एक्स्प्लोर

Farmers Protest | पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटी दोन्ही नेते शेतकरी आंदोलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेआधी ही भेट होणार आहे.

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शेतकरी संघटना आणि सरकारमधील चर्चेआधी दिल्लीमध्ये ही भेट होणार आहे. शेतकरी आंदोलनावरुन पंजाब सरकारची आक्रमक भूमिका पाहता ही भेट अतिशय महत्त्वाची समजली जात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह याआधीही अमित शाह यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. परंतु तेव्हा शाह आणि त्यांची भेट होऊ शकली नव्हती.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह सातत्याने केंद्राच्या तीन नव्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या संघर्ष योग्य असल्याचं सांगत तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज का ऐकत नाहीत? आणि या मुद्द्यावर हट्टाची भूमिका का असे सवालही उपस्थित केले होते.

आमचं सरकार या काळ्या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचा पुनरुच्चारही अमरिंदर सिंह यांनी केला. ते म्हणाले की, "जनतेचं ऐकणं हे सरकारचं काम आहे. जर अनेक राज्यांचे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत तर याचा अर्थ आहे की ते खरोखरच दु:खी आहेत."

यासोबतच हरियाणात शेतकऱ्यांच्या आंदोलनात बळाचा वापर केल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अमरिंदर सिंह यांनी यावरुन हरियाणा सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. अशा परिस्थितीत अमित शाह यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीत शेतकऱ्यांची मनधरणी करण्याबाबत मार्ग निघेल अशी अपेक्षा केली जात आहे.

अमित शाह यांची कृषीमंत्री, रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या चर्चेआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी (2 डिसेंबर) कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक घेतली होती. तोमर, गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी मंगळवारी (1 डिसेंबर) शेतकरी नेत्यांसोबतच्या चर्चेसाठी केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व केलं होतं. आता आज पुन्हा एकदा शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये बातचीत होणार आहे.

शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बुधवारी या तीन प्रमुख केंद्रीय मंत्र्यांनी चर्चा केल्याचं समजतं. नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांची चिंता दूर कशी करता येईल याबाबत या मंत्र्यांमध्ये चर्चा झाली.

नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 35 शेतकरी संघटनांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी फेटाळला होता. जवळपास दोन तासांच्या या बैठकीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचं एकमत होतं की, तिन्ही नवे कृषी कायदे बरखास्त करावेत. हे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

Farmers Protest: आता खाप पंचायतींचेही 'चलो दिल्ली', खट्टर सरकार पाडण्याची धमकी

पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, पुरस्कार वापसीचा इशारा

32 वर्षांपूर्वीही एका शेतकरी आंदोलनानं दिल्लीला भरवली होती धडकी

Farmer Protest | पंजाबचे अमरिंदर सिंह गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार

महत्त्वाच्या बातम्या

उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Sanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget