एक्स्प्लोर

Mann Ki Baat: काश्मीर जळत राहावं हे दहशतवाद्यांच्या आकांना वाटतं; पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय मिळेल, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचा पुन्हा इशारा

Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या "मन की बात" भाषणामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले आहे.

Mann Ki Baat: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, आज (27एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात पुन्हा एकदा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममधील पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या "मन की बात" (Mann Ki Baat) च्या भाषणात पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरती भाष्य केले आहे. "मन की बात" (Mann Ki Baat) मध्ये बोलताना मोदी म्हणाले, जेव्हा मी तुमच्याशी मनापासून बोलतो तेव्हा माझ्या मनात खूप वेदना होतात. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने प्रत्येक नागरिकाला दुःख झाले आहे. प्रत्येक भारतीयाची शोकग्रस्त कुटुंबांबद्दल तीव्र सहानुभूती आहे. दहशतवादी आणि त्यांचे आका काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करू इच्छितात आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

काश्मीर जळत राहावं असं दहशतवाद्यांच्या आकांना वाटतं.

आज मन की बात करताना मनात खूप पीडा झाली आहे. हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या वेदना मी समजू शकतो. पहलगामचा हल्ला दहशतवाद्यांचा हताशपणा दाखवणारा आहे. काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित होत होती. शाळा-कॉलेजेस सुरु होते, पर्यटक वाढत होते. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असताना हल्ला झाला. देशाच्या दुश्मनांना काश्मीर पूर्वपदावर येऊ नये वाटतं. काश्मीर जळत राहावं असं दहशतवाद्यांच्या आकांना वाटतं. जम्मू-काश्मिरच्या लोकांना दहशतवाद्यांचं हे कृत्य आवडलं नाही. दहशतवादाविरूद्धच्या या युद्धात 140 कोटी भारतीय एक झाले, मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय मिळेल, न्याय नक्की मिळेल. या हल्ल्यातील दोषी आणि कट रचणाऱ्यांना सर्वात कठोर उत्तर दिले जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना मन की बातमध्ये म्हटलं आहे. 

जागतिक नेत्यांनीही मला फोन केले आहेत

देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प बळकट करायचा आहे. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी लागेल. आज जग पाहत आहे, या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे. भारतातील लोकांमध्ये जो राग आहे, तो जगभर आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. जागतिक नेत्यांनीही मला फोन केले आहेत, पत्रे लिहिली आहेत आणि संदेश पाठवले आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
Gas Shortage ECA Act: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
Gas Shortage ESMA: देशभरात गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ESMA कायदा लागू, नक्की काय होणार?
देशभरात गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ESMA कायदा लागू, नक्की काय होणार?
NCERT: 'न्यायपालिकेतील भ्रष्टाचार' प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने फटकारलं, NCERT ने मागितली बिनशर्त माफी; आठवीच्या पुस्तकातील 'तो' धडा पुन्हा लिहिणार
'न्यायपालिकेतील भ्रष्टाचार' प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने फटकारलं, NCERT ने मागितली बिनशर्त माफी; आठवीच्या पुस्तकातील 'तो' धडा पुन्हा लिहिणार

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget