Pralay Missile Test: भारताची लष्करी ताकद वाढली, 500 किमीपर्यंत मारा करणाऱ्या 'प्रलय' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारताने आज बॅलेस्टिक मिसाइल 'प्रलय' (Pralay) या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहेत. यामुळे भारताची लष्करी ताकद वाढली आहे.

Indian Missiles: भारताने जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलेस्टिक मिसाइल 'प्रलय' (Pralay) या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र 150 किमी ते 500 किमी (KM)अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकणार आहे. आज सकाळी ही चाचणी करण्यात आली. चीन आणि पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे भारत आपली लष्करी ताकद वाढवत आहे.
हे प्रलय क्षेपणास्त्र 150 किमी ते 500 किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकते. ओडिशामधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर या क्षेपणास्त्राची चाचण्या घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केले आहे. या क्षेपणास्त्र एक टनापर्यंतचे वॉरहेड वाहून नेऊ शकते. यापूर्वी भारताने अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या मध्यम पल्ल्याच्या अग्नी प्राइम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. दोन हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची ओडिशातील बालासोर येथे चाचणी घेण्यात आली होती. हे क्षेपणास्त्रही डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. डीआरडीओने अग्नी-1 आणि अग्नी-2 मालिकेतील क्षेपणास्त्रांपेक्षा अग्नी-प्राइम अधिक प्रगत विकसित केले आहे. त्याची रेंज कमी असली तरी त्यात अग्नी-5 तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळेच शत्रूच्या क्षेपणास्त्राचे संरक्षण यंत्रणेला चकवा देण्यातही ते यशस्वी होऊ शकते. भारताने हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या कमी पल्ल्याच्या आण्विक क्षेपणास्त्रांच्या विरोधात तयार केले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला भारताने दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. 8 डिसेंबर रोजी भारताने सुखोई लढाऊ विमानातून सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसच्या हवाई आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली होती. ओडिसातील चांदीपूर एकात्मिक चाचणी श्रेणीवरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने हे ब्रह्मोस विकासातील एक मोठे यश असल्याचे वर्णन केले आहे. काही दिवसांपूरर्वी म्हणजे 7 डिसेंबरला भारताने पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (VL-SRSAM) यशस्वी चाचणी घेतली होती. ही हवाई संरक्षण यंत्रणा केवळ 15 किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकते. नौदलाच्या युद्धनौकांसाठी डीआरडीओने हे तयार केले आहे. या क्षेपणास्त्रामुळे नौदलाच्या युद्धनौकांसाठी हवेतून येणारा धोका हवेतच नष्ट होईल. हे क्षेपणास्त्र जुन्या बराक-1 सरफेस टू एअर क्षेपणास्त्राची जागा घेईल. यामुले हवेतील धोक्यांपासून 360डिग्री संरक्षण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Old Currency Note Sale : तुमच्याकडे 1, 5 आणि 10 रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही मिळवू शकता 1 लाख रुपये!
- 'पंतप्रधानां'वरुन विधानसभेत राडा! भास्कर जाधवांकडून मोदींची नक्कल, 'माफी मागा' म्हणत विरोधक भडकले
Before You Go
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?






















