एक्स्प्लोर

Weather : उत्तर भारतात थंडीचा जोर; तर जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा अंदाज, महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला

शुक्रवारी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा थंडी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला आहे.

Weather Update : उत्तर भारतात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा थंडी सुरु झाली आहे. दिल्लीत काल सकाळपर्यंत 10.1 मिमी पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, पुढच्या 24 तासात हवामान निरभ्र राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सूर्यप्रकाश देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, या महिनाअखेरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत वातावरणात थोडीशी थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. शनिवारी दिल्लीत पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती, मात्र दिवसभर पाऊस पडला नाही. मात्र, सायंकाळी अनेक भागात ढग दाटून आले होते.

महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात तापमानात चढ उतार सुरूच आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हळूहळू तपमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, दुसरीकडे, पावसामुळे शनिवारी दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ताही सुधारली आहे. दिल्लीचा AQI 102, फरिदाबादचा 97, गाझियाबादचा 101, ग्रेटर नोएडाचा 88, गुरुग्रामचा 128 आणि नोएडाचा 70 AQI आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे, दिल्लीत शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला होता. आजपासून उत्तर प्रदेशातील हवामान पूर्णपणे कोरडे आणि स्वच्छ असेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज दिवसभर कडक सूर्यप्रकाश राहील आणि तापमानातही वाढ नोंदवली जाऊ शकते. कमाल तापमान पुन्हा एकदा 25 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकते. त्याचबरोबर पावसामुळे राज्यातील हवेची गुणवत्ता निश्चितच सुधारली आहे.

राजस्थान

राजस्थानमध्ये थंडीने निरोप घेतला असून, उष्णतेने जोर दाखवायला सुरुवात केली आहे. येथे गेल्या 24 तासांत कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. जयपूरच्या हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात सीमावर्ती शहर बाडमेर येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

जम्मू आणि काश्मीर

जम्मू आणि काश्मीरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असून, मधूनमधून पावसासह बर्फवृष्टी सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज येथे पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. राज्यात 3 मार्चपर्यंत असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तथापी, हवामान वेळोवेळी स्वच्छ होत राहील, ज्यामुळे थोडासा दिलासा मिळेल. दरम्यान, श्रीनगर विमानतळावरून उड्डाणे सुरू झाली आहेत. तेथे वैष्णोदेवीची यात्राही सुरू आहे. तर आजपासून रेल्वे सेवाही पूर्ववत होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget