एक्स्प्लोर

उरी हल्ल्याचा सूड घेणारच, 'मन की बात'मधून मोदींचा पुनरुच्चार

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमामध्ये उरी हल्ल्याचा सूड घेणारच असा पुनरुच्चार केला. तसेच या हल्ल्याचा आक्रोश जनतेच्या एकजुटीचं प्रतीक असल्याचेही उद्गार त्यांनी यावेळी काढले. पंतप्रधानांनी आपल्या कार्यक्रमात उरीमध्ये हल्ला करून नरसंहार घडवणाऱ्य़ा दोषींना शिक्षा देणारच, असा पुनरूच्चार करुन या हल्ल्यातील 18 शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच देशाच्या रक्षणासाठी आपले सैनिक कशा प्रकारे पराक्रम करत आहेत, याची माहिती दिली. ते म्हणाले की, ''देशवासिय आनंदात राहावेत यासाठी आपले सैनिक सीमेवर पराक्रमांची पराकाष्ठा करत आहेत, असेही ते म्हणाले. नागरिकांना आणि राजकीय नेत्यांना बोलण्याच्या अनेक संधी मिळतात. मात्र सैन्य बोलत नाही. तर आपल्या पराक्रमाच्या माध्यमातून करुन दाखवतं.'' यासोबतच त्यांनी काश्मीरमधील जनतेला शांततेचे आवाहन केले. ते म्हणाले की, ''काश्मीरमधील जनतेला देश-विघातक शक्तींचे मनसुबे समजले आहेत. त्यामुळे त्यांना बाजूला सारुन शांततेच्या मार्गावरुन ते मार्गस्थ झाले आहेत. आपण सर्वजण एकत्र येऊन, नव्या पिढीला उत्तम मार्ग उपलब्ध करुन देऊ.'' ते पुढे म्हणाले की, ''उरीमधील हल्ल्यानंतर भारतीय जनतेत जो आक्रोश निर्माण झाला आहे, तो राष्ट्रीय चेतनेचं प्रतिक आहे. बॉम्ब आणि बंदुकीच्या आवाजातही देशभक्ती प्रकट करण्याचा तो मार्ग आहे.'' असं ते म्हणाले. पॅरालिम्पिकमधील पदक विजेत्यांचे अभिनंदन पंतप्रधानांनी यावेळी पॅरालिम्पिकमधील पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी दिव्यांग खेळाडूंनी सामान्य खेळाडूच्या तोडीस-तोड कामगिरी केली असल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी पॅरालिम्पिकमधील गोळाफेकपटू दीपा मलिकचं विशेष कौतुक केलं. ते म्हणाले की, दीपा मलिकने जेव्हा पदकाची कमाई केली तेव्हा, हे पदक आपल्या विकलांगतेलाच हरवले असल्याची प्रतिक्रीया दिली होती.'' स्वच्छ भारत अभियानाची आठवण पंतप्रधानांनी यावेळी गांधी जयंतीचे औचित्य साधून 'स्वच्छ भारत अभियाना'ची पुन्हा आठवण करुन दिली. ते म्हणाले की, ''दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त मी स्वच्छता हा स्वभाव बनला पाहिजे असं म्हटलं होतं.'' प्रत्येक नागरिकाचं स्वच्छता हे कर्तव्य असलं पाहिजं असे सांगून त्यांनी या अभियानाअंतर्गत शौचालय निर्मितीच्या कामाबद्दल माहिती सांगितली. ते म्हणाले की, ''तुम्ही आता 1969 फोन क्रमांकावर फोन करुन शौचालयांच्या निर्मितीच्या कामासोबतच नवीन शौचालय बनवण्यासाठी अर्जही करु शकाल,'' असे सांगितले. संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची 2 वर्षे 

महत्त्वाच्या बातम्या

Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget