एक्स्प्लोर

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथांची भाषा राज ठाकरेंसारखी!

मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं भाषण हिंदीतलं असलं तरी तक्रार तीच... महाराष्ट्रात शिवसेना, मनसेसारख्या प्रादेशिक पक्षांचे नेते करतात तशीच. उत्तर प्रदेशातील, बिहारमधील तरुण आमच्या राज्यातले रोजगार बळकावतात.

मुंबई : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शेतकरी कर्जमाफीपाठोपाठ घेतलेला उद्योग धोरणातल्या बदलाचा निर्णय वादात सापडला आहे. ही घोषणा करताना कमलनाथ यांनी वापरलेली भाषा मनसेच्या नेत्यासारखी होती. 'मध्य प्रदेशात उद्योगासाठी सवलती पदरात पाडून घेणारे उद्योजक रोजगार मात्र उत्तर प्रदेश-बिहारमधल्या लोकांना देतात. मध्य प्रदेशातले युवक मात्र बेरोजगारच राहतात' ही कमलनाथ यांची घोषणा मनसे-शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेची री ओढणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसच नाही, तर सर्वच उत्तर भारतीय नेत्यांची अडचण होणार आहे. मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं भाषण हिंदीतलं असलं तरी तक्रार तीच... महाराष्ट्रात शिवसेना, मनसेसारख्या प्रादेशिक पक्षांचे नेते करतात तशीच. उत्तर प्रदेशातील, बिहारमधील तरुण आमच्या राज्यातले रोजगार बळकावतात. भावना प्रादेशिक अस्मितेची, स्वत:च्या राज्यातल्या तरुणांच्या हक्काच्या रक्षणाची असली तरी बोलणारे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचे नेते असले, तरी भूमिका हिंदी पट्टयाबाहेरील राज्यातल्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यासारखीच आहे. कमलनाथ म्हणाले तीच भावना हिंदी पट्ट्याबाहेरील राज्यांमध्येही खदखदत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याचा उल्लेख करत उत्तर भारतीयांचे कानही टोचले होते. 'जिथे जाल, त्या राज्याचा मान राखा. त्या राज्याची भाषा आली पाहिजे. आसाममध्ये तर गळे कापले. गुजरातमधून तुम्हाला हाकललं. मुंबईत आलात. मात्र त्याबद्दलचा प्रश्न तुम्ही नरेंद्र मोदींना नाही विचारत. तिथले मुख्यमंत्री, अमित शहा यांना कोणीच विचारत नाही!" असं राज ठाकरे म्हणाले होते. कमलनाथ यांनी राज्याचं औद्योगिक धोरणही बदललं. त्याचं कारणच तसं आहे. मध्य प्रदेशात चार दशलक्ष कोटींची गुंतवणूक झाल्याचा दावा तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला होता. मात्र त्याचवेळी राज्यातल्या बेरोजगारांची संख्या वाढतच राहिली होती. 2015 मधील 15 लाख 60 हजाराहून 2017 मध्ये 23 लाख 70 हजार झाली. म्हणजेच दोन वर्षात बेरोजगारांची संख्या सात लाख 90 हजारांनी वाढली. शिवराजांनी परिस्थिती चांगली असल्याचा दावा करताना हजारोंना रोजगार मिळाल्याचा दावा केला. मात्र त्याचवेळी राज्य आर्थिक पाहणी अहवालानुसार मध्य प्रदेशातल्या फक्त 2016 मध्ये फक्त 129 जणांना रोजगार मिळाला होता. मग इतर रोजगार गेले कुठे? त्याचं उत्तरच कमलनाथांनी दिलं आणि उपायही सांगितला. उत्तर प्रदेश-बिहारमधील तरुण मध्य प्रदेशातले रोजगार बळकावतात. कमलनाथ खरंच बोलले. पण आता एक अडचण आहे. काँग्रेसला त्यांच्या या खरं बोलल्याचा उत्तर प्रदेश, बिहारात फटका बसू शकेल. कमलनाथांच्या सत्याच्या प्रयोगाने सर्वात गोची होणार आहे, ती संजय निरुपम यांच्यासारख्या मुंबई काँग्रेसच्या तोंडाळ नेत्यांची. आता त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यानेच उत्तर प्रदेशीय, बिहारी स्थानिकांचे रोजगार बळकावत असल्याचं म्हटल्यानं निरुपम, कृपाशंकर आता महाराष्ट्रात कोणत्या तोंडानं विरोध करणार?

महत्त्वाच्या बातम्या

Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget