एक्स्प्लोर

इंग्रजांनाही शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले होते! गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारला सांगितली आठवण

देशात शेतकऱ्यांची ताकद सर्वात मोठी असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत केलं.शेतकऱ्यांपुढे इंग्रज सरकारला झुकावे लागले असल्याचा किस्सा त्यांनी सांगितला.

नवी दिल्ली :  दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 70 दिवस झाले आहे. याच दरम्यान सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची सातत्याने मागणी होत आहे. राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधानांना शेतकरी आंदोलनाशी जोडलेला एक किस्सा सांगितला. एकेकाळी ब्रिटीश सरकारलाही शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले असल्याचे सांगत शेतकऱ्यांमध्ये किती ताकद असते याची मोदी सरकारला आठवण करुन दिली.

हे काही शेतकऱ्यांचे पहिले आदोलन नाही : आझाद गुलाम नबी आझाद म्हणाले की, सरकार आणि शेतकरी समोरासमोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. शेतकरी आंदोलनाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. कधी जमीनदार तर कधी सरकारविरूद्ध शेतकरी लढले आहे. सरकारला इंग्रजांच्या काळातही झुकावे लागले आहे.

शेतकऱ्यांसमोर तेव्हाही सरकार झुकलं होतं ते म्हणाले की, 1900 ते 1906 दरम्यान ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतात तीन कायदे लागू करण्यात आले होते. पंजाब लँड वसाहत अधिनियम 1900, अधिनियम 1906 आणि वसाहती अधिनियम 1906 या तीन कायद्यांमध्ये जमीनीची मालकी ब्रिटीश सरकारकडे येणार होती. यामुळे शेतकरी आपल्या अधिकारापासून वंचित राहणार होते.

या कायद्यांमध्येच इमारती बांधण्याचा, झाडे तोडण्याचा अधिकार नव्हता. मोठा मुलगा कुटुंबातील प्रमुख होणार नाही आणि जर त्याचा मृत्यू झाला तर जमीन लहान भावाच्या नावे हस्तांतरित केली जाणार नाही. यामुळे 1907 मध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आणि त्यांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध आंदोलन छेडले. या आंदोलनाचे नेतृत्व सरकार अजितसिंग, (सरदार भगतसिंग यांचे मोठे बंधू) किशनसिंग जी, (भगतसिंग यांचे वडील) करत होते.

पूर्ण पंजाबमध्ये आंदोलन पसरले होते गुलाम नबी आझाद म्हणाले, हे आंदोलनचा लोट संपूर्ण पंजाबमध्ये पसरला होता. त्यावेळी बांकेलाल या लढ्याचे नेतृत्व करत होते. या आंदोलनात "पगड़ी संभाल जटा पगड़ी संभाल... सारे जग दा पेट भरे तूं, अन्नदाता कहलाए तूं.. हे त्यांनी लिहलेलं गीत खूप गाजलं होतं.

या गाण्याने शेतकर्‍यांमध्ये नवा उत्साह, नवीन जागृती निर्माण केली. लाला लाजपत राय यांनीही या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. सरकारने त्या विधेयकात दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला आणि काही सुधारणा केल्या. मात्र, त्यानंतर, गुजरांवाला, लाहोर आणि इतरत्र वेगवान आंदोलन झाले. त्यानंतर तिन्ही बिले सरकारला परत घ्यावी लागली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget