एक्स्प्लोर

Odisha Train Accident : ओदिशा रेल्वे अपघातात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, पण राजीनाम्याच्या प्रश्नावर रेल्वेमंत्र्यांचं मौन

Odisha Train Accident:  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी राजीनाम्याच्या प्रश्नावर अश्विनी वैष्णव यांनी मौन बाळगण पसंत केलं आहे.

Odisha Train Accident:  ओदिशामधील (Odisha) बालासोरमध्ये शुक्रवारी (2 जून) रोजी झालेल्या रेल्वे अपघातात 233 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु असून ओदिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळाची पाहणी देखील केली आहे. घटनास्थळी जाऊन रेल्वेमंत्र्यांनी ज्या रेल्वे बोगींचा अपघात झाला त्यांची पाहणी केली. तसेच त्यांनी बचावकार्यचा देखील यावेळी आढावा घेतला आणि तेथील अधिकाऱ्यांची भेट घेतली परंतु माध्यमांच्या प्रश्नांना रेल्वेमंत्र्यांनी फारशी उत्तरं न देणं यावेळी पसंत केलं. 

माध्यमांशी संवाद साधताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देणं टाळलं असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. काही प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी इतकंच म्हटलं की, "ते याबाबत अधिक पाहणी करतील आणि त्यांचे अधिकारी योग्य ती चौकशी करत आहेत." तसेच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचं यावेळी रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं, तर राजीनाम्याच्या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगणं पसंत केल्याचं पाहायला मिळालं.  

काय म्हणाले रेल्वेमंत्री? 

'अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या आत्म्याला शांती लाभो', अशी प्रार्थना रेल्वेमंत्र्यांनी केली. ही खूप मोठी दुर्घटना असल्याचं यावेळी अश्विन वैष्णव यांनी म्हटलं. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, "इथे रेल्वेच्या प्रत्येक विभागीची टीम उपस्थित आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी योग्य ती पाहणी करण्यात येत आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीला या अपघातात गमावले आहे त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमी झालेल्या लोकांसाठी जिथे कुठे चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येतील." यासंबंधी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असल्याचं देखील रेल्वेमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

"आम्ही या अपघाताच्या मुळाशी जाऊन संपूर्ण घटनेची तपासणी करु, परंतु सध्या बचावकार्यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे," असं रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलं. घटनास्थळी सध्या रेल्वे, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य करण्यात येत आहे. तसेच या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर जे लोक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत त्यांनी दोन लाखांची मदत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. 

ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घटनास्थळी पोहोचत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधून संपूर्ण घटनेची पाहणी केली. या रेल्वे अपघातात 233 लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 900 पेक्षा अधिक लोक या अपघातात जखमी झाली आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

ट्रेन क्रमांक 12841... 250 किमी धावल्यानंतर रुळावरून घसरली कोरोमंडल एक्सप्रेस, एका झटक्यात 233 जणांचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget