळापासून तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यात गेल्या 22 वर्षापासून धामणी प्रकल्प रखडल्याने उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा होत नाही. पाटबंधारे विभागाने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी धामणी खोऱ्यात कोनोली- शेळोशी, म्हासुर्ली - चौधरवाडी, भित्तमवाडी - गवशी, पणोरे - हरपवडे, आंबर्डे - वेतवडे गावाच्या दरम्यान धामणी नदीवर 25 ते 40 वर्षांपूर्वी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत. मात्र, बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट झाल्याने अपेक्षित पाणीसाठा होत नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका

व्हिडीओ

Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
Ajit Pawar & Satej Patil: पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले....
Pune Election: पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले....
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
BMC Election 2026: मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
Embed widget