एक्स्प्लोर

Pravasi Bharatiya Divas 2021: भारतात का साजरा केला जातो 'प्रवासी भारतीय दिवस?' काय आहे या दिवसाचं महत्व?

परदेशात राहणाऱ्या भारतीयांचे (Persons of Indian Origin ) देशाच्या विकासात असलेले योगदान अधोरेखित करण्यासाठी 9 जानेवारीला 'प्रवासी भारतीय दिवस' (Pravasi Bharatiya Divas) साजरा केला जातो. आजच्याच दिवशी, 1915 साली महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आफ्रिकेतून भारतात परत आले होते. या दिनाचे औचित्य साधून 2003 साली पहिल्यांदा प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात आला.

नवी दिल्ली: मूळचे भारतीय पण सध्या परदेशात राहत असलेल्या नागरिकांचे देशाच्या विकासात योगदानाचे महत्व लक्षात घेऊन तसेच त्यांची मातृभूमीशी नाळ कायमची जोडली जावी या उद्देशाने भारतात 9 जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने उल्लेखनीय काम केलेल्या अनिवासी भारतीयांना प्रतिष्ठेचा 'प्रवासी भारतीय पुरस्कार' देण्यात येतो. अनिवासी भारतीयांच्या संबंधित वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी प्रवासी भारतीय दिनाचे हे व्यासपीठ महत्वाचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या या वर्षीच्या 16 व्या प्रवासी भारतीय दिवसाची थीम ही 'आत्मनिर्भर भारतामध्ये योगदान' (Contributing to Aatmanirbhar Bharat) अशी आहे.

'सर्वात मोठा प्रवासी' गांधीजींचं भारतात आगमन मोहनदास करमचंद गांधी हे 1883 सालाच्या सुमारास एका खटल्यासंबंधी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्या ठिकाणी कृष्णवर्णीय लोकांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केला आणि कृष्णवर्णीयांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. त्यानंतर 9 जानेवारी 1915 साली ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळी दिशा दिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.

NRI | अनिवासी भारतीयांना मिळणार मतदानाचा अधिकार, निवडणूक आयोगाचा केंद्र सरकारकडं प्रस्ताव

भारतातील या सर्वात मोठ्या प्रवाशाच्या आगमनानिमित्त 2003 सालापासून प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. पूर्वी हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जायचा पण 2015 सालापासून प्रत्येक दोन वर्षांनी हा दिवस साजरा केला जातोय.

कोण आहेत प्रवासी भारतीय? मूळचे भारतीय वंशाचे पण सध्या जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात राहत असलेल्या नागरिकांना प्रवासी भारतीय म्हटलं जातं. सरकारच्या एका अहवालाच्या मते, जगभरातील 110 देशांमध्ये जवळपास अडीच कोटी मूळ भारतीय वंशाचे नागरिक वास्तव करत आहेत. या लोकांनी विदेशात राहूनही आपल्या देशाची संस्कृती, भाषा, वारसा अशा अनेक गोष्टींची जपणूक केली आहे. या नागरिकांमुळेच जगभरात भारताला एक वेगळी ओळख मिळतेय.

देशाच्या विकासात योगदान जगभरात राहणाऱ्या प्रवासी भारतीयांचे भारताच्या विकासात मोठं योगदान आहे. जागतिक बँकेचा मायग्रेशन अॅन्ड रेमिटन्स (MIGRATION AND REMITTANCE) नावाचा एक अहवाल असं सांगतोय की आपल्या मुळच्या देशात पैसे पाठवण्याच्या बाबतीत अनिवासी भारतीयांचा जगात क्रमाक पहिला लागतोय. याच अहवालात असं सांगण्यात आलंय की 2019 साली अनिवासी भारतीयांनी देशात 83.1 अब्ज डॉलर भारतात पाठवले आहेत. भारतानंतर चीनच्या नागरिकांचा दुसरा क्रमांक लागतोय.

विजयानंतर जो बायडन, कमला हॅरिस यांना पंतप्रधान मोदींच्या खास शुभेच्छा, म्हणाले...

आखाती देशात राहतात सर्वात जास्त अनिवासी भारतीय भारतातून कामासाठी देशाबाहेर गेलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आखाती देशांत आहे. भारत सरकारच्या एका अहवालानुसार जवळपास 30 लाख अनिवासी भारतीय आखाती देशात काम करत आहेत. याच प्रदेशातून भारतात सर्वाधिक पैसे पाठवले जातात. त्यानंतर ब्रिटनमध्ये 10 लाख अनिवासी भारतीय तर कॅनडामध्ये अडीच लाख अनिवासी भारतीय लोक वास्तवास आहेत.

