एक्स्प्लोर

Shaheed Din : शहीद भगत सिंह यांचे 10 मौलिक विचार, वाचा भगत सिंह काय म्हणाले?

Shaheed Din Bhagat Singh: शहीद भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत दिलेले बलिदान आजही भारतीयांच्या स्मरणात आहे. भगत सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडलेल्या विचारांची प्रांसगिकता आजही कायम आहे.

Shaheed Din Bhagat Singh:  भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संघर्षात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य चळवळीत समाजातील अनेक घटकांनी आपल्या परीने योगदान दिले. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अवघ्या 23 व्या वर्षी भगत सिंह फासावर गेले. भगत सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे स्वातंत्र्यानंतर साध्य करण्यासाठीच्या उद्दिष्टांचा एक कार्यक्रम होता. भगत सिंह यांची वैचारीक भूमिकाही ठाम होती. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या कार्यक्रमातही त्याचे प्रतिबिंब दिसत होते.  

भगत सिंह यांनी बरेच लिखाण केले. काही वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून लेख लिहीले. तर, कारावासात असताना त्यांनी काही लेख लिहिले. हे लेख तत्कालीन परिस्थितीवर असले तरी त्यातील बरेच मुद्दे आजच्या काळातही लागू होत असल्याचे दिसून येते. 

>> जाणून घेऊयात भगत सिंह यांचे 10 मौलिक विचार: 

- क्रांती ही जनतेसाठी असली पाहिजे आणि जनताच पूर्ण करील. संपूर्ण समाजव्यवस्था परिवर्तन करणे म्हणजे क्रांती होय.

- क्रांतीसाठी रक्तपात करणारा आवश्यक नाही आणि क्रांतीत व्यक्तिगत प्रतिहिंसेला स्थान नाही. क्रांती ही बॉम्ब आणि पिस्तुलांची क्रांती नाही. 

- देशातील साहित्याचा प्रवाह ज्या दिशेने वाहतो, नेमक्या त्याच दिशेने तो देश आगेकूच करतो. कोणत्याही मानवजातीच्या उद्धारासाठी उच्च दर्जाच्या साहित्याची आवश्यकता असते. लेखकांनी सामाजिक समस्या, तसेच परिस्थिती यानुसार साहित्य निर्माण केले नाहीतर समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या समाजसुधारक आणि राजकीय नेते यांचे प्रयत्न निष्फळ ठरतील.

- युवकाने ठरवले तर तो मानवजातीचे उद्बोधन करू शकतो. देशाची अब्रू वाचवू शकतो. शोषितांच्या आणि जगाच्या उद्धाराची सूत्रे त्याच्या हाती आहेत. युवक हा जगाच्या रंगपटावरील सिद्धहस्त खेळाडू आहे. 

- जर देशवासियांना आमच्या मृत्यूचे थोडेफार दुख: होत असेल तर त्यांनी जमेल तसे हिंदू-मुस्लिम ऐक्य स्थापन करावे. तीच आमची अंतिम इच्छा होती. तेच आमचे स्मारक असेल. 

- समाजात होणाऱ्या दडपशाहीविरोधात कोणता आवाज उठत आहे आणि चिरस्थायी शांतता स्थापन करण्यासाठी कोणते विचार मांडले जात आहेत, हे नीट समजून घेतले नाहीत, तर माणसाचे ज्ञान अपूर्ण राहते. 

- भांडवलदारांना आपआपला स्वार्थ साधण्यासाठी धर्माचा उपयोग केला आहे, इतिहास याला साक्ष आहे.

- साधारणपणे आजपर्यंतच्या सर्व धर्मांनी माणसांना परस्परांपासून दूर केले आहे. जगात धर्माच्या ठेकेदारांनी धर्माच्या नावावर जेवढा रक्तपात केला आहे, तेवढा कदाचित दुसऱ्या कोणी केला नसेल. धर्माच्या आश्रयाने या पृथ्वीवरील स्वर्ग उजाड करून टाकला आहे. जो धर्म माणसाला माणसापासून दूर करतो, प्रेमाऐवजी परस्परांचा तिरस्कार करायला शिकवतो. अंधश्रद्धांना उत्तेजन देऊन लोकांच्या बौद्धिक विकासाला बाधक ठरतो.  तो माझा धर्म होऊ शकत नाही. 

- आपल्या देशात अस्पृश्यतेचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अस्पृश्यांच्या स्पर्शाने धर्म भ्रष्ट होईल, मंदीर प्रवेशाने देव नाराज होतील, विहिरीतून पाणी घेतले की पाणी अपवित्र होते. विसाव्या शतकात केले जाणारे हे प्रश्न ऐकून लाज वाटते

- प्रेम हे स्वत: च एक भावना असण्यापेक्षा अधिक काही असत नाही आणि ही पशूवृत्ती नाही. ती मधूर मानवी भावना आहे. प्रेम हे नेहमी मानवी चारित्र्याला उंचीवर नेते, कधी मान खाली पाहायला लावत नाही. पण, त्यासाठी अट एकच आहे, प्रेम हे प्रेम असले पाहिजे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Pimpri-Pune Liquor Poisoning: योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
IPL Trade News : हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
Satara Sangli MLC : मविआत सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, उमेदवार कोण असणार? मतदारांची संख्या नेमकी किती? 
सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, उमेदवार कोण असणार? मतदारांची संख्या नेमकी किती? 
Vasai Cyber Fraud : धक्कादायक! थेट न्यायाधीशांच्या पत्नीला सायबर चोरांनी घातला गंडा; 'ऑफिसर कोड' टाकताच बँक खातं रिकामं
धक्कादायक! थेट न्यायाधीशांच्या पत्नीला सायबर चोरांनी घातला गंडा; 'ऑफिसर कोड' टाकताच बँक खातं रिकामं
Shrikant Shinde Beed Visit: बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खासदारांना निवेदन देण्यापूर्वीच वृद्ध वडिलांचा मृत्यू; आधी मुलीला वाचवताना मुलगा गेला, आता मदत मागताना बाप हरपला
बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खासदारांना निवेदन देण्यापूर्वीच वृद्ध वडिलांचा मृत्यू; आधी मुलीला वाचवताना मुलगा गेला, आता मदत मागताना बाप हरपला
Eknath Khadse: 'महार वतन' जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर; विरोधकांवर हल्लाबोल करत नाथाभाऊ म्हणाले...
'महार वतन' जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर; विरोधकांवर हल्लाबोल करत नाथाभाऊ म्हणाले...
Karan Johar: करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...
करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...
Embed widget