एक्स्प्लोर

Shaheed Din : शहीद भगत सिंह यांचे 10 मौलिक विचार, वाचा भगत सिंह काय म्हणाले?

Shaheed Din Bhagat Singh: शहीद भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत दिलेले बलिदान आजही भारतीयांच्या स्मरणात आहे. भगत सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडलेल्या विचारांची प्रांसगिकता आजही कायम आहे.

Shaheed Din Bhagat Singh:  भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संघर्षात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य चळवळीत समाजातील अनेक घटकांनी आपल्या परीने योगदान दिले. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अवघ्या 23 व्या वर्षी भगत सिंह फासावर गेले. भगत सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे स्वातंत्र्यानंतर साध्य करण्यासाठीच्या उद्दिष्टांचा एक कार्यक्रम होता. भगत सिंह यांची वैचारीक भूमिकाही ठाम होती. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या कार्यक्रमातही त्याचे प्रतिबिंब दिसत होते.  

भगत सिंह यांनी बरेच लिखाण केले. काही वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून लेख लिहीले. तर, कारावासात असताना त्यांनी काही लेख लिहिले. हे लेख तत्कालीन परिस्थितीवर असले तरी त्यातील बरेच मुद्दे आजच्या काळातही लागू होत असल्याचे दिसून येते. 

>> जाणून घेऊयात भगत सिंह यांचे 10 मौलिक विचार: 

- क्रांती ही जनतेसाठी असली पाहिजे आणि जनताच पूर्ण करील. संपूर्ण समाजव्यवस्था परिवर्तन करणे म्हणजे क्रांती होय.

- क्रांतीसाठी रक्तपात करणारा आवश्यक नाही आणि क्रांतीत व्यक्तिगत प्रतिहिंसेला स्थान नाही. क्रांती ही बॉम्ब आणि पिस्तुलांची क्रांती नाही. 

- देशातील साहित्याचा प्रवाह ज्या दिशेने वाहतो, नेमक्या त्याच दिशेने तो देश आगेकूच करतो. कोणत्याही मानवजातीच्या उद्धारासाठी उच्च दर्जाच्या साहित्याची आवश्यकता असते. लेखकांनी सामाजिक समस्या, तसेच परिस्थिती यानुसार साहित्य निर्माण केले नाहीतर समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या समाजसुधारक आणि राजकीय नेते यांचे प्रयत्न निष्फळ ठरतील.

- युवकाने ठरवले तर तो मानवजातीचे उद्बोधन करू शकतो. देशाची अब्रू वाचवू शकतो. शोषितांच्या आणि जगाच्या उद्धाराची सूत्रे त्याच्या हाती आहेत. युवक हा जगाच्या रंगपटावरील सिद्धहस्त खेळाडू आहे. 

- जर देशवासियांना आमच्या मृत्यूचे थोडेफार दुख: होत असेल तर त्यांनी जमेल तसे हिंदू-मुस्लिम ऐक्य स्थापन करावे. तीच आमची अंतिम इच्छा होती. तेच आमचे स्मारक असेल. 

- समाजात होणाऱ्या दडपशाहीविरोधात कोणता आवाज उठत आहे आणि चिरस्थायी शांतता स्थापन करण्यासाठी कोणते विचार मांडले जात आहेत, हे नीट समजून घेतले नाहीत, तर माणसाचे ज्ञान अपूर्ण राहते. 

- भांडवलदारांना आपआपला स्वार्थ साधण्यासाठी धर्माचा उपयोग केला आहे, इतिहास याला साक्ष आहे.

- साधारणपणे आजपर्यंतच्या सर्व धर्मांनी माणसांना परस्परांपासून दूर केले आहे. जगात धर्माच्या ठेकेदारांनी धर्माच्या नावावर जेवढा रक्तपात केला आहे, तेवढा कदाचित दुसऱ्या कोणी केला नसेल. धर्माच्या आश्रयाने या पृथ्वीवरील स्वर्ग उजाड करून टाकला आहे. जो धर्म माणसाला माणसापासून दूर करतो, प्रेमाऐवजी परस्परांचा तिरस्कार करायला शिकवतो. अंधश्रद्धांना उत्तेजन देऊन लोकांच्या बौद्धिक विकासाला बाधक ठरतो.  तो माझा धर्म होऊ शकत नाही. 

- आपल्या देशात अस्पृश्यतेचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अस्पृश्यांच्या स्पर्शाने धर्म भ्रष्ट होईल, मंदीर प्रवेशाने देव नाराज होतील, विहिरीतून पाणी घेतले की पाणी अपवित्र होते. विसाव्या शतकात केले जाणारे हे प्रश्न ऐकून लाज वाटते

- प्रेम हे स्वत: च एक भावना असण्यापेक्षा अधिक काही असत नाही आणि ही पशूवृत्ती नाही. ती मधूर मानवी भावना आहे. प्रेम हे नेहमी मानवी चारित्र्याला उंचीवर नेते, कधी मान खाली पाहायला लावत नाही. पण, त्यासाठी अट एकच आहे, प्रेम हे प्रेम असले पाहिजे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  

व्हिडीओ

Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते
Rupali Thombre Patil : अजितदादा असते तर Rupali Chakankar यांचा लगेच सुपडा साफ केला असता
Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
Embed widget