एक्स्प्लोर

मोदी दलितविरोधी, संविधान उद्ध्वस्त करु देणार नाही : राहुल गांधी

पुढील वर्षी भीमराव आंबेडकर जयंतीपर्यंत (14 एप्रिल) हे अभियान सुरु राहणार आहे. संविधान आणि दलितांवरील हल्ल्याच्या मुद्द्यांना राष्ट्रीय स्तरावर वाचा फोडणं हा त्यामागील उद्देश आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संविधान बचाओ अभियानाची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींच्या कर्मयोगी - नरेंद्र मोदी या पुस्तकातील वाक्यांचा वापर करताना राहुल गांधींनी पतंप्रधान दलितविरोधी असल्याचं सांगितलं. सरकार सर्वोच्च न्यायालय, संसद नष्ट करण्याचा कट रचत असल्याचा आरोपही त्यांनी आपल्या भाषणात केला आहे. 'संविधान बचाओ' अभियानाची सुरुवात काँग्रेसने आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममधून 'संविधान बचाओ' अभियानाची सुरुआत केली. पुढील वर्षी भीमराव आंबेडकर जयंतीपर्यंत (14 एप्रिल) हे अभियान सुरु राहणार आहे. संविधान आणि दलितांवरील हल्ल्याच्या मुद्द्यांना राष्ट्रीय स्तरावर वाचा फोडणं हा त्यामागील उद्देश आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी दलित व्होट बँक आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसचं हे अभियान महत्त्वाचं समजलं जात आहे. देशात 17% दलित मतदार आहेत. 2019 मध्ये देश मोदींना आपल्या 'मन की बात' सांगणार "पंतप्रधान केवळ स्वत:च्या मन की बात ऐकतात. त्यांना कोणाला बोलू द्यायचं नाही. त्याला अरुण जेटली, नितीन गडकरी यांना बोलू द्यायचं नाही. ते बोलतात की,  फक्त माझ्या मन की बात ऐका. मी म्हणतो की, 2019 च्या निवडणुकीत देशाची जनता मोदींना आपल्या मन की बात सांगेन," असं राहुल गांधी म्हणाले. मोदींनी देशाची प्रतिमा धुळीला मिळवली! "आधी जगभरात आपली एक प्रतिष्ठा होती. भारतात विविध धर्म, विचारधारा आहेत, असं जग बोलत असे. इथे सगळे मिळून-मिसळून राहतात. भारताची घटनात्मक संस्था म्हणजेच सर्वोच्च न्यायालय, विधानसभा, राज्यसभेकडून आपल्याला शिकायला हवं, असं जग म्हणायचं. अनेक देश आपल्याकडे पाहत असेल. त्यांना आपल्यासारखं काम करायचं होतं. पण उलट झालं. त्यामुळे आपली प्रतिष्ठा संपली आहे. मोदींनी ती धुळीस मिळवली. आता महिलांवरील बलात्कार, अल्पवयीन मुलांवर अत्याचार आणि दलितांची हत्या केली जाते," असं राहुल गांधी म्हणाले. मोदींच्या पुस्तकातील वाक्य घेऊन  हल्लाबोल राहुल गांधी म्हणाले की, "वाल्मिकी समाज जे काम करतो, ते पोट भरण्यासाठी नाही. केवळ पोट भरण्यासाठीच समाज हे काम करत असता, तर इतकी वर्ष केली नसतं. हे काम ते अध्यात्मासाठी करतात. दलिसांसाठी पंतप्रधानांचे हेच विचार आहे. या विचारांनी पंतप्रधानांची दलितांप्रती असलेली भूमिका स्पष्ट होते. ही पंतप्रधानांची विचारधारा आहे. हे देशाच्या प्रत्येक गरीब आणि दलितांना समजायला हवं. पंतप्रधानांच्या हृदयात दलितांसाठी जागा नाही." "पंतप्रधानांच्या हृदयात देशातील गरीब, दलित आणि महिलांसाठी जागा नाही. उन, यूपी, मध्य प्रदेशात दलितांवरील अत्याचार वाढत आहेत. या देशात दलित, गरीब आणि महिलांचं संरक्षण संविधान करतं," असं काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं. काँग्रेस आणि आंबेडकरांनी संविधान दिलं! देशाला संविधान काँग्रेस पक्ष आणि भीमराव आंबेडकर यांनी दिल्याचं राहुल गांधी म्हणाले. "निवडणूक आयोग, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, आयआयटी, आयआयएम यांसारख्या संस्था आपल्या संविधानाने दिल्या आहेत. संविधानाशिवाय काही होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय संविधानाचा पाया आहेत," असंही त्यांनी सांगितलं. न्यायाधीशांनी जनतकडून न्याय मागितला! "सध्या देशातील सर्वच घटनात्मक संस्थांमध्ये आरएसएसच्या लोकांचा समावेश केला जात आहे. ह्या सगळ्या संस्था उद्ध्वस्त केल्या सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना इतिहासात पहिल्या जनतेकडून न्याय मागावा लागला. खरंतर नागरिक न्यायाधीशांकडे न्याय मागतात, पण इथे न्यायाधीशच जनतेकडून न्याय मागायला आले. सर्वोच्च न्यायालयाला उद्ध्वस्त केलं जात आहे, दाबलं जात आहे. संसद भवन सरकारच बंद करत आहे," असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 24 वा हप्ता मिळवण्यासाठी 'हे' काम करा, अन्यथा लाभापासून राहाल वंचित 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 24 वा हप्ता मिळवण्यासाठी 'हे' काम करा, अन्यथा लाभापासून राहाल वंचित 
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
Embed widget