एक्स्प्लोर

निर्वासित हिंदूंना मोदी सरकार देणार आसरा

मुंबई : पाकिस्तान, आफगाणिस्तान आणि बांग्लादेश आदी देशांमधून निर्वासित झालेल्या हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन समाजातील बांधवांना मोदी सरकार लवकरच भारतीय नागरिकत्व देणार आहे.   मोदी सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये धार्मिक आत्याचारामुळे त्रस्त असलेल्या पाकिस्तानमधील हिंदूना भारतात स्थायिक होणे सोपे होणार आहे. यासाठी केंद्र सरकार विद्यमान भारतीय नागरिकत्व प्रदान करण्याच्या कायद्यात बदल करून हा कायदा मंजूरीसाठी संसदेसमोर मांडणार आहे.   पाकिस्तान आणि बांग्लादेश येथून निर्वासित होऊन आलेले हिंदू आणि इतर समुदायातील लाखो नागरिक सध्या टर्म व्हिसाद्वारे भारतात वास्तव्यास आहेत. त्यांना मोदी सरकार १५ ऑगस्टनंतर भारतीय नागरिकत्व प्रदान करू शकते.   केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै आणि ऑगस्टदरम्यान होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी 'सिटिझनशिप अॅक्ट 1955' मध्ये संशोधन करून नवा ड्राफ्ट तयार करीत आहे. या प्रस्तावाला सध्या अंतिम रुप देण्यात येत असून या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी मिळू शकते. सध्या या प्रस्तावात मंत्रिमंडळाने सुचवलेल्या सूचना अंतर्भूत करण्यात येत आहेत.   काय असतील बदल   १). निर्वासितांना भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी आपला मूळ देश सोडलेला दाखला सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही २). भारतीय नागरिकत्वासाठी कराव्या लागणाऱ्या रजिस्ट्रेशन फीमध्येही कपात करण्यात आली आहे. पूर्वी एका नागरिकाला रजिस्ट्रेशनसाठी पाच हजार रुपये भरावे लागत होते. आता फक्त शंभर रुपये भरावे लागणार आहेत.   ३). तसेच अर्जांची छाननी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस आयुक्त करतील ४). निर्वासितांना बँक अकाउन्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवण्याचीही मंजूरी देण्यात येणार आहे.   २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या निवडणूक घोषणापत्रात पाकिस्तानमध्ये धार्मिक आत्याचारांना बळी पडणाऱ्या हिंदूंना भारत आसरा देईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसारच प्रस्तावित कायद्यात बदल करून निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू आहे.   हे बदल पाकिस्तानसोबतच बांग्लादेश आणि आफगाणिस्तानमधूनही निर्वासित झालेल्यांनाही लागू होतील. एका सर्वेक्षणानुसार, जवळपास दोन लाख हिंदू या तिन्ही देशांमधून निर्वासित होऊन भारताच्या आश्रयाला आहेत.   2010च्या आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्य़े 33 लाख 30 हजार हिंदू आहेत. तर बांग्लादेशमध्ये 1 कोटी 26 लाख हिंदू आहेत. मोदी सरकारने एप्रिलमध्ये ज्या राज्यातील 400 निर्वासित छावण्यांमध्ये दोन लाख निर्वासित आश्रयाला आहेत, त्यांच्याशीही चर्चा केली होती.   दरम्यान, या बिलाला विरोधक मंजूर करू देणार नाही अशी शक्यता आहे. मात्र मोदी सरकार हे बिल मानव धर्माचे पालन करण्याच्या आधारावर पास करून घेण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, रोजगारासोबतच, मोठी गुंतवणूकही, भारताला कोणते फायदे मिळणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, रोजगारासोबतच, मोठी गुंतवणूकही, भारताला कोणते फायदे मिळणार?
India Russia Deal : युरीया दुप्पट किमतीने खरेदी करावा लागल्यानंतर भारताची कूटनीती, रशियाशी करार अन् होर्मुझ समस्येवर तोडगा
युरीया दुप्पट किमतीने खरेदी करावा लागल्यानंतर भारताची कूटनीती, रशियाशी करार अन् होर्मुझ समस्येवर तोडगा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 तारखेला पगार जमा होणार नाही, पुढच्या महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद
कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 तारखेला पगार जमा होणार नाही, पुढच्या महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
Embed widget