एक्स्प्लोर

हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत : मोहन भागवत

RSS Chief Mohan Bhagwat : हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे.

RSS Chief Mohan Bhagwat : हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत; असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे. ग्वाल्हेरमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, "भारताची फाळणी झाली, पाकिस्तानची निर्मिती झाली कारण आपण हिंदू आहोत ही भावना विसरलो, तेथील मुस्लिमही हे विसरले होते. स्वतःला हिंदू समजणाऱ्यांची शक्ती आधी कमी झाली, नंतर संख्याही कमी झाली, त्यामुळे पाकिस्तान आता भारत राहिला नाही."

मोहन भागवत म्हणाले की, हिंदू आणि भारत वेगळे होऊ शकत नाहीत. भारताला भारत म्हणून राहायचं असेल, तर भारताला हिंदू म्हणूनच राहावं लागेल. हिंदूना हिंदूच राहायचं असेल, तर भारत एकसंध असावा लागेल. पुढे बोलताना ते म्हणाले की, हा हिंदुस्थान आहे आणि हिंदू येथे पंरपरेनं राहतात. ज्याला हिंदू म्हणतात, त्या सर्व गोष्टी या भूमीत विकसित झाल्या आहेत. भारताबद्दलच्या प्रत्येक गोष्टींचा संबंध भारताच्या भूमीशी आहे, हा योगायोग नाही.

मोहन भागवत पुढे बोलताना म्हणाले की, "अनेकजण म्हणतात की, पूर्वी विज्ञानानं जोडल्या गेलेल्या गोष्टी वेगळ्या होत्या. आता जगाला जागतिक बाजारपेठ बनवायची आहे. आता लोक म्हणतात की, जगात उपभोगासाठी जगावं लागतं, संसाधनं कमी आहेत, माणसं जास्त आहेत, त्यामुळे आता उपभोगासाठी स्पर्धा आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "तुमचा जन्म हा उपभोगासाठी नसून तपश्चर्येसाठी आहे, तुमचे जीवन तोपर्यंतच सुरु आहे, जोपर्यंत दुसऱ्याचं सुरु आहे."

स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांशी लढण्यासाठी उत्साह हवा होता, पण नंतर विचार केला की, जोशातून स्वातंत्र्य मिळालं, तर निर्मितीची गरज भासेल. त्यामुळे होश असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. जेव्हापासून देशात जोश असणाऱ्यांसोबत होश असणाऱ्या व्यक्ती एकत्र आल्यात, तेव्हापासून देशात अधिक अच्छे दिन आले आहेत. 

हिंदू धर्म म्हणजे, चार मूल्यांवर आधारित जीवन. हिंदूंना भारतापासून वेगळे करून इतिहास घडू शकत नाही, असं ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, "हिंदूंची संख्या कमी झाली, शक्ती कमी झाली, केवळ तुम्ही नावानं हिंदू असाल तर काय उपयोग? हत्ती सर्कसमध्ये फुटबॉल खेळतो, पण त्याला सुवर्णपदक मिळत नाही. सिंह हा सर्कसमध्ये राजा नसतो, तो जंगलातच राजा असतो."

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

डीके-डीकेच्या नाऱ्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन भलतेच संतापले! मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांना म्हणाले, 'तुम्ही लोक बेकार आहात, इथं एकट्याची पूजा केली जात नाही, तर..'
डीके-डीकेच्या नाऱ्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन भलतेच संतापले! मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांना म्हणाले, 'तुम्ही लोक बेकार आहात, इथं एकट्याची पूजा केली जात नाही, तर..'
Ration Card New Rules : रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! ATM प्रमाणे सोय, देशभरातील कोणत्याही दुकानातून तांदूळ, गहू खरेदी करता येणार
रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! ATM प्रमाणे सोय, देशभरातील कोणत्याही दुकानातून तांदूळ, गहू खरेदी करता येणार
NEET Re Exam: नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार

व्हिडीओ

Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Keir Starmer: अखेर राजकीय भूकंप झालाच, इंग्लंडच्या पंतप्रधानांचा थेट राजीनामा; 10 वर्षात सहाव्या पंतप्रधानांचा सुद्धा कार्यकाळ पूर्ण नाहीच
अखेर राजकीय भूकंप झालाच, इंग्लंडच्या पंतप्रधानांचा थेट राजीनामा; 10 वर्षात सहाव्या पंतप्रधानांचा सुद्धा कार्यकाळ पूर्ण नाहीच
आधी पार्टी केली, 250 च्या स्पीडने कार पळवली, बीएमडब्लूचा सांगाडा; भीषण अपघातात 2 ठार, कारच्या उडाल्या चिंधड्या
आधी पार्टी केली, 250 च्या स्पीडने कार पळवली, बीएमडब्लूचा सांगाडा; भीषण अपघातात 2 ठार, कारच्या उडाल्या चिंधड्या
Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने असा पराक्रम करून दाखवला जो रोहित अन् कोहली सुद्धा करू शकले नाहीत! एकाचवेळी दोन भीम पराक्रम नावावर जमा
हरमनप्रीत कौरने असा पराक्रम करून दाखवला जो रोहित अन् कोहली सुद्धा करू शकले नाहीत! एकाचवेळी दोन भीम पराक्रम नावावर जमा
सहाच नाही आणखी खासदार होते, पण...; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं
सहाच नाही आणखी खासदार होते, पण...; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं
डीके-डीकेच्या नाऱ्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन भलतेच संतापले! मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांना म्हणाले, 'तुम्ही लोक बेकार आहात, इथं एकट्याची पूजा केली जात नाही, तर..'
डीके-डीकेच्या नाऱ्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन भलतेच संतापले! मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांना म्हणाले, 'तुम्ही लोक बेकार आहात, इथं एकट्याची पूजा केली जात नाही, तर..'
Nanded Result : शिंदे गटात गेलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाचा पराभव, फक्त 84 मतं पडली, ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
शिंदे गटात गेलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाचा पराभव, फक्त 84 मतं पडली, ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
राजेंद्र राऊतांच्या विजयानंतर जयुकमार गोरेंनी दंड दाखवले; मोहिते पाटलांना टोला, माळशिरसचा नेताही सांगितला
राजेंद्र राऊतांच्या विजयानंतर जयुकमार गोरेंनी दंड दाखवले; मोहिते पाटलांना टोला, माळशिरसचा नेताही सांगितला
Sangli Satara MLC Election: सांगली सातारा विधानपरिषदेत धैर्यशील कदमांचा विजय, पण जयकुमार गोरेंचा स्वत:च्या बालेकिल्ल्यात 'धैर्य' तोडणारा 'करेक्ट कार्यक्रम'! तब्बल शंभरावर मते फुटल्याचा दावा
सांगली सातारा विधानपरिषदेत धैर्यशील कदमांचा विजय, पण जयकुमार गोरेंचा स्वत:च्या बालेकिल्ल्यात 'धैर्य' तोडणारा 'करेक्ट कार्यक्रम'! तब्बल शंभरावर मते फुटल्याचा दावा
Embed widget