एक्स्प्लोर

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथांची भाषा राज ठाकरेंसारखी!

मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं भाषण हिंदीतलं असलं तरी तक्रार तीच... महाराष्ट्रात शिवसेना, मनसेसारख्या प्रादेशिक पक्षांचे नेते करतात तशीच. उत्तर प्रदेशातील, बिहारमधील तरुण आमच्या राज्यातले रोजगार बळकावतात.

मुंबई : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शेतकरी कर्जमाफीपाठोपाठ घेतलेला उद्योग धोरणातल्या बदलाचा निर्णय वादात सापडला आहे. ही घोषणा करताना कमलनाथ यांनी वापरलेली भाषा मनसेच्या नेत्यासारखी होती. 'मध्य प्रदेशात उद्योगासाठी सवलती पदरात पाडून घेणारे उद्योजक रोजगार मात्र उत्तर प्रदेश-बिहारमधल्या लोकांना देतात. मध्य प्रदेशातले युवक मात्र बेरोजगारच राहतात' ही कमलनाथ यांची घोषणा मनसे-शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेची री ओढणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसच नाही, तर सर्वच उत्तर भारतीय नेत्यांची अडचण होणार आहे. मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं भाषण हिंदीतलं असलं तरी तक्रार तीच... महाराष्ट्रात शिवसेना, मनसेसारख्या प्रादेशिक पक्षांचे नेते करतात तशीच. उत्तर प्रदेशातील, बिहारमधील तरुण आमच्या राज्यातले रोजगार बळकावतात. भावना प्रादेशिक अस्मितेची, स्वत:च्या राज्यातल्या तरुणांच्या हक्काच्या रक्षणाची असली तरी बोलणारे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचे नेते असले, तरी भूमिका हिंदी पट्टयाबाहेरील राज्यातल्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यासारखीच आहे. कमलनाथ म्हणाले तीच भावना हिंदी पट्ट्याबाहेरील राज्यांमध्येही खदखदत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याचा उल्लेख करत उत्तर भारतीयांचे कानही टोचले होते. 'जिथे जाल, त्या राज्याचा मान राखा. त्या राज्याची भाषा आली पाहिजे. आसाममध्ये तर गळे कापले. गुजरातमधून तुम्हाला हाकललं. मुंबईत आलात. मात्र त्याबद्दलचा प्रश्न तुम्ही नरेंद्र मोदींना नाही विचारत. तिथले मुख्यमंत्री, अमित शहा यांना कोणीच विचारत नाही!" असं राज ठाकरे म्हणाले होते. कमलनाथ यांनी राज्याचं औद्योगिक धोरणही बदललं. त्याचं कारणच तसं आहे. मध्य प्रदेशात चार दशलक्ष कोटींची गुंतवणूक झाल्याचा दावा तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला होता. मात्र त्याचवेळी राज्यातल्या बेरोजगारांची संख्या वाढतच राहिली होती. 2015 मधील 15 लाख 60 हजाराहून 2017 मध्ये 23 लाख 70 हजार झाली. म्हणजेच दोन वर्षात बेरोजगारांची संख्या सात लाख 90 हजारांनी वाढली. शिवराजांनी परिस्थिती चांगली असल्याचा दावा करताना हजारोंना रोजगार मिळाल्याचा दावा केला. मात्र त्याचवेळी राज्य आर्थिक पाहणी अहवालानुसार मध्य प्रदेशातल्या फक्त 2016 मध्ये फक्त 129 जणांना रोजगार मिळाला होता. मग इतर रोजगार गेले कुठे? त्याचं उत्तरच कमलनाथांनी दिलं आणि उपायही सांगितला. उत्तर प्रदेश-बिहारमधील तरुण मध्य प्रदेशातले रोजगार बळकावतात. कमलनाथ खरंच बोलले. पण आता एक अडचण आहे. काँग्रेसला त्यांच्या या खरं बोलल्याचा उत्तर प्रदेश, बिहारात फटका बसू शकेल. कमलनाथांच्या सत्याच्या प्रयोगाने सर्वात गोची होणार आहे, ती संजय निरुपम यांच्यासारख्या मुंबई काँग्रेसच्या तोंडाळ नेत्यांची. आता त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यानेच उत्तर प्रदेशीय, बिहारी स्थानिकांचे रोजगार बळकावत असल्याचं म्हटल्यानं निरुपम, कृपाशंकर आता महाराष्ट्रात कोणत्या तोंडानं विरोध करणार?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
इंधन टंचाईची परिस्थिती नियंत्रणात, प्रत्येक शेतकऱ्याला इंधन पुरवठा करण्याची हमी देतो, बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन
इंधन टंचाईची परिस्थिती नियंत्रणात, प्रत्येक शेतकऱ्याला इंधन पुरवठा करण्याची हमी देतो, बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
IPL 2026 : ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट? आकडेवारी काय सांगते?
ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट?
Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
RCB vs GT Qualifier 1: पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, जाणून घ्या IPL चा नियम 
पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, राखीव दिवस आहे का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
Embed widget