एक्स्प्लोर

गडकरी म्हणाले, नोकऱ्या कुठे आहेत? राहुल गांधी म्हणाले-उत्तम प्रश्न

‘गडकरीजी चांगला प्रश्न आहे. सर्व भारतीय नागरिक हाच प्रश्न विचारत आहेत’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं.

नवी दिल्ली: आरक्षण जरी दिलं तरी नोकऱ्या कुठं आहेत, असा सवाल विचारणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला. ‘गडकरीजी चांगला प्रश्न आहे. सर्व भारतीय नागरिक हाच प्रश्न विचारत आहेत’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं. भाजपने सत्तेत आल्यानंतर तरुणांना नोकऱ्या देऊ असं आश्वासन दिलं होतं. तोच धागा पकडून, राहुल गांधींनी गडकरींच्या वक्तव्यावरुन, नोकऱ्या कुठं आहेत, हा प्रश्न देश विचारत असल्याचं नमूद केलं. याशिवाय काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुनही गडकरींवर निशाणा साधण्यात आला आहे. “नितीन गडकरी हे पहिले भाजपचे मंत्री आहेत, ज्यांनी सत्य आणि धैर्याने संपूर्ण देश विचारत असलेला प्रश्न उपस्थित केला”, असं ट्विट काँग्रेसने केलं आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वीही रोजगाराच्या प्रश्नावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्ला केला आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणुकीपूर्वी प्रत्येकवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं, ते म्हणजे एक जुमला होतं, असं राहुल गांधी म्हणाले होते. गडकरी काय म्हणाले होते? ''गरीब गरीब असतो. गरीबाला जात, पंथ, धर्म, भाषा नसते. धर्म कुठलाही असो, हिंदू असो, मुसलमान असो, मराठा असो.. एक क्लास असा आहे समाजात, ज्याला अंगावर कपडे नाहीत, खायला अन्न नाही. त्यामुळे असा विचार आलाय की त्या समाजामध्ये, एकदम जो गरीब आहे, त्याचाही काही विचार केला पाहिजे..'', असं गडकरी म्हणाले. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलनं करत आहे. औरंगबाद, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक येथे झालेल्या आंदोलनांनी हिंसक वळणही लागलं होतं. तसेच आंदोलनाच्या मागणीसाठी काहींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांचा राज्य सरकारही गंभीरतेने विचार करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा अहवाल लवकरात लवकर तयार करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाला विनंती करण्यात आली आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर तातडीने विशेष अधिवेशन बोलवलं जाईल. अधिवेशनात या अहवालावर सर्वानुमते चर्चा केली जाईल आणि काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर केल्या जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी याआधीच दिलं आहे. गडकरींचं स्पष्टीकरण दरम्यान, नितीन गडकरी यांच्या विधानाच्या बातम्या माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्यांनी (नितीन गडकरी) ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "जातीआधारित आरक्षण बदलून आर्थिक परिस्थितीवर आरक्षण देण्याचा केंद्राचा कोणताही विचार नाही." संबंधित बातमी  खायला अन्न नसलेल्या गरीबाचाही विचार करण्याची गरज : गडकरी 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..

व्हिडीओ

Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Dhananjay Munde: धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
Embed widget