आत्मनिर्भर भारतामध्ये योगदान या वर्षीच्या 16 व्या प्रवासी भारतीय दिनाची थीम आहे 'आत्मनिर्भर भारतामध्ये योगदान' (Contributing to Aatmanirbhar Bharat). या निमित्ताने जगभरातील अनिवासी भारतीयांचे एक नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग भारताला एक सॉफ्ट पॉवरच्या रुपाने होणार आहे.

आतापर्यंत जवळपास 60 देशांतील 240 अनिवासी भारतीयांना प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

US Elections : कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती; भारताशी त्यांचा काय संबंध?

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Trinamool Congress Crisis: तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
Bihar Police Recruitment Exam: बिहार पोलीस भरती परीक्षेत तुफानी राडा, पाटलीपुत्र स्थानकावर दगडफेक आणि तोडफोड, रेल्वेगाड्या थांबवल्या; पोलिसांचा थेट गोळीबार
बिहार पोलीस भरती परीक्षेत तुफानी राडा, पाटलीपुत्र स्थानकावर दगडफेक आणि तोडफोड, रेल्वेगाड्या थांबवल्या; पोलिसांचा थेट गोळीबार
Rahul Gandhi on PM Modi: तीन भारतीय नौसैनिकांच्या हत्येनंतरही कोणता खेद नाही, माफी नाही; उलट, अमेरिका आदेश देत आहे, आज्ञाधारक पीएम नोकराप्रमाणे ऐकतात आणि आदेश पाळतात, राहुल गांधीचा बोचरा वार
तीन भारतीय नौसैनिकांच्या हत्येनंतरही कोणता खेद नाही, माफी नाही; उलट, अमेरिका आदेश देत आहे, आज्ञाधारक पीएम नोकराप्रमाणे ऐकतात आणि आदेश पाळतात, राहुल गांधीचा बोचरा वार
Ram Mandir: राम मंदिरातील पुजाऱ्यांना नेमका किती पगार मिळतो? एकाने शेणाच्या ढिगात लपवलेले 10 लाख सापडले! 7 कोटींच्या चोरीची चर्चा, सीएम योगींनी कोणता निर्णय घेतला?
राम मंदिरातील पुजाऱ्यांना नेमका किती पगार मिळतो? एकाने शेणाच्या ढिगात लपवलेले 10 लाख सापडले! 7 कोटींच्या चोरीची चर्चा, सीएम योगींनी कोणता निर्णय घेतला?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trinamool Congress Crisis: तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले
रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले
Womens T-20 World Cup: महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध आज नवव्यांदा भिडणार
महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध आज नवव्यांदा भिडणार
Bihar Police Recruitment Exam: बिहार पोलीस भरती परीक्षेत तुफानी राडा, पाटलीपुत्र स्थानकावर दगडफेक आणि तोडफोड, रेल्वेगाड्या थांबवल्या; पोलिसांचा थेट गोळीबार
बिहार पोलीस भरती परीक्षेत तुफानी राडा, पाटलीपुत्र स्थानकावर दगडफेक आणि तोडफोड, रेल्वेगाड्या थांबवल्या; पोलिसांचा थेट गोळीबार
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
BJP : सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी, एसी बसमधून सहलीला रवाना
सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना
Rahul Gandhi on PM Modi: तीन भारतीय नौसैनिकांच्या हत्येनंतरही कोणता खेद नाही, माफी नाही; उलट, अमेरिका आदेश देत आहे, आज्ञाधारक पीएम नोकराप्रमाणे ऐकतात आणि आदेश पाळतात, राहुल गांधीचा बोचरा वार
तीन भारतीय नौसैनिकांच्या हत्येनंतरही कोणता खेद नाही, माफी नाही; उलट, अमेरिका आदेश देत आहे, आज्ञाधारक पीएम नोकराप्रमाणे ऐकतात आणि आदेश पाळतात, राहुल गांधीचा बोचरा वार
रत्नागिरीत समुद्रकिनारी आढळला दुर्मिळ पक्षी; ब्राऊन बूबी पाहून पर्यटकही सुखावले, फोटोही काढले
रत्नागिरीत समुद्रकिनारी आढळला दुर्मिळ पक्षी; ब्राऊन बूबी पाहून पर्यटकही सुखावले, फोटोही काढले
Embed widget