![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Power Crisis: देशातील वीज संकट आणि कोळशाच्या कमतरतेबद्दल सरकारने काय म्हटले?जाणून घ्या?
Power Crisis: केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंह यांनी देशात वीजपुरवठा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. प्रल्हाद जोशी म्हणाले की, देशात पुरेसा कोळसा साठा आहे.
![Power Crisis: देशातील वीज संकट आणि कोळशाच्या कमतरतेबद्दल सरकारने काय म्हटले?जाणून घ्या? power crisis and shortage of coal in country Know what government has said about it Power Crisis: देशातील वीज संकट आणि कोळशाच्या कमतरतेबद्दल सरकारने काय म्हटले?जाणून घ्या?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/10/ccd4133c70b0ac7906f2db2276ff724e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Power Crisis: देशात कोळशाची कमतरता आणि वीज संकटाच्या चर्चांवर सरकारने वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निराधार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, त्यांनी देशातील कोळसा उत्पादन आणि पुरवठा परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ते म्हणाले की, ते सर्व देशवासियांना आश्वास्त करतायेत की देशातील वीज पुरवठा खंडित होण्याचा कोणताही धोका नाही.
प्रल्हाद जोशी यांनी ट्विट केले, "देशातील कोळसा उत्पादन आणि पुरवठा परिस्थितीचा आढावा घेतला. मी सर्व देशवासियांना आश्वासन देतो की देशात वीज पुरवठा खंडित होण्याचा कोणताही धोका नाही. कोल इंडिया लिमिटेडकडे 24 दिवसांची कोळशाची मागणी पूर्ण करण्यासाठी 43 दशलक्ष टन कोळसासाठा उपलब्ध आहे.
यासह, ते म्हणाले, “औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचा कोळसासाठा दररोज कोळसा पुरवठा करून वाढविला जात आहे. मान्सूनच्या परतीसोबत कोळसा पाठवण्यामध्ये आणखी वाढ होईल, ज्यामुळे कोळशाचा साठा वाढेल. देशात पुरेसा कोळसा साठा आहे हे मी पुन्हा एकदा सांगतो. भीती निर्माण करणाऱ्या कोणत्याही अफवांनी फसवू नका."
ऊर्जा मंत्री म्हणजे काय?
दुसरीकडे, केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी वीज संकटावर सांगितले की, दिल्लीला आवश्यक तितकी वीज मिळत आहे आणि ती मिळत राहील. केवळ दिल्लीच नाही तर देशातील सर्व वीज केंद्रांना गरजेनुसार गॅस मिळत राहील. टाटाने मेसेज पाठवून पॅनिक केलं, त्यामुळे त्यांना ताकीद देण्यात आलीय. जर असे घडले तर कारवाई केली जाईल. कारण, हा बेजबाबदारपणा आहे.
आरके सिंह म्हणाले की, आजच्या तारखेला 4 दिवसांपेक्षा जास्त स्टॉक आहे. काल 1.8 दशलक्ष टनापेक्षा जास्त साठा होता. सध्या 4 दिवसांचा स्टॉक असून हळूहळू वाढत आहे. पूर्वीप्रमाणे, जरी 17 दिवसांचा साठा नसला तरी 4 दिवसांपेक्षा जास्त आहे आणि येत्या काही दिवसांत तो अधिक चांगला होईल. मंत्री म्हणाले की आमची मागणी वाढली आहे. आम्ही आयात थोडी कमी केली आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी काम केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)