एक्स्प्लोर

Manoj Jarange : नोंदी मिळालेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देणार, सरकारचे मनोज जरांगेंना आश्वासन, जरांगे मात्र मुंबईतील आंदोलनावर ठाम

Maratha Reservation : आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन मुंबईला जाऊ, नाही मिळालं तर ते घेण्यासाठी जाऊ, पण मुंबईला जाणारच असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. 

जालना: ज्या 54 लाख कुणबी नोंदी (Kunbi Certificate) सापडल्या आहेत त्यांना 20 जानेवारीपर्यंत प्रमाणपत्र द्या, आरक्षण (Maratha Reservation) मिळालं तर गुलाल घेऊन मुंबईला जाऊ आणि नाही मिळालं तर ते घेण्यासाठी मुंबईला जाऊ असं सांगत आपल्या मुंबईच्या आंदोलनावर ठाम असल्याचं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी स्पष्ट केलं आहे. तर नोंदी मिळालेल्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांना मराठा आरक्षणाचा नवीन मसूदा दिला. 

आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी मनोज जरांगेंची भेट घेत त्यांना मराठा आरक्षणाचा नवा ड्राफ्ट सादर केला आहे. नव्या ड्राफ्टनुसार कुणबी नोंदी आढळलेल्या रक्ताच्या नात्यातील सग्यासोयऱ्यांना तसंच इतर मागासवर्गीयांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलंय. तर सरकारने दिलेल्या मसुद्याचा अभ्यास करु असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. तसंच 54 लाख नोंदी मिळालेल्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र दिले तर गुलाल घेऊन मुंबईला जाऊ अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे आपल्या मुंबई दौऱ्यावर ठाम आहेत हे स्पष्ट झालंय. 

जरांगेंनी मुंबईला येऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील 

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी येत्या 22 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांचे नियोजनही सुरू झालं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेणार असल्याचं या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. 

त्याचाच एक भाग म्हणून आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे हे नवीन मसुदा मंगळवारी अंतरवाली सराटी येथे आले आणि त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. 

नवीन मसूदा जरांगेंना दिला 

बच्चू कडू यांच्याकडून एक अधिसूचनेचा मसूदा मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. आता जरांगे त्यांच्याकडून त्यावर अभ्यास करण्यात येणार आहे. या सर्व बाबी वेळेत करता आल्या असत्या असं म्हणत ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत अशा 54 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं तातडीने वाटप करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. 

कुणबी नोंदी आढळलेल्या रक्त संबंधांतील सोयऱ्यांना, स्व जातीतील विवाह झालेल्या सग्या-सोयऱ्यांना भटक्या,अनुसूचित जाती जमाती तसेच  इतर मागासवर्गीयांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती आहे. बुधवारपासून दोन दिवस शिबीर घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जातीच्या दाखल्याचे अर्ज घेतले जातील. या संबंधी तक्रारीसाठी टोल क्रमांक जाहीर केल्या जाईल असं आश्वासन आमदार बच्चू कडू यांनी दिलं आहे. 

आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन मुंबईला जाऊ

आरक्षण मिळाला तरी मुंबईला जाणार आणि नाही मिळाला तरी मुंबईला जाणार असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. प्रत्येक वेळी तेच लिहून आणतात आणि तेच बदलतात असा आरोपही त्यांनी केला. मनोज जरांगे म्हणाले की, ज्या 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांना लगेच प्रमाणपत्र द्या, त्यांच्या सर्व सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या. प्रमाणपत्र वाटप झाल्याशिवाय मसुद्याला अर्थ नाही. 54 लाख नोंदी मिळालेला सगळ्यांना 20 तारखेच्या आत प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागणार आहेत, तर तुमच्या मसुद्यावर आम्ही विचार करू, आरक्षण मिळाला तरी मुंबईला जाणार आणि नाही मिळालं तरी मुंबईला जाणार. आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, नाही मिळालं तर आम्ही आरक्षण आणायला मुंबईला जाऊ.

ही बातमी वाचा: 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget