एक्स्प्लोर

Chirag Kumar Paswan : एनडीएमध्ये चर्चा होती नितीश कुमार अन् चंद्राबाबंचूी, पण खरी डोकेदुखी पीएम मोदींच्या हनुमानाने वाढवली आहे का?

लॅटरल एन्ट्री, वक्फ बिल मुद्यावरून इंडिया आघाडीने एनडीए सरकारची चांगलीच कोंडी केली. यामुळे लॅटरल एन्ट्रीचा निर्णय गुंडाळावा लागला. वक्फ बिल सुद्धा संयुक्त संसदीय समितीकडे पाठण्यात आले.

Chirag Kumar Paswan : गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्ष सक्षम झाल्याने मोदी सरकारला बॅकफूटवर यावं लागलं आहे. लॅटरल एन्ट्री (Lateral Entry in Civil Services) वक्फ बिल (waqf bill in parliament) मुद्यावरून इंडिया आघाडीने एनडीए सरकारची चांगलीच कोंडी केली. यामुळे लॅटरल एन्ट्रीचा निर्णय गुंडाळावा लागला. वक्फ बिल सुद्धा संयुक्त संसदीय समितीकडे पाठण्यात आले. तथापि, एनडीए सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार भाजपसाठी डोकेदुखी ठरतील, अशी चर्चा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्द्यांवर केंद्रीय मंत्री आणि लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांची भूमिका पाहता त्यांनी मोदी सरकारची डोकेदुखी वाढवल्याची चर्चा रंगली आहे. ते एनडीएमध्ये आहेत पण त्यांची भूमिका अनेक मुद्द्यांवर सरकारपेक्षा वेगळी आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेशी ते असहमत व्यक्त करत आहेत. वेगळी भूमिका स्वीकारत आहे. विरोधकांच्या आवाजात बोलू लागल्याने भूवया उंचावल्या आहेत. 

अडीच महिन्यात चारवेळा झटका

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर चिराग पासवान यांची भूमिका केंद्र सरकारच्या विरुद्ध होती. कळीचा मुद्दा झालेल्या जातीय जनगणना होण्यासाठी विरोधकांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यांनी जातीची जनगणना झाली पाहिजे असे म्हटले आहे. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी जात जनगणनेची मागणी लावून धरली आहे. विरोधकांसोबतच चिराग यांनी केंद्र सरकारच्या लॅटरल एन्ट्रीच्या निर्णयालाही विरोध केला. आरक्षणाबाबतही त्यांची भूमिका त्यांच्या मित्रपक्षांपेक्षा वेगळी होती.

चिराग पासवान असे का करत आहेत?

दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाचा एससी-एसटी आरक्षणाबाबतचा निर्णय क्रिमीलेअरबाबत आला. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, SC-ST मध्ये क्रिमीलेअर ठरवायला हवे. कोर्टाच्या निर्णयावर चिराग पासवान यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे चिराग पासवान असे का करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चिराग पासवान यांच्या मनात काय चाललं आहे, अशी चर्चा रंगली आहे. मतांचे समीकरण चिराग यांना एनडीएपासून वेगळी वाट धरण्यास भाग पाडत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चिराग पासवान यांंचा मूळ मतदार पासवान आहे. बिहारमध्ये पासवान मतदार पाच टक्के आहेत. अशा स्थितीत अन्य वर्गाच्या पाठिंब्याशिवाय राजकारणात मोठे काही करणे शक्य नाही, असे चिराग पासवान यांना वाटते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

चिराग पासवान यांना मोठे मंत्रिपद हवे आहे का?

प्रश्न असाही आहे की लोकसभा निवडणुकीत 100 टक्के स्ट्राइक रेट असलेल्या चिराग पासवान यांना मोठे मंत्रिपद हवे आहे का? झारखंड विधानसभा निवडणुकीत आणि पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत जास्त जागांची गरज आहे म्हणून दबावाचे राजकारण करत आहेत का? अशीही चर्चा आहे. रांची येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चिराग यांनी 28 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

भाजपने चिराग यांना निरोप देण्याचा प्रयत्न केला

दुसरीकडे भाजप चिराग पासवान यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. चिराग पासवान यांना ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस यांनी २६ ऑगस्ट रोजी अमित शहा यांची भेट घेतली होती. यापूर्वी बिहार भाजप अध्यक्ष पशुपती यांनी पारस यांची भेट घेतली होती. पारस हे चिराग पासवान यांचे कट्टर विरोधक आहेत. भाजप उघडपणे बोलत नसला तरी चिराग पासवान यांना थेट संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोजपा रामविलासचे प्रवक्ते प्रा. विनीत सिंह म्हणाले की, काही बाबींवर चिराग पासवान यांची भूमिका स्पष्ट आहे. सार्वजनिक चिंतेचा प्रश्न असो, विशेषत: उपेक्षित समाजाचा, जो समाज आजही अस्पृश्यतेने ग्रासलेला आहे, तो प्रश्न आपण आवाजाने मांडत असतात.

उदाहरणार्थ, एससी-एसटीमधील क्रिमीलेअर असो, वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक असो किंवा जात जनगणना असो, आम्ही हे मुद्दे एनडीएच्या व्यासपीठावर प्रभावीपणे मांडले आहेत. एनडीए ही लोकशाही आघाडी आहे. आपण त्याचे महत्त्वाचे घटक आहोत. आम्हाला आमच्या चिंता एनडीएच्या व्यासपीठावर मांडण्याचा अधिकार आहे.

आरजेडीचा दावा, सर्व काही आलबेल नाही

दुसरीकडे, आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, केंद्रात एनडीएचे सरकार आहे आणि एनडीएमध्ये सर्व काही ठीक नाही. केंद्र सरकारच्या प्रश्नावर चिराग पासवान सातत्याने वेगवेगळे मत व्यक्त करत आहेत. झारखंडमध्येही स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. एनडीएमध्ये प्रादेशिक पक्षांना प्राधान्य दिले जात नाही. चिराग यांचे काका पशुपती पारस यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. आता भाजप चिराग यांना डोळे दाखवत आहे. एनडीएची बोट बुडणार आहे. भाजपचे प्रवक्ते कुंतल कृष्णा म्हणाले की, चिराग आमचा मित्र आहे. ते केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. एवढे होऊनही चिरागचे भाजप किंवा केंद्र सरकारशी कोणत्याही विषयावर मतभेद असतील, तर त्यांचे मत संयमाने ऐकून घेतले जाईल. ही एनडीएची खासियत आहे. एनडीएमध्ये काँग्रेस आणि आरजेडीची घराणेशाही आणि हुकूमशाही नाही की राजपुत्र आणि हुकूमशहा जे बोलतील ते होईल.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijay : शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत; 2015 मधील घटनेवर गुन्हा दाखल करण्याची हायकोर्टात मागणी
शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत; 2015 मधील घटनेवर गुन्हा दाखल करण्याची हायकोर्टात मागणी
मोठी बातमी, सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना
सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना
Akhilesh Yadav : अखिलेख यांच्या समाजवादी पक्षाचा I-PAC सोबतचा राजकीय प्लॅन रद्द; पश्चिम बंगाल, तामिळनाडू निकालापासून धडा 
अखिलेख यांच्या समाजवादी पक्षाचा I-PAC सोबतचा राजकीय प्लॅन रद्द; पश्चिम बंगाल, तामिळनाडू निकालापासून धडा 
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतीत 12 ते 15 टक्क्यांची घसरण, नेमकं कारण काय?
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतीत 12 ते 15 टक्क्यांची घसरण, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Punjab Blast : पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रीय? Special Report
Bengal Violance : बंगाल, बदला आणि बुलडोझर Special Report
Nasrapur Case : पोलीस इन अॅक्शन, नसरापुरात मध्यरात्री रिक्रिएशन Special Report
Parvati Case Mother Reaction : पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी
Congress Leaders Meet TVK Vijay Thalapathy : तामिळनाडू काँग्रेस नेत्यांनी घेतली 'विजय' यांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thalapathy Vijay : शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत; 2015 मधील घटनेवर गुन्हा दाखल करण्याची हायकोर्टात मागणी
शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत; 2015 मधील घटनेवर गुन्हा दाखल करण्याची हायकोर्टात मागणी
मोठी बातमी, सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना
सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना
SRH vs PBKS : कूपर कॉनोलीचं शतक वाया, श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सलग तिसऱ्या पराभव, सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत टॉपवर   
श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जच्या पराभवाची हॅटट्रिक, गुणतालिकेतील पहिलं स्थान गमावलं, सनरायजर्स हैदराबाद टॉपवर
Election Result : बंगाल-आसाममध्ये भाजपचा नवा ट्रेंड, अनुसूचित जाती जमातींच्या जागांवर दमदार कामगिरी
बंगाल-आसाममध्ये भाजपचा नवा ट्रेंड, अनुसूचित जाती जमातींच्या जागांवर दमदार कामगिरी
राष्ट्रहिताचं काम डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल; गोव्यातील अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे प्रतिपादन
राष्ट्रहिताचं काम डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल; गोव्यातील अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे प्रतिपादन
Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं मोडला आयपीएलमधील रोहित शर्माचा विक्रम, महेंद्रसिंह धोनीची बरोबरी करण्याचा मान मिळवला
अभिषेक शर्मानं मोडला आयपीएलमधील रोहित शर्माचा विक्रम, महेंद्रसिंह धोनीची बरोबरी करण्याचा मान मिळवला
शैक्षणिक पंढरीत बोगस शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून 13 शाळांची यादी जाहीर, पालकांना सूचना, प्रवेश घेऊ नका
शैक्षणिक पंढरीत बोगस शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून 13 शाळांची यादी जाहीर, पालकांना सूचना, प्रवेश घेऊ नका
West Bengal : पश्चिम बंगालमध्ये हिंसा उफळली, चार जणांचा मृत्यू; गेल्या 15 वर्षांचा रक्तरंजित इतिहास, किती जणांची हत्या?
पश्चिम बंगालमध्ये हिंसा उफळली, चार जणांचा मृत्यू; गेल्या 15 वर्षांचा रक्तरंजित इतिहास, किती जणांची हत्या?
Embed widget