एक्स्प्लोर

Nari Shakti : भारतीय राजकारणातील प्रभावी महिला, ज्यांच्याशिवाय भारताचे राजकारण पूर्ण होत नाही

Nari Shakti : भारतात अनेक महिलांनी आपल्या कर्तुत्वाने वेळोवेळी राजकीय आयाम बदलले आहेत. यात प्रतिभाताई पाटील या देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या. तर इंदिरा गांधी यांनी पंदप्रधान पदी असताना आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने 1971 च्या युद्धात पाकिस्तानला धुळ चारली होती.

Women politicians who made an impact :  राजकारणातील महिलांच्या कर्तृत्वाचा इतिहास वेळोवेळी साक्षीदार आहे. मेरी अँटोइनेटपासून राणी एलिझाबेथपर्यंत, जगभरातील महिलांनी गरज पडेल तेव्हा अनेकदा राजकीय राजदंड आपल्या हातात घट्ट धरला आहे. भारताने वेळोवेळी अशा प्रभावशाली महिला राजकीय व्यक्ती पाहिल्या आहेत. त्यांच्या योजना आणि राजकीय वैशिष्ट्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे. देशाच्या विकासातील त्यांचे योगदान कधीही नजरेआड करता येणार नाही. भारतात अनेक महिलांनी आपल्या कतृत्वाने वेळोवेळी राजकीय आयाम बदलले आहेत. यात प्रतिभाताई पाटील या देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या. तर इंदिरा गांधी यांनी पंदप्रधान पदी असताना आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने 1971 च्या युद्धात पाकिस्तानला धुळ चारली होती. अशा अनेक महिलांच्या कर्तृत्वाने ही भारत भूमी पावन झालीय.   

सुचेता कृपलानी  
सुचेता कृपलानी या एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होत्या. उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून कृपलानी यांनी काम पाहिले. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या 15 महिलांमध्ये त्या एक होत्या. अरुणा असफ अली आणि उषा मेहता यांच्याप्रमाणेच त्या भारत छोडो आंदोलनादरम्यान आघाडीवर होत्या. फाळणीच्या दंगलीत त्यांनी महात्मा गांधींसोबत काम केले.  

भारताच्या संविधान सभेसाठी निवडून आलेल्या काही महिलांपैकी त्या एक होत्या. त्या कानपूर मतदारसंघातून उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्या होत्या. तसेच भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या उपसमितीचा भाग होत्या. 1940 मध्ये त्यांनी ऑल इंडिया महिला काँग्रेसची स्थापना केली. 1942 ते 1944 या काळात स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून आंदोलन केले. 1944 ला त्यांना अटक करण्यात आली.  1948 मध्ये विधानसभेसाठी पहिल्यांदा त्या निवडून आल्या. संसदेमध्ये 'वंदे मातरम' गाण्याचा पहिला मान सुचेता कृपलानींना मिळाला.
 
इंदिरा गांधी 
इंदिरा गांधी अगदी सुरुवातीपासूनच स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होत्या. बालपनीच त्यांनी 'बाल चरखा संघा’ची स्थापना केली होती. इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात सभाग घेतल्यामुळे सप्टेंबर 1942 मध्ये त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. 1947 मध्ये त्यांनी गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील दंगलग्रस्त भागात काम केले.

1958 मध्ये त्यांची काँग्रेसच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या उपाध्यक्षा आणि 1956 मध्ये अखिल भारतीय युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिला विभागाच्या अध्यक्षा झाल्या. 1959 ते 1960 या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होत्या.  

1966-1964 या काळात त्या माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या. त्यानंतर जानेवारी 1966 ते मार्च 1977 या काळात त्या भारताच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी 5 सप्टेंबर 1967 ते 14 फेब्रुवारी 1969 पर्यंत परराष्ट्र मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. इंदिरा गांधी यांनी जून 1970 ते नोव्हेंबर 1973 पर्यंत गृह मंत्रालयाचा कारभार सांभाळला. जानेवारी 1980 पासून त्या नियोजन आयोगाच्या अध्यक्षा होत्या. 14 जानेवारी 1980 रोजी त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. 

इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान आहेत. हरितक्रांती, खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण, सिमला करारामुळे बांगलादेशचे उदारीकरण, अवकाशात पहिला माणूस पाठवणे आणि परकीय धोरणे सुलभ करणे यातून त्यांचे नेतृत्व दिसून येते. 1984 ला इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. 

सोनिया गांधी
राजीव गांधी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर सोनिया गांधी यांनी भारतातच राहणे पसंत केले. पंतप्रधानपदी असताना राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर देखील त्यांनी भारत सोडण्याचा विचार केला नाही. एवढेच नाही तर काँग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर घेत आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिले. काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांचा कार्यकाळ त्यांच्या शतकानुशतकांच्या इतिहासातील सर्वात मोठा आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्ष पदही सोनिया गांधी यांनी भूषवले. 

