एक्स्प्लोर

Mallikarjun Kharge on PM Modi : 'नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ही देशाची शेवटची निवडणूक असेल', मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास देशात हुकूमशाही येईल, अशी भीती मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केली. त्यांनी लोकांना भाजप-आरएसएसपासून दूर राहण्याचे आवाहन देखील यावेळी केले.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा जिंकल्यास देशातील ही शेवटची निवडणूक असेल, अशी भीती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी व्यक्त केली आहे. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी 2024 च्या लोकसभा निवडणुका ही शेवटची संधी असल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हटलं. ओडिसामधील 23 जानेवारी मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.  

देशात सध्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांचं वातावरण तयार झालं आहे. त्यातच प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आलीये. मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पंतप्रधान मोदी यांच्यासह आरएसएसवर देखील भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदींनी 2024 ची देखील निवडणूक जिंकली तर देशात हुकूमशाही येईल. तसेच तुम्ही भाजप आणि आरएसएसपासून दूर राहा, असंही खरगे म्हणालेत. 

मल्लिकार्जुन खरगेंनी नेमकं काय म्हटलं?  

अजून एक गोष्ट सांगतो, ही शेवटची निवडणूक आहे. मोदीजी पुन्हा आले तर पुन्हा देशात निवडणूक होऊ देणार नाही. देशात हुकूमशाही येईल. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, आम्ही अजूनही पाहतोय, परवा आमच्या एका  हिरावून नेलं. नोटीस देऊन, घाबरवणं, धमक्या देण्याचं काम सुरु आहे, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं. 

रशियासारखीच भारताची अवस्था होईल - मल्लिकार्जुन खरगे

भीतीपोटी कुणी मैत्री सोडत आहेत, कुणी पक्ष सोडत आहेत, कुणी युती सोडत आहेत, अहो, एवढेच भयभीत लोक राहिले तर हा देश टिकेल का, हे संविधान टिकेल का, ही लोकशाही टिकेल का, म्हणून ही शेवटी संधी आहे तुम्ही मतदान करण्याची. कारण यानंतर तुम्हाला मतदान करता येणार नाही, कारण रशियात पुतिन यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक जशी असते, तशीच निवडणूक भारतात सुरु राहिल. 

'एक व्यक्ती गेल्याने इंडिया आघाडीला काही फरक पडणार नाही'

नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपसोबत पुन्हा नवं सरकार स्थापन केलं आहे. विशेष म्हणजे नितीशकुमार यांनीच विरोधकांची एकजूट असलेली इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. तसेच आता त्यांनी इंडिया आघाडीतून देखील माघार घेतलीये. यावर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, एक व्यक्ती गेल्याने इंडिया आघाडी कमकुवत होणार नाही. आम्ही भाजपला हरवूच. 

ही बातमी वाचा : 

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपचा 'मेगाप्लान'; बंगाल, बिहारनंतर आता महाराष्ट्राचा नंबर?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडेंचा घणाघात
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला

व्हिडीओ

Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Australia Sydney Terrorist Attack : ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला Special Report
John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडेंचा घणाघात
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
Ranveer Singh Deepika Padukone: आठ तासांपेक्षा जास्त काम करायला दीपिका पादुकोणची ना; आता तिचा नवरा रणवीर सिंहच म्हणतोय; 'कर लो ना थोड़ी ज्यादा शूटिंग...'
दीपिका पादुकोण म्हणते, 'आठच तासांची शिफ्ट...'; आता तिचा नवरा रणवीर सिंहच म्हणतोय; 'कर लो ना थोड़ी ज्यादा शूटिंग...'
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Embed widget