एक्स्प्लोर

अॅट्रॉसिटीबाबत कोर्टाच्या निर्णयाने काय बदललं आणि सरकार काय करतंय?

सरकार असो की विरोधक..दलित व्होटबँकेला दुखावण्याची रिस्क कुणालाही घ्यायची नाही. त्यामुळेच कोर्टाचा हा निर्णय आल्यानंतर राजकारण सुरु झालं.

नवी दिल्ली : अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय फिरवण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे. 20 मार्चला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, त्यावर इतका राजकीय गदारोळ उठला की चार महिन्यांतच सरकारने त्यासाठी नवं विधेयक आणण्यास मंजुरी दिली आहे. सध्या सुरु असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच हे विधेयक सादर केलं जाईल. अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने काय बदललं आणि आता सरकार त्यावर काय करतंय यावर एक नजर टाकूया. - अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतोय ही बाब ग्राह्य धरत सुप्रीम कोर्टाने 20 मार्चला एक महत्वपूर्ण निर्णय दिला - या कायद्यातली तात्काळ अटकेची तरतूद सुप्रीम कोर्टाने रद्द केली - तक्रार दाखल झाल्यानंतर त्याच्या योग्यतेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खातरजमा करुन घेतल्यांतरच अटक व्हावी असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं निर्णय आला आणि दुसऱ्याच दिवसापासून राजकीय गदारोळ सुरु झाला. सरकारने या प्रकरणात आपली बाजू सक्षमपणे मांडली नाही. अॅटर्नी जनरल या प्रकरणी नेमले नाहीत, त्यामुळेच कोर्टाने हा निर्णय दिल्याची टीका विरोधकांनी केली. तर सरकारनेही तातडीने कुठल्याही परिस्थितीत या निर्णयाची अंमलबजावणी होऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलं. सरकार असो की विरोधक..दलित व्होटबँकेला दुखावण्याची रिस्क कुणालाही घ्यायची नाही. त्यामुळेच कोर्टाचा हा निर्णय आल्यानंतर राजकारण सुरु झालं. आरोप प्रत्यारोप करताना दलितांचे खरे कैवारी आपणच असं दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरु होता. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी कोर्टाने हे पाऊल उचललं होतं. पण गैरवापर तर सोडाच आता हा कायदा अजून कडक करण्याचं पाऊल भाजपने उचललं आहे. दलितविरोधी प्रतिमा पुसण्यासाठी याच्यापेक्षा चांगली संधी नाही हे ओळखून भाजपने याबाबतीत कडक पवित्रा घेतला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर अॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यांना बळी पडणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला होता. पण चौकशीसाठी नेमलेला वरिष्ठ अधिकारी सवर्ण असल्यास तो आरोपीला पाठीशी घालणार नाही का, असेही सवाल उपस्थित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या मराठा मोर्चांमधली एक प्रमुख मागणी होती अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची. पण कोर्टाने तसा आदेश दिल्यानंतरही आता ते घडणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर भाजपमधल्याही एका गटात सुंठीवाचून खोकला गेला अशी प्रतिक्रिया होती. कारण भाजपचा मतदार असलेला सवर्ण समाज या कायद्यातल्या कडक तरतुदींवरुन नाराज होता. पण जी दलित व्होटबँक सोबत असल्याने 2014 ला मोदींना सत्ता मिळाली, त्यांना दुखावणं परवडणारं नव्हतं. त्यामुळेच आता हा कायदा कुठल्याही परिस्थितीत कमजोर होऊ देणार नाही, असं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे. कायदा रद्द करा असं तर सुप्रीम कोर्टही म्हणत नव्हतं. त्यांचा कल होता त्याचा गैरवापर रोखण्यावर. पण सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या विवेकी निर्णयावरही राजकारणाचा चिखल कसा ओतला जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
Gas Shortage ECA Act: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
Gas Shortage ESMA: देशभरात गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ESMA कायदा लागू, नक्की काय होणार?
देशभरात गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ESMA कायदा लागू, नक्की काय होणार?
NCERT: 'न्यायपालिकेतील भ्रष्टाचार' प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने फटकारलं, NCERT ने मागितली बिनशर्त माफी; आठवीच्या पुस्तकातील 'तो' धडा पुन्हा लिहिणार
'न्यायपालिकेतील भ्रष्टाचार' प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने फटकारलं, NCERT ने मागितली बिनशर्त माफी; आठवीच्या पुस्तकातील 'तो' धडा पुन्हा लिहिणार

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget