एक्स्प्लोर

राजस्थानात गहलोत सरकारविरोधात भाजप आणणार अविश्वास ठराव? काय सांगतात आकडे?

गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थान काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादांवर आता पडदा पडला आहे. बुधवारी सचिन पायलट मुख्यमंत्री गहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या आमदारांच्या बैठकीत सहभागी झाले होते.

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये आजपासून विधानसभेचं अधिवेशन सुरु होणार आहे. याआधी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काल आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सचिन पायलट देखील उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री गहलोत यांनी विधानसभा अधिवेशनाची घोषणा केली. तसेच भाजपने घोषणा केली आहे की, ते विधानसभा सत्राच्या पहिल्याच दिवशी गहलोत सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडणार आहेत. परंतु, भाजपने उचललेलं हे पाऊल अत्यंत आश्चर्य वाटण्यासारखंच आहे. कारण सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडेही पुरेशा जागा नाहीत.

सचिन पायलट यांच्या घरवापसीमुळे टळला धोका

गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थान काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादांवर आता पडदा पडला आहे. बुधवारी सचिन पायलट मुख्यमंत्री गहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या आमदारांच्या बैठकीत सहभागी झाले होते. नारजी दूर झाल्यानंतर सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातील ही पहिली भेट होती. त्याचसोबत गहलोत सरकारवर आलेलं अस्थिरतेचं संकटही टळलं.

भाजप अविश्वासाचा ठराव मांडण्याच्या तयारीत

राजस्थानमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांचं म्हणणं आहे की, कॉंग्रेसने ज्या पद्धतीने परिश्रम घेतले आहेत, हे पाहून ते विश्वासाने मत देण्याचा विचार करत आहेत. त्याचसोबत त्यांचं म्हणणं आहे की, ते राजस्थान सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्याचा विचार करत आहेत.

आकड्यांमध्ये भाजप मागेच

सध्या 200 विधानसभेच्या जागा असलेल्या राजस्थान विधानसभेत भाजपकडे राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे 3 आमदार आणि एका अपक्ष उमेदवाराचा पाठिंब्यासोबत एकूण 76 जागा आहेत. तसेच एकूण 200 जागा असणाऱ्या राजस्थान विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 101 आमदारांचं समर्थन असण्याची गरज आहे.

अशातच सचिन पायलटच्या घरवापसीसोबतच पुन्हा एकदा काँग्रेसकडे 107 आमदारांचं समर्थन आहे. सचिन पायलटच्या समर्थनात 19 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे गहलोत सरकारवर संकटाचं सावट आलं होतं. परंतु, पायलट यांच्या घरवापसीमुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकावरील संकट दूर राहिलं आहे.

अयशस्वी ठरू शकतो भाजपचा अविश्वास ठराव

राजस्थान विधानसभेत इंडियन नॅशनल काँग्रेसला 107 जागांवर काँग्रेस, तर 13 जागांवर अपक्ष आमदार, भारतीय कम्युनिस्ट पार्टीला 2, भारतीय ट्रायबल पार्टीला 2, राष्ट्रीय लोक दलाला 1, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीला 3 आणि भारतीय जनता पार्टीला 72 जागा मिळाल्या आहेत. भाजपचे आकडे पाहिले तर बहुमत गाठण्यासाठी त्यांना खूप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. तसेच अपक्ष, भारतीय ट्रायबल पार्टीचे 2, माकपा 1 आणि राष्ट्रीय लोक दलाच्या आमदरांचा पाठिंब्यामुळे काँग्रेसच्या समर्थनार्थ 124 मतं निश्चित आहेत. त्यामुळे भाजपचा अविश्वास ठराव अयशस्वी ठरू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
Embed widget