एक्स्प्लोर

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपचा 'मेगाप्लान'; बंगाल, बिहारनंतर आता महाराष्ट्राचा नंबर?

Bharat Jodo Nyay Yatra: नितीश कुमार भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परतल्याच्या एका दिवसानंतर, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' बिहारमध्ये दाखल होणार आहे.

Bharat Jodo Nyay Yatra: नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वात सध्या 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyay Yatra) सुरू आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि इंडिया आघाडीतील (India Alliance) मतभेद चव्हाट्यावर आले. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी इंडिया आघाडीशी काडीमोड घेत वेगळा संसारही थाटला. नितीश कुमार भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) परतल्याच्या एका दिवसानंतर, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' बिहारमध्ये दाखल होणार आहे. विविध विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे नितीश कुमार, ज्यांच्यामुळे इंडिया आघाडीची स्थापना झाली, त्यांनीच असा वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यामुळे राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा आणि इंडिया आघाडीला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. 

ममता बॅनर्जी, नितेश कुमारांमुळे भारत जोडो यात्रेला धक्का 

भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर 'भारत जोडो न्याय यात्रा 2.0'साठी कांग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व पक्ष उत्साहित होते. काँग्रेसकडून यात्रा सुरू होणार असल्याची घोषणा झाल्यापासूनच या यात्रेबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा होत्या. आगामी लोकसभा निवडणुकींवर या यात्रेचा मोठा परिणाम होऊ शकतो. पण, आधी ममता आणि आता नितीश कुमारांचं इंडिया आघाडीतून बाहेर पडणं यामुळे राहुल गांधींच्या यात्रेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी आणि नितेश राणे यांचा आघाडीतून बाहेर पडण्याचा टायमिंग भाजपनं ठरवलाय, यामागील मूळ हेतू राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं महत्त्व कमी करणं हाच होता. 

नितीश कुमारांचा इंडिया आघाडीशी काडीमोड

इंडिया आघाडीतून बाहेर पडून नितीश कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी आघाडीच्या संभाव्यतेला मोठा धक्का दिला आहे. नितीश कुमार विरोधी आघाडीच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक होते, ज्यांची पहिली बैठक त्यांनी गेल्या जूनमध्ये पाटण्यात बोलावली होती. गेल्या काही आठवड्यांमध्ये राजदसोबत तणाव आणि वाढत्या मतभेदाच्या बातम्यांदरम्यान, जेडीयू भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये परतली आहे. यामुळे आता बिहारमधील जागावाटपावर परिणाम होणार आहे. बिहारमध्ये आता आरजेडी आणि काँग्रेस एकत्र लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. नितीश कुमार यांचं जाणं इंडिया आघाडीसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. कारण आता निवडणुकीत विरोधकांना प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

जसं बंगाल आणि बिहारमध्ये भारत जोडो यात्रा पोहोचताच ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांना झटका दिला, तसाच प्रकार महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा पोहचल्यावर मोठा धक्का देण्याच्या तयारीत भाजप असल्याच बोललं जात आहे. मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील मोठे नेते हे भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू आहे. आता यात कितपत तथ्य असेल, भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यावर बिहार आणि पश्चिम बंगालप्रमाणेच महाराष्ट्रातील राजकारणातही खळबळ माजणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल, हे मात्र नक्की. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget