एक्स्प्लोर

‘न्यू इंडिया’तूनच डॉ. आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल : पंतप्रधान मोदी

‘मन की बात’ कार्यक्रमातून बोलताना पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पात शेतमालाला योग्य हमीभावासाठी मोठा निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार केला. तसेच, न्यू इंडियातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नवी दिल्ली : एकीकडे देशाच्या विविध भागात शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु असताना, दुसरीकडे ‘मन की बात’ कार्यक्रमातून बोलताना पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पात शेतमालाला योग्य हमीभावासाठी मोठा निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार केला. तसेच, न्यू इंडियातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतमालाला हामीभावासाठी मोठा निर्णय पंतप्रधान मोदी म्हणाले की, “सरकारने हामीभावासंदर्भात जो निर्णय घेतला आहे. त्यात शेतमजूरांना दिला जाणारा मोबदला, पशुधन, उपकरणांवर झालेला खर्च, बियाणे खरेदीची किंमत, खतं, सिंचनावरील खर्च, जमिनीचा मोबदला आणि त्यावरील व्याज, जर एखाद्याने जमीन भाडेतत्वावर घेतली असली तर त्याचं भाडं आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाचे कष्ट यासर्वांचे मुल्यमापन करुन हामीभाव ठरवला जाईल.” पंतप्रधान पुढे म्हणाले की, “शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची योग्य किंमत मिळावी यासाठी,  देशात अॅग्रीकल्चर मार्केटिंग रिफॉर्मवरही सरकार काम करत आहे.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण दरम्यान, त्यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचंही स्मरण करुन, ‘ग्राम स्वराज अभियाना’ची घोषणा केली. 14 एप्रिल ते 5 मेपर्यंत हे अभियान देशात राबवलं जाणार असून, याअंतर्गत ग्रामविकास, गरिबी कल्याण आणि सामाजिक न्याय आदी विषयांवर विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, असं सांगून देशातील सर्व नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले. 'डॉ. बाबासाहेबांनी औद्योगिकीकरणाची संकल्पना मांडली' डॉ. बाबासाहेबांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या व्हिजनवर काम करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकाळात औद्योगिकीकरणाची संकल्पना मांडली होती. उद्योगांचा विकास शहरातच होणं शक्य असल्याने, त्यांचा शहरीकरणावर विश्वास होता.” ते पुढे म्हणाले की , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या याच व्हिजनला पुढे नेताना, स्मार्ट सिटी, अर्बन मिशनची सुरुवात केली. ज्यातून महानगरांप्रमाणेच छोट्या शहरातही सर्व प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होईल.” देशभरात तीन हजार जनऔषधी केंद्र सुरु स्वच्छ भारत आणि स्वस्थ भारत दोन्ही एकमेकाला पूरक असल्याचं सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, “स्वस्थ भारतासाठी आरोग्य मंत्रालय विविध राज्यातील आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्यातून काम करत आहे. सध्या देशभरात तीन हजार जनऔषधी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्रातून 800 पेक्षा जास्त औषधे माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या औषध केंद्रांवर हृदय रुग्णांसाठी हार्ट स्टँडची किंमत 85 टक्क्यापेक्षा कमी आहे.” एमबीबीएसच्या जागा 68 हजारावर ते पुढे म्हणाले की, “आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत 50 कोटी नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या जागाही वाढवून 68 हजार करण्यात आल्या आहेत,” असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय, विविध राज्यांमध्ये एम्स रुग्णालय सुरु करण्यात येत असल्याचं सांगून, आगामी काळात प्रत्येकी तीन जिल्ह्यांमध्ये एक नवीन मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येणार असल्याचंही त्यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, आगामी काळात येणाऱ्या विविध सणांसाठी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना शुभेच्छाही यावेळी दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

NEET Re Exam: नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
सी-फूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती; अवघ्या पंचविशीतील 7 महिलांचा तडफडून मृत्यू; 65 हून अधिक जखमी, 9 जण व्हेंटिलेटरवर
सी-फूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती; अवघ्या पंचविशीतील 7 महिलांचा तडफडून मृत्यू; 65 हून अधिक जखमी, 9 जण व्हेंटिलेटरवर
Abhijeet Dipke: आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहोत तर अशी वागणूक, आम्ही काय आतंकवादी आहोत का? अभिजित दीपकेंचा संतप्त सवाल
आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहोत तर अशी वागणूक, आम्ही काय आतंकवादी आहोत का? अभिजित दीपकेंचा संतप्त सवाल

व्हिडीओ

Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
Omraje Nimbalkar: 'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Bhaskar Jadhav: 'भास्करराव जाधव आजकाल..' थेट मिलिंद नार्वेकरांवर चिडलेला तो व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टिप्पणी!
'भास्करराव जाधव आजकाल..' थेट मिलिंद नार्वेकरांवर चिडलेला तो व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टिप्पणी!
NEET Re Exam: नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
Video: एकनाथ शिंदेंसाहेबांच्या नेतृत्वात काम करणार, ओमराजेंची घोषणा; निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा फोन, ठाकरेंबद्दलही बोलले
Video: एकनाथ शिंदेंसाहेबांच्या नेतृत्वात काम करणार, ओमराजेंची घोषणा; निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा फोन, ठाकरेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
Embed widget