एक्स्प्लोर

New Motor Vehicles Act | गडकरींच्या कायद्याला भाजपचीच राज्य सरकारं का धुडकावत आहेत?

गडकरींच्या खात्याने तयार केलेल्या कायद्याला त्यांच्याच पक्षाची राज्य सरकारं बिनदिक्कत धुडकावत आहेत. याची सुरुवात केली मोदी-शाह यांच्या गुजरातने.

नवी दिल्ली : केंद्रात बहुमताने सत्तेत असलेल्या पक्षाच्या सरकारने एक कायदा करावा आणि त्याच पक्षाच्या राज्य सरकारांनी मात्र तो धुडकावून लावावा, किंवा त्यात बदल करावा...आजवर देशाच्या राजकारणात जे घडलं नसेल ते सध्या होताना दिसतं आहे. या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे नवा मोटार वाहन कायदा. नितीन गडकरींच्या परिवहन खात्याने महत्प्रयासाने हा कायदा संसदेत मंजूर करुन घेतला. 1 सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली. पण गुजरात, महाराष्ट्र या भाजपचं सरकार असलेल्या राज्यांनीच या कायद्याला ब्रेक लावला आहे.
गडकरींच्या खात्याने तयार केलेल्या कायद्याला त्यांच्याच पक्षाची राज्य सरकारं बिनदिक्कत धुडकावत आहेत. याची सुरुवात केली मोदी-शाह यांच्या गुजरातने. त्यांनी या कायद्यातल्या दंडाची रक्कम निम्म्यावर आणली. गुजरातचं बघून महाराष्ट्रालाही बळ आलं असावं. त्यांनीही निवडणुकीच्या तोंडावर लोकांची नाराजी नको म्हणून या कायद्यालाच स्थगिती दिली. म्हणजे एकीकडे गडकरी संपूर्ण देशातल्या राज्यांना हा कायदा कसा गरजेचा आहे हे दोन वर्षे सांगत होते आणि त्यांच्याच होमग्राऊंडवर हा कायदा लागू झालेला नाही.
महाराष्ट्रात परिवहन खातं शिवसेनेकडे आहे. मंत्री दिवाकर रावतेंनी या कायद्याबद्दल पुनर्विचार करण्याचं पत्र गडकरींना लिहिलं आहे. पण आपण मागे हटणार नाही हे गडकरींनी स्पष्ट केलं आहे.
या कायद्यात वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाची रक्कम कैक पटीने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांच्या नाराजीची भीती सरकारांना वाटत आहे. पण मुळात 1988 ला हा कायदा बनल्यापासून दंडाची रक्कम वाढलीच नाही. त्यामुळे त्यावेळेच्या तुलनेत ही रक्कम वाढायलाच हवी, असा गडकरींचा दावा आहे. शिवाय भारतात दरवर्षी 5 लाख लोक रस्ते अपघाताची शिकार होतात, ज्यात तब्बल दीड लाख मृत्यू पडतात. तासाला 17 अपघात इतका भयानक हा वेग आहे. नियम पाळल्याशिवाय हा आकडा कमी करता येणार नाही असंही त्यांना वाटतं आहे.
संसदेत मंजुरी करण्याआधी सर्वच पक्षांशी सल्लामसलत करण्यात आली होती. सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांचा एक गट स्थापन करुन त्यांच्या सर्व शंका दूर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता अचानक जो विरोध सुरु आहे, त्यापाठीमागे मतपेटीचं राजकारण आहे का, विधानसभा निवडणुका असल्याने महाराष्ट्र सरकारला ही रिस्क घ्यायची नाही का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या कायद्याची अंमलबजावणी सध्या दिल्ली, यूपी, हरियाणा या तीनच राज्यांमध्ये होत आहे. हा विषय समवर्ती सूचीतला असल्याने राज्यांना नियम लागू करायचे की नाही याचं स्वातंत्र्य आहेच. पण कलम 370, तिहेरी तलाकबाबत कठोर निर्णय घेणारं सरकार याबाबत का मवाळ पडत आहे. गडकरींच्या खात्याचं हे विधेयक डावलण्याचं धाडस कुणाच्या परवानगीने होतंय असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.
कायदा कठोर असला की त्याच्या अंमलबजावणीत जास्तीत जास्त भ्रष्टाचार होतो, असा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अभ्यासातला निष्कर्ष आहे. शिवाय भारतीय जुगाडू लोक या नियमांना वळसा घालण्यासाठी नवनवे उपायही शोधत आहेत. पण जो नियम पाळेल, त्याला दंडाची काय भीती ही बेसिक गोष्ट मात्र कोलाहलात विसरुन जात आहे. राजकीय पक्षांनी प्राण जाए, पर वोट न जाए अशी भूमिका घेत नागरिकांच्या या बेशिस्तीला प्रोत्साहनच दिलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
Rahul Gandhi on West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...
Who is Kalita Maji : दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली!
दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली!
West Bengal Election Result 2026: ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये पहिली सीट जिंकवून दिली त्यांनीच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला हद्दपार केलं, धक्कादायक आकडेवारी समोर
ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये पहिली सीट जिंकवून दिली त्यांनीच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला हद्दपार केलं, धक्कादायक आकडेवारी समोर

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
Embed widget