एक्स्प्लोर

Shaheed Din : शहीद भगत सिंह यांचे 10 मौलिक विचार, वाचा भगत सिंह काय म्हणाले?

Shaheed Din Bhagat Singh: शहीद भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत दिलेले बलिदान आजही भारतीयांच्या स्मरणात आहे. भगत सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडलेल्या विचारांची प्रांसगिकता आजही कायम आहे.

Shaheed Din Bhagat Singh:  भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संघर्षात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य चळवळीत समाजातील अनेक घटकांनी आपल्या परीने योगदान दिले. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अवघ्या 23 व्या वर्षी भगत सिंह फासावर गेले. भगत सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे स्वातंत्र्यानंतर साध्य करण्यासाठीच्या उद्दिष्टांचा एक कार्यक्रम होता. भगत सिंह यांची वैचारीक भूमिकाही ठाम होती. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या कार्यक्रमातही त्याचे प्रतिबिंब दिसत होते.  

भगत सिंह यांनी बरेच लिखाण केले. काही वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून लेख लिहीले. तर, कारावासात असताना त्यांनी काही लेख लिहिले. हे लेख तत्कालीन परिस्थितीवर असले तरी त्यातील बरेच मुद्दे आजच्या काळातही लागू होत असल्याचे दिसून येते. 

>> जाणून घेऊयात भगत सिंह यांचे 10 मौलिक विचार: 

- क्रांती ही जनतेसाठी असली पाहिजे आणि जनताच पूर्ण करील. संपूर्ण समाजव्यवस्था परिवर्तन करणे म्हणजे क्रांती होय.

- क्रांतीसाठी रक्तपात करणारा आवश्यक नाही आणि क्रांतीत व्यक्तिगत प्रतिहिंसेला स्थान नाही. क्रांती ही बॉम्ब आणि पिस्तुलांची क्रांती नाही. 

- देशातील साहित्याचा प्रवाह ज्या दिशेने वाहतो, नेमक्या त्याच दिशेने तो देश आगेकूच करतो. कोणत्याही मानवजातीच्या उद्धारासाठी उच्च दर्जाच्या साहित्याची आवश्यकता असते. लेखकांनी सामाजिक समस्या, तसेच परिस्थिती यानुसार साहित्य निर्माण केले नाहीतर समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या समाजसुधारक आणि राजकीय नेते यांचे प्रयत्न निष्फळ ठरतील.

- युवकाने ठरवले तर तो मानवजातीचे उद्बोधन करू शकतो. देशाची अब्रू वाचवू शकतो. शोषितांच्या आणि जगाच्या उद्धाराची सूत्रे त्याच्या हाती आहेत. युवक हा जगाच्या रंगपटावरील सिद्धहस्त खेळाडू आहे. 

- जर देशवासियांना आमच्या मृत्यूचे थोडेफार दुख: होत असेल तर त्यांनी जमेल तसे हिंदू-मुस्लिम ऐक्य स्थापन करावे. तीच आमची अंतिम इच्छा होती. तेच आमचे स्मारक असेल. 

- समाजात होणाऱ्या दडपशाहीविरोधात कोणता आवाज उठत आहे आणि चिरस्थायी शांतता स्थापन करण्यासाठी कोणते विचार मांडले जात आहेत, हे नीट समजून घेतले नाहीत, तर माणसाचे ज्ञान अपूर्ण राहते. 

- भांडवलदारांना आपआपला स्वार्थ साधण्यासाठी धर्माचा उपयोग केला आहे, इतिहास याला साक्ष आहे.

- साधारणपणे आजपर्यंतच्या सर्व धर्मांनी माणसांना परस्परांपासून दूर केले आहे. जगात धर्माच्या ठेकेदारांनी धर्माच्या नावावर जेवढा रक्तपात केला आहे, तेवढा कदाचित दुसऱ्या कोणी केला नसेल. धर्माच्या आश्रयाने या पृथ्वीवरील स्वर्ग उजाड करून टाकला आहे. जो धर्म माणसाला माणसापासून दूर करतो, प्रेमाऐवजी परस्परांचा तिरस्कार करायला शिकवतो. अंधश्रद्धांना उत्तेजन देऊन लोकांच्या बौद्धिक विकासाला बाधक ठरतो.  तो माझा धर्म होऊ शकत नाही. 

- आपल्या देशात अस्पृश्यतेचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अस्पृश्यांच्या स्पर्शाने धर्म भ्रष्ट होईल, मंदीर प्रवेशाने देव नाराज होतील, विहिरीतून पाणी घेतले की पाणी अपवित्र होते. विसाव्या शतकात केले जाणारे हे प्रश्न ऐकून लाज वाटते

- प्रेम हे स्वत: च एक भावना असण्यापेक्षा अधिक काही असत नाही आणि ही पशूवृत्ती नाही. ती मधूर मानवी भावना आहे. प्रेम हे नेहमी मानवी चारित्र्याला उंचीवर नेते, कधी मान खाली पाहायला लावत नाही. पण, त्यासाठी अट एकच आहे, प्रेम हे प्रेम असले पाहिजे. 

महत्त्वाच्या बातम्या

Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
भारताला करावा लागणार उर्जा संकटाचा सामना? किती दिवसांचा साठा शिल्लक? अहवालातून महत्वाची माहिती समोर 
भारताला करावा लागणार उर्जा संकटाचा सामना? किती दिवसांचा साठा शिल्लक? अहवालातून महत्वाची माहिती समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Voter List Revision India: महाराष्ट्रासह देशातील पाच प्रमुख राज्यांमध्ये आजपासून मतदारयाद्यांची विशेष फेरतपासणी; BLO प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भेट देणार
महाराष्ट्रासह देशातील पाच प्रमुख राज्यांमध्ये आजपासून मतदारयाद्यांची विशेष फेरतपासणी; BLO प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भेट देणार

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
Embed widget