एक्स्प्लोर

नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

पाटणा: बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर सीबीआयने केलेल्या छापेमारीनंतर, लालू आणि नितीश कुमार यांच्यातील संबंध ताणले होते. त्याचा शेवट आज नितीश कुमार यांच्या राजीनाम्याने झाल्याचं सध्यातरी पाहायला मिळतं. नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया “बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती सुरु आहे, त्यामध्ये काम करणं अशक्य झालं आहे.  लालू यादव आणि काँग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही”, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राजीनाम्यानंतर दिली. राजकीय भूकंप बिहारमध्ये, हादरे महाराष्ट्रात? जेडीयूच्या आमदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) : 
  • आरजेडी (लालू) – 80
  • जेडीयू (नितीश कुमार) – 71
  • काँग्रेस – 27
  • भाजप – 53
  • सीपीआय – 3
  • लोक जनशक्ती पार्टी – 2
  • राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
  • हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
  • अपक्ष – 4
सध्या बिहारमध्ये आरजेडी, जेडीयू आणि काँग्रेसचं सरकार आहे. ज्यांचे एकूण 178 आमदार आहेत. जे बहुमतापेक्षाही 56 अधिक आहेत. नितीश कुमार यांना सरकार बहुमतात ठेवायचं असेल तर, जुने मित्र पक्ष एनडीएकडे यावं लागेल, ज्यामध्ये त्यांना भाजपचा पाठिंबा मिळेल. नितीश कुमार एनडीएकडे आल्यास आकडा 129 एवढा होतो, जो बहुमतापेक्षा जास्त आहे. काय आहे नेमकं प्रकरण? बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली होती. या छापेमारीत तेजस्वी यादव यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती. दुसरीकडे  लालू प्रसाद यादव यांनी राजदच्या आमदारांची बैठक घेऊन, तेजस्वी यादव पदाचा राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलं. तर तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला होता. बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे. या छापेमारीनंतर  गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचं बोलणंही बंद झालं आहे. त्याचा भाग म्हणून बिहारमध्ये झालेल्या एका सरकारी कार्यक्रमाला नितीश कुमारांची हजेरी होती, पण उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दांडी मारली होती. ....म्हणून मी राजीनामा दिला : नितीश कुमार “मी राज्यपालांना भेटून राजीनामा दिला. गेल्या 20 महिन्यात बिहारमध्ये महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या. लालू यादव आणि काँग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही.  गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती आहे, त्यामध्ये काम करणं अशक्य झालंय. नोटाबंदीचं समर्थन केलं तरीही माझ्यावर आरोप करण्यात आले. आम्ही राजकारण करतच नाही, काहीही मार्ग नाही पाहून स्वतःच राजीनामा दिला”, असं नितीश कुमार म्हणाले. LIVE UPDATE : नितीश कुमार यांचा राजीनामा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नितीश कुमारांचं अभिनंदन https://twitter.com/abpmajhatv/status/890205662705143808 123
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, रोजगारासोबतच, मोठी गुंतवणूकही, भारताला कोणते फायदे मिळणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, रोजगारासोबतच, मोठी गुंतवणूकही, भारताला कोणते फायदे मिळणार?
India Russia Deal : युरीया दुप्पट किमतीने खरेदी करावा लागल्यानंतर भारताची कूटनीती, रशियाशी करार अन् होर्मुझ समस्येवर तोडगा
युरीया दुप्पट किमतीने खरेदी करावा लागल्यानंतर भारताची कूटनीती, रशियाशी करार अन् होर्मुझ समस्येवर तोडगा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 तारखेला पगार जमा होणार नाही, पुढच्या महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद
कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 तारखेला पगार जमा होणार नाही, पुढच्या महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
Embed widget