एक्स्प्लोर

एकटी काँग्रेस मोदींना हरवू शकत नाही: मणिशंकर अय्यर

नवी दिल्ली: स्वातंत्र्योत्तर काळात सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसवर आज अस्तित्व शोधण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्याच्या निवडणुकीनंतर तर काँग्रेसच्या नेतृत्वावरच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या एका वक्तव्यानं ही चर्चा सुरु झाली. या  संपूर्ण परिस्थितीबाबत मणिशंकर अय्यर यांनी ‘एबीपी माझा’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या भावी वाटचालीविषयी आपली मतं मांडली. ‘काँग्रेसला काही भविष्यच नाही अशी स्थिती बिल्कुल नाही, पण एकटी काँग्रेस मोदींना हरवू शकत नाही हे देखील खरं आहे. त्यामुळे २००४ मध्ये सोनियांनी ज्या पद्धतीनं अनेक पक्षांना सोबत घेतलं तसं राहुल गांधींनी आता करावं. मोदी मुक्त भाजप आणि भाजप मुक्त भारत करायची गरज आहे.’ असं स्पष्ट मत अय्यर यांनी व्यक्त केलं. ‘उत्तर प्रदेशमध्ये भाजपला भले ३२५ जागा मिळाल्या. पण अजूनही साठ टक्के लोकांचं मतदान मोदींच्या विरोधात आहे. २०१४ मध्येही सत्तर टक्के लोकांनी मोदींना मत दिलेलं नाही. आम्ही विखुरलेले आहोत त्याचाच फायदा भाजपला झाला.’ असंही अय्यर म्हणाले. मोदींना रोखायला शिवसेनेलाही सोबत घेणार का?... यावर मणिशंकर अय्यर यांचं उत्तर: ‘मोदींना रोखायला शिवसेनेलाही सोबत घेणार का? याबाबत अय्यर म्हणाले की, ‘होमिओपॅथिमध्ये विष काढायला आणखी जहरी विषाचा वापर होतो, पण राजकारणात असं करता येत नाही. जे एकात्म भारताच्या कल्पनेचं स्वागत करतात, त्यांना सोबत घ्यायला हवं.’ असं म्हणत अय्यर यांनी शिवसेनेला सोबत न जाण्याचं स्पष्ट केलं. ‘राहुल गांधींविरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढायला कुणी तयार होत नाही. सोनियांच्या विरोधात जे जितेंद्र प्रसाद लढले त्यांचं काय झालं?  केवळ राहुल गांधींना नावं ठेवून चालणार नाही, संघटनही मजबूत करायला हवं. ‘ असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं. ‘मोदी आता ज्या योजनांची महती गात आहेत, ते काँग्रेसचे कार्यक्रम आहेत. आता फक्त त्याला भगवा रंग दिला गेला आहे. प्रादेशिक पातळीवरच्या नेत्यांना काँग्रेसमध्ये संधी मिळत नाही. ही गोष्ट काही प्रमाणात खरी आहे.’  असंही अय्यर यांनी सांगितलं. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, पावसाळी अधिवेशनापूर्वी 'ऑपरेशन टायगर'वर फैसला होणार? 
ठाकरेंच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, पावसाळी अधिवेशनापूर्वी 'ऑपरेशन टायगर'वर फैसला होणार? 
गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांना प्रत्येक महिन्याला मिळणार 10 हजार रुपये, 'या' सरकारचा मोठा निर्णय   
गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांना प्रत्येक महिन्याला मिळणार 10 हजार रुपये, 'या' सरकारचा मोठा निर्णय   
Taratala Construction Site Accident: कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!
इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!

व्हिडीओ

Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय..' संजय पाटलांचा आई बहिण काढत मस्तवालपणााचा कळस
'जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय..' संजय पाटलांचा आई बहिण काढत मस्तवालपणााचा कळस
Eknath Shinde and Sanjay Dina Patil: ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जाताच तावातावात नको ते बोलले, संजय दिना पाटलांना एकनाथ शिंदेंचा ओरडा पडला, नव्या खासदारांना सूचना
ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जाताच तावातावात नको ते बोलले, संजय दिना पाटलांना एकनाथ शिंदेंचा ओरडा पडला, नव्या खासदारांना सूचना
सत्ताधारी आमदारांमध्येच कलगीतुरा! प्रवीण दरेकर काल म्हणाले, तुमच्यापेक्षा मी 10 पटीने ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही; आज बच्चू कडू म्हणाले, 'सरकार बदनाम होत आहे त्यामुळे..'
सत्ताधारी आमदारांमध्येच कलगीतुरा! प्रवीण दरेकर काल म्हणाले, तुमच्यापेक्षा मी 10 पटीने ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही; आज बच्चू कडू म्हणाले, 'सरकार बदनाम होत आहे त्यामुळे..'
Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा 29 जूनला सुनावली जाणार, 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा 29 जूनला सुनावली जाणार, 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही
Nasrapur Case Verdict: भीमराव कांबळेला न्यायाधीश म्हणाले, 'तो प्रसंग आठव अन् तूच सांग तुला काय शिक्षा द्यायची?', नराधम म्हणाला मी....
भीमराव कांबळेला न्यायाधीश म्हणाले, 'तो प्रसंग आठव अन् तूच सांग तुला काय शिक्षा द्यायची?', नराधम म्हणाला मी....
Sanjay Dina Patil: संजय दिना पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ, म्हणाले, 'कॅमेरा बंद कर नाहीतर मी विसरुन जाईन मी खासदार आहे, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन'
संजय दिना पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ, म्हणाले, 'कॅमेरा बंद कर नाहीतर... तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन'
Narendra Mehta Mira bhayandar Land Scam : मिरा-भाईंदर जमीन खरेदी प्रकरणात भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर ठपका; जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल महसूल मंत्र्यांकडे सादर, बावनकुळे काय कारवाई करणार?
मिरा-भाईंदर जमीन खरेदी प्रकरणात भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर ठपका; जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल महसूल मंत्र्यांकडे सादर, बावनकुळे काय कारवाई करणार?
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दूरदर्शी, राष्ट्रभक्त डाॅ. केशव हेडगेवारांनी पाया रचला..' IPS विश्वास नांगरे पाटलांकडून कौतुकाचा वर्षाव, संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, काँग्रेसचा हल्लाबोल
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दूरदर्शी, राष्ट्रभक्त डाॅ. केशव हेडगेवारांनी पाया रचला..' IPS विश्वास नांगरे पाटलांकडून कौतुकाचा वर्षाव, संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, काँग्रेसचा हल्लाबोल
Embed widget