एक्स्प्लोर

Bihar Election: जर भाजपने अवलंबला '1995 चा महाराष्ट्र फॉर्म्युला' तर नितीश कुमारांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात

महाराष्ट्र राज्याच्या 1995 सालच्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्याने भाजपला मुख्यमंत्री पदावरचा हक्क सोडावा लागला होता आणि शिवसेनेला मोठा भाऊ मानून मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं होतं. हाच फॉर्म्युला बिहारमध्ये अवलंबवायचा ठरवला तर नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदावरचा हक्क सोडावा लागेल.

पाटणा: बिहार निवडणुकीतील आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बिहारमध्ये एनडीएची सत्ता येण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या उलट आलेल्या निकालाने कालपर्यंत काहीशा नाराज असलेल्या एनडीएच्या गोटात आता मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकालात भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर आहेत. सध्याच्या कलानुसार असेच दिसते की भाजप हाच बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. कुणाच्याही जागा जास्त असो वा कमी, नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री बनतील अशा प्रकारचे वक्तव्य या आधी भाजपकडून सातत्याने करण्यात आले होते. आता प्रश्न असा आहे की भाजप त्याच्या या वक्तव्यावर ठाम राहतो का? का भाजप आपला मुख्यमंत्री बनवण्यासाठी 1995 सालचा महाराष्ट्र फॉर्म्युला अवलंबणार?

काय आहे महाराष्ट्र फॉर्म्युला? महाराष्ट्र राज्याच्या 1995 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती. युतीला बहुमत मिळाल्यानंतर भाजपला शिवसेनेपेक्षा कमी जागा मिळाल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडावा लागला होता. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपचे मुख्य़मंत्रीपदाचे त्यांचे स्वप्न भंगले होते. सर्वाधिक जागा शