एक्स्प्लोर

BSF Jawan Return: पाकिस्तानच्या कैदेतून परतलेल्या बीएसएफ जवानाची नोकरी जाणार? काय आहेत प्रोटोकॉल?

BSF Jawan Return: चुकून पाकिस्तानात पोहोचलेल्या बीएसएफ जवानाला पाकिस्तानने 20 दिवसांनंतर सोडण्यात आलं आहे. आता सैनिक आता आपली नोकरी गमावेल का, किंवा त्याच्यासाठी काय प्रोटोकॉल आहे याबाबतचे प्रश्न उपस्थित होत आहेत.

BSF Jawan Return: भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान, बीएसएफ जवान पी.के. साहू चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, 23 एप्रिल रोजी, ते सीमा ओलांडून गेले आणि पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले. सुमारे 20 दिवसांनंतर, पाकिस्तानने त्यांना अटारी वाघा सीमेवरून भारतात परत पाठवले. पण चुकून सीमा ओलांडून भारतात परतणाऱ्या सैनिकाच्या शिष्टाचाराचे काय नियम आहेत? त्यांना नोकरी गमवावी लागू शकते का? चला याबद्दल जाणून घेऊया.

अभिनंदन यांच्या वेळी कोणते प्रोटोकॉल पाळले?

चुकून सीमा ओलांडणाऱ्या लष्करी जवानाला भारतात परतताना काही नियमांचे पालन करावे लागते. विंग कमांडर अभिनंदन यांच्या उदाहरणावरून हे समजू शकते, जेव्हा बालाकोट एअरस्ट्राइक दरम्यान पाकिस्तानचे एफ-16 लढाऊ विमान पाडून मिग-21 भारतात परतत होते, तेव्हा विंग कमांडर ज्या मिग-21 ला उडवत होते, ते क्रॅश झाले. हे विमान पाकिस्तानी सीमेत 10-12 किलोमीटर आत कोसळले. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने कैद केले होते.

भारत सरकारने त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, त्यानंतरच विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने पूर्ण सन्मानाने भारतात पाठवून दिले. पण ते भारतात आल्यानंतर त्यांना काही वेळ भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी दिला जातो. 

नोकरीवरून काढलं जातं का?

अशा घटनेनंतर, पाकिस्तानातून परतणाऱ्या कोणत्याही सैनिकाची नोकरी काढून घेतली जात नाही, परंतु काही दिवसांसाठी त्याला कोणत्याही ऑपरेशनमध्ये तैनात केले जात नाही. हे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी केले जाते. जेणेकरून जेव्हा ते पूर्णपणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरे होतील तेव्हा ते त्यांच्या कर्तव्यावर परत येऊ शकतील. परंतु शेजारच्या देशात अडकल्यानंतर, त्यांच्या देशात परतल्यावर त्यांना ताबडतोब ड्युटीसाठी बोलावले जात नाही.

नेमकं काय घडलं होतं?

 काही दिवसांपूर्वी पूर्णम कुमार शॉ  यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती आणि ते पाकिस्तानमध्ये गेले होते. त्याठिकाणी पाकिस्तानी सैन्याने पी.के. शॉ यांना ताब्यात घेतले होते. मध्यंतरीच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर युद्ध (India Pak War) सुरु झाले होते. त्यामुळे पी.के. शॉ   पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. पाकिस्तानने त्यांना 23 एप्रिल रोजी पकडले होते. मात्र, आता भारतासोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तानने त्यांना सोडले आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता अमृतसर येथील अटारी बॉर्डरवरुन पी.के. शॉ माघारी परतले. भारत-पाक सीमारेषेवर शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी भारतीय सैन्याने बीएसएफचे दोन जवान तैनात केले होते. फिरोजपूरमध्ये 23 एप्रिलला जवान पी.के. शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती. ही गोष्ट पाकिस्तानी सैन्याच्या लक्षात आल्यानंतर पाक रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील सगळी शस्त्रात्रं जप्त करुन पाकिस्तानने गेल्या 20 दिवसांपासून त्यांना ताब्यात ठेवले होते.

23 एप्रिलला नेमकं काय घडलं होतं?

नियंत्रण रेषेवर शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन शेती करायला दिला जाते. पी.के. शॉ  यांना शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी फिरोजपूर येथे तैनात करण्यात आले होते. पीकांची पेरणी करताना आणि काढणी करताना बीएसएफ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी व निगराणीसाठी तैनात असतात. या शेतकऱ्यांना विशेष किसान कार्डही दिले जाते. या झिरो लाईनवर फक्त खांब बसविण्यात आले असून कुंपण रेषा त्याअगोदरच आहे. 23 एप्रिलला सकाळी सकाळी शेतकरी कंबाइन घेऊन फेंसिंगवरील गेट नंबर-208/1 च्या रस्त्याने शेतातील गहू काढणीसाठी शेतकरी गेले होते. पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपणरेषा लावलेली नाही. त्यामुळे झिरो लाईन पार करुन पी.के. शॉ  ऊन्हापासून दिलासा मिळविण्यासाठी एका झाडाखाली बसायला गेले होते. मात्र, ती जागा पाकिस्तानच्या हद्दीत होती. तेवढ्यात पाकिस्तानी रेंजर्स जल्लोके बीएसएफ चेक पोस्टवर पोहोचले. त्यानंतर, त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफचे जवान पी.के. शॉ  यांना ताब्यात घेतले होते. ही गोष्ट समजल्यानंतर भारताने पी.के. शॉ  यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बॉर्डरवर धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी पी.के. शॉ  यांची सुटका होऊ शकली नव्हती.

जवानांना परत पाठवण्याचा नियम

पी के साहू भारतात परतल्यानंतर आंतरराष्ट्रीय नियमांची चर्चा सुरु झाली आहे. जगभरात अनेक देशात जवानांना परत पाठवण्याचे नियम आहेत. जर एखाद्या जवानाने चुकून सीमा ओलांडली असेल तर त्याला परत पाठवलं जातं. एकीकडे भारत-पाकिस्तान दोन्ही देशाचे जवान एकमेकांवर फायरिंग करत असताना, अशा जवानांना जिवंत परत पाठवणं आश्चर्यकारक वाटू शकतं. पण जर सैनिकाने सरेंडर केलं असेल, तो विनाशस्त्र असेल किंवा शस्त्र न चालवता शरण आला असेल तर अशा जवानांना परत पाठवलं जातं. हे सर्व जिन्हिवा करारानुसार दोन्ही देशांनी मान्य केलं आहे. युद्धजन्य स्थिती असो वा तणावाची स्थिती, अशा परिस्थितीत जवानांना परत पाठवणं दोन्ही देशांना मान्य करावंच लागतं. 

जिन्हिवा करारानुसार युद्धातील क्रूरतेला आळा घालणे, नागरिकांचं रक्षण करणं, युद्धात जखमी झालेल्या जायबंदी सैनिकांशी योग्य व्यवहार करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या देशाचा नागरिक किंवा जवान जर जखमी अवस्थेत सापडला तर त्याला तात्काळ उपचार देणे गरजेचं आहे. तसंच योग्य वेळेनंतर त्यांना त्या त्या देशात पाठवावं लागतं.  

आंतरराष्ट्रीय करारांनुसार आणि मानवाधिकारांच्या तत्वांनुसार, जर एखादा जवान चुकून (उदा. खराब हवामान, दिशाभूल, किंवा प्रशिक्षणादरम्यान) सीमारेषा ओलांडून दुसऱ्या देशात गेला, तर अशा परिस्थितीत त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया शक्य असते.

जवानांना परत पाठवण्याची प्रक्रिया कशी?  

ओळख पटवली जाते : संबंधित जवानाची ओळख आणि हेतू चुकून सीमापलिकडे गेल्याची खातरजमा केली जाते.

ध्वज बैठक (Flag Meetings) : भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'फ्लॅग मीटिंग्स' घेतल्या जातात, जिथे दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी संवाद साधतात.

शांततामय मार्गाने सुटका : जर जवान चुकून गेला आहे आणि त्याच्याकडे कोणताही गुप्त हेतू नव्हता, हे स्पष्ट झालं  तर त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु होते.

विलंब : परत पाठवण्यामध्ये काही वेळ लागतो, कारण तपास, राजनैतिक प्रक्रिया आणि संवाद आवश्यक असतो. त्यामुळे या प्रक्रियेला अनेकदा विलंब लागू शकतो

अनेक वेळा भारतीय जवान चुकून LOC (Line of Control) पार करतात आणि पाकिस्तानच्या ताब्यात जातात. अशा वेळी, दोन्ही देशांमधील संवादानंतर अशा जवानांना परत पाठवलं गेलं आहे.

अशाचप्रमाणे पाकिस्तानचे जवान देखील भारतात चुकून आले असतील, तर त्यांनाही परत पाठवण्यात आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar on LPG gas price Hike: एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ, शरद पवारांनी मोदींच्या वक्तव्याचा 'छुपा' अर्थ सांगितला, म्हणाले, 'टप्याटप्याने धक्का बसणार'
एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ, शरद पवारांनी मोदींच्या वक्तव्याचा 'छुपा' अर्थ सांगितला, म्हणाले, 'टप्याटप्याने धक्का बसणार'
Odisha Vigilance Raid : कोट्यवधींची रोकड, 300 ग्रॅमहून अधिक सोनं, 5 इमारती अन् 13 भूखंड...; ओडिशातील अभियंत्याच्या घरावर छापा; संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले
कोट्यवधींची रोकड, 300 ग्रॅमहून अधिक सोनं, 5 इमारती अन् 13 भूखंड...; ओडिशातील अभियंत्याच्या घरावर छापा; संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
LPG Price Hike: घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
EPFO: पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज कधी मिळणार? कोट्यवधी खातेदार दोन महिन्यांपासून वेटिंगवर, बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या  
EPFO: ईपीएफओकडून 8.25 टक्के व्याज दर जाहीर, खात्यात पैसे कधी येणार? पीएफ खात्यातील शिल्लक कशी चेक करायची? 
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
पंतप्रधान मोदींची चाल गेमचेंजर ठरली? फक्त एक आवाहन अन् सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
Embed widget