एक्स्प्लोर

‘न्यू इंडिया’तूनच डॉ. आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल : पंतप्रधान मोदी

‘मन की बात’ कार्यक्रमातून बोलताना पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पात शेतमालाला योग्य हमीभावासाठी मोठा निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार केला. तसेच, न्यू इंडियातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नवी दिल्ली : एकीकडे देशाच्या विविध भागात शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु असताना, दुसरीकडे ‘मन की बात’ कार्यक्रमातून बोलताना पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पात शेतमालाला योग्य हमीभावासाठी मोठा निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार केला. तसेच, न्यू इंडियातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतमालाला हामीभावासाठी मोठा निर्णय पंतप्रधान मोदी म्हणाले की, “सरकारने हामीभावासंदर्भात जो निर्णय घेतला आहे. त्यात शेतमजूरांना दिला जाणारा मोबदला, पशुधन, उपकरणांवर झालेला खर्च, बियाणे खरेदीची किंमत, खतं, सिंचनावरील खर्च, जमिनीचा मोबदला आणि त्यावरील व्याज, जर एखाद्याने जमीन भाडेतत्वावर घेतली असली तर त्याचं भाडं आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाचे कष्ट यासर्वांचे मुल्यमापन करुन हामीभाव ठरवला जाईल.” पंतप्रधान पुढे म्हणाले की, “शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची योग्य किंमत मिळावी यासाठी,  देशात अॅग्रीकल्चर मार्केटिंग रिफॉर्मवरही सरकार काम करत आहे.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण दरम्यान, त्यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचंही स्मरण करुन, ‘ग्राम स्वराज अभियाना’ची घोषणा केली. 14 एप्रिल ते 5 मेपर्यंत हे अभियान देशात राबवलं जाणार असून, याअंतर्गत ग्रामविकास, गरिबी कल्याण आणि सामाजिक न्याय आदी विषयांवर विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, असं सांगून देशातील सर्व नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले. 'डॉ. बाबासाहेबांनी औद्योगिकीकरणाची संकल्पना मांडली' डॉ. बाबासाहेबांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या व्हिजनवर काम करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकाळात औद्योगिकीकरणाची संकल्पना मांडली होती. उद्योगांचा विकास शहरातच होणं शक्य असल्याने, त्यांचा शहरीकरणावर विश्वास होता.” ते पुढे म्हणाले की , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या याच व्हिजनला पुढे नेताना, स्मार्ट सिटी, अर्बन मिशनची सुरुवात केली. ज्यातून महानगरांप्रमाणेच छोट्या शहरातही सर्व प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होईल.” देशभरात तीन हजार जनऔषधी केंद्र सुरु स्वच्छ भारत आणि स्वस्थ भारत दोन्ही एकमेकाला पूरक असल्याचं सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, “स्वस्थ भारतासाठी आरोग्य मंत्रालय विविध राज्यातील आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्यातून काम करत आहे. सध्या देशभरात तीन हजार जनऔषधी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्रातून 800 पेक्षा जास्त औषधे माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या औषध केंद्रांवर हृदय रुग्णांसाठी हार्ट स्टँडची किंमत 85 टक्क्यापेक्षा कमी आहे.” एमबीबीएसच्या जागा 68 हजारावर ते पुढे म्हणाले की, “आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत 50 कोटी नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या जागाही वाढवून 68 हजार करण्यात आल्या आहेत,” असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय, विविध राज्यांमध्ये एम्स रुग्णालय सुरु करण्यात येत असल्याचं सांगून, आगामी काळात प्रत्येकी तीन जिल्ह्यांमध्ये एक नवीन मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येणार असल्याचंही त्यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, आगामी काळात येणाऱ्या विविध सणांसाठी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना शुभेच्छाही यावेळी दिल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujjwal Nikam : उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्जवल निकम यांना उमेदवारी : ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 April 2024 :  ABP MajhaAjit Pawar Pune : अजित पवारांकडून  सुप्रिया सुळेंची नक्कल : ABP MajhaRatnagiri Sabha : रत्नागिरीत मनसे आणि ठाकरे गटाला सभेच्या वेळेवरून 'ठसन'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Manoj Jarange : मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं
मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Abhijeet Patil: माढ्यातील मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांचा डबल धमाका, शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याला गळाला लावलं
माढ्यातील मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांचा डबल धमाका, शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याला गळाला लावलं
Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
Embed widget