प्रतिभाताई पाटील 

प्रतिभाताई पाटील हे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्या स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. या व्यतिरिक्त राजस्थान च्या माजी राज्यपाल, राज्यसभा सदस्य आणि महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील त्यांनी आपली सेवा दिलीये.

सुषमा स्वराज
भारतीय जनता पक्षाच्या कुशाग्र नेत्यांमध्ये सुषमा स्वराज यांचे नाव नेहमीच घेतले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी अधिवक्ता सुषमा स्वराज नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सरकारमध्ये भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री होत्या. इंदिरा गांधींनंतर हे पद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. त्या सात वेळा खासदार आणि तीन वेळा विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या.  13 ऑक्टोबर 1998 पासून त्यांनी दिल्लीचे 5 वे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली होती. आपल्या यशस्वी राजकीय कारकिर्दीच्या दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी 2019 ची निवडणूक लढविण्यास नकार दिला. 6 ऑगस्ट 2019 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांनी काम पाहिले.  त्यांनी राज्यातील 34 वर्षीय डाव्या आघाडीच्या सरकारचा पाडाव केला. त्या देशाच्या पहिल्या महिला रेल्वे मंत्रीही होत्या. 1997 मध्ये त्यांनी पश्चिम बंगालमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. सध्या देखील त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी आहेत. 

शीला दीक्षित 

शीला दीक्षित या काळात दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या आहेत. दीक्षित यांनी काँग्रेसला राजधानीत सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला आहे. 11 मार्च 2014 रोजी त्या केरळच्या राज्यपाल झाल्या. त्यानंतर 25 ऑगस्ट 2014 रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. 

जयललिता 
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सलग पाच वेळा जयललिता यांनी धुरा सांभाळली. 'अम्मा' उर्फ ​​ जयललिता यांनी तामिळनाडूमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट देणाऱ्या आणि लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या एका महान राजकारण्यापूर्वी ती एक यशस्वी अभिनेत्री होत्या. 

1883 मध्ये जयललिता यांना AIADMK च्या प्रचार सचिव बनवण्यात आले, पण जयललिता यांच्या वेगवान इंग्रजीचा प्रभाव असलेल्या एमजी रामचंद्रन यांना त्यांना राज्यसभेचे सदस्य बनवायचे होते. एमजीआर यांच्या मृत्यूनंतर जयललिता यांनी AIADMK ताब्यात घेतला आणि 1991 मध्ये प्रथमच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. 25 वर्षे राज्य करणाऱ्या जयललिता यांची लोक पूजा करत असत. 5 डिसेंबर 2016 मध्ये त्यांचे निधन झाले. 

मायावती  
 मायावती यांना भारतातील सर्वात शक्तिशाली दलित नेत्या मानले जाते. त्यांनी चार वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद भुषवले आहे. सध्या त्या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आहेत. भारतातील सर्वात तरुण महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या दलित मुख्यमंत्री होण्याचे श्रेयही मायावतींनाच जाते. राजकीय सत्तेत त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी त्या शिक्षिका होत्या. 

शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांची भेट काशीराम यांच्याशी झाली, त्यामुळे मायावतींचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. काशीराम यांचा प्रभाव पाहून मायावतींच्या वडिलांना आनंद झाला नाही. त्यांच्या वडिलांनी काशीराम यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास नकार दिला, परंतु मायावतींनी वडिलांचे म्हणणे एकले नाही. काशीराम यांच्या  सामाजिक कार्यात त्या सहभागी झाल्या. तेथूनच त्यांच्या राजकीय जीवनाला सुरूवात झाली आणि पुढे चार वेळा त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या.

वसुंधरा राजे 
राजघराण्याची पार्श्वभूमी असलेल्या वसुंधरा राजे यांनी दोन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्या केंद्रात मंत्रिपदावर देखील होत्या. राजस्थानमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन आहे.

सुप्रिया सुळे
लोकसभा खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. भारतीय राजकारण्यांच्या नव्या पिढीचा त्या एक प्रमुख भाग आहे. पवार यांच्या जागी राष्ट्रवाच्या अध्यक्षपदी सुप्रिया येतील, असा अनेकांचा विश्वास आहे. 

सुप्रिया सुळे यांनी 2011 मध्ये स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध राज्यव्यापी मोहीम सुरू केली. त्यासाठी त्यांना ऑल लेडीज लीगतर्फे मुंबई महिला ऑफ द डिकेड अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांनी काही काळ पत्रकार म्हणून देखील काम केले आहे. 

सुप्रिया सुळे 2006 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या. त्यानंतर आतापर्यंत त्यांचा एकही पराभव झाला नाही. त्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

1 सप्टेंबर 2014 रोजी, त्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, सल्लागार समिती, वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि 2014 साठी भारतीय संसदीय गटाच्या कार्यकारी समितीच्या स्थायी समितीच्या सदस्य बनल्या. 11 डिसेंबर 2014 रोजी नफा कार्यालयांवर संयुक्त समितीची सदस्य बनल्या. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात

व्हिडीओ

Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
Embed widget