एक्स्प्लोर

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस, उपचार घेण्यास दिला नकार; सरकारच टेन्शन वाढलं

Manoj Jarange : जोपर्यंत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

जालना (आंतरवाली सराटी) : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange) अमरण उपोषणाला बसले आहेत. कालपासून (10 फेब्रुवारी) मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) आपलं उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंतचे सर्वात कठोर उपोषण करणार असल्याचे देखील जरांगे यांनी म्हटले आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटी ते मुंबई असा आंदोलन केले. आंदोलन वाशीला पोहोचताच सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगेसोयरेचा अध्यादेश काढला. तसेच, पुढील पंधरा दिवसात या अध्यादेशाची अंमलबजावणी होणार असल्याचे देखील सरकारकडून सांगण्यात आल्याचे मनोज जरांगे म्हणाले होते. मात्र 9 फेब्रुवारीला सरकारची मुदत संपली असून, या अध्यादेशाची अजूनही अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप जरांगे यांच्याकडून करण्यात आला आहे. आता याच मागणीसाठी जरांगे चौथ्यांदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण करत आहे. 

ना पाणी ना उपचार घेणार...

सगेसोयरे अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र या उपोषणादरम्यान आपण ना पाणी पिणार आहोत, ना कोणते उपचार घेणार आहोत अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. तर, दुसरीकडे अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जरांगे यांची भेट घेऊन उपचार घेण्याची विनंती केली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाची ही विनंती जरांगे यांनी धुडकावून लावत, आपण कठोर उपोषण करणारच अशी भूमिका घेतली आहे. 

सरकारने फसवणूक करू नये...

शनिवारपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. ठरल्याप्रमाणे सरकारची अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मुदत 9 फेब्रुवारी रोजी संपली आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करावी. सोबतच आंतरवाली सराटीसह राज्यभरात मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारकडून देण्यात आला होता. मात्र, अजूनही हे गुन्हे मागे घेण्यात आले नाही. तसेच, राज्यभरात सापडत असलेल्या मराठा कुणबी नोंदी ग्रामपंचायत वर लावण्याचा देखील शब्द सरकारने दिला होता. मात्र, याबाबत देखील कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. काही मोजक्याच ग्रामपंचायतमध्ये अशी यादी लावण्यात आल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे सरकारने आमची फसवणूक करू नाही, असा थेट इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

माझ्यासोबत घातपाताचा प्रकार,अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न; मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
Pune : थांबा! मुख्यमंत्री नव्हे, पोलीस आयुक्त येताहेत; अमितेश कुमार येणार म्हणून पुण्यात रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सुरू
थांबा! मुख्यमंत्री नव्हे, पोलीस आयुक्त येताहेत; अमितेश कुमार येणार म्हणून पुण्यात रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सुरू
Video: ‘ये ना पुन्हा’... ‘प्रेमाची गोष्ट 2’ चित्रपटातील रोमँटिंक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव
Video: ‘ये ना पुन्हा’... ‘प्रेमाची गोष्ट 2’ चित्रपटातील रोमँटिंक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव
अनुकंपाधारक अन् MPSC च्या उमेदवारांना नियुक्तीपत्र, तारीख ठरली; 10,309 जणांना सरकारी नोकरी
अनुकंपाधारक अन् MPSC च्या उमेदवारांना नियुक्तीपत्र, तारीख ठरली; 10,309 जणांना सरकारी नोकरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100th Foundation Day : हेडगेवार ते भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष; पाहा संपूर्ण प्रवास
RSS Centenary Celebrations | नागपूरच्या Reshimbag मध्ये 21 हजार स्वयंसेवकांचे प्रात्यक्षिक, जय्यत तयारी
Kamaltai Gawai संघाच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई जाणार नाहीत
Bhagwangad Land | भगवानगड ट्रस्टला 4 हेक्टर वन जमीन, CM Fadnavis यांची घोषणा
Ravindra Dhangekar निलेश घायवळ प्रकरणावरुन चंद्रकांत पाटील गप्प का? रवींद्र धंगेकरांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
Pune : थांबा! मुख्यमंत्री नव्हे, पोलीस आयुक्त येताहेत; अमितेश कुमार येणार म्हणून पुण्यात रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सुरू
थांबा! मुख्यमंत्री नव्हे, पोलीस आयुक्त येताहेत; अमितेश कुमार येणार म्हणून पुण्यात रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सुरू
Video: ‘ये ना पुन्हा’... ‘प्रेमाची गोष्ट 2’ चित्रपटातील रोमँटिंक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव
Video: ‘ये ना पुन्हा’... ‘प्रेमाची गोष्ट 2’ चित्रपटातील रोमँटिंक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव
अनुकंपाधारक अन् MPSC च्या उमेदवारांना नियुक्तीपत्र, तारीख ठरली; 10,309 जणांना सरकारी नोकरी
अनुकंपाधारक अन् MPSC च्या उमेदवारांना नियुक्तीपत्र, तारीख ठरली; 10,309 जणांना सरकारी नोकरी
मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, Y B सेंटरमधील भेटीने राजकारण ढवळलं
मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, Y B सेंटरमधील भेटीने राजकारण ढवळलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 ऑक्टोबर 2025 | बुधवार
Gold Rate: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय, सोन्याचा भाव किती? गतवर्षी किती होता, पुण्यातील सराफ सांगतात
दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय, सोन्याचा भाव किती? गतवर्षी किती होता, पुण्यातील सराफ सांगतात
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या या ताज्या सर्वेक्षणामुळे भाजप आणि नितीशकुमारांची झोप नक्की उडणार! आकडे खरे ठरल्यास मोठा उलटफेर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या या ताज्या सर्वेक्षणामुळे भाजप आणि नितीशकुमारांची झोप नक्की उडणार! आकडे खरे ठरल्यास मोठा उलटफेर
Embed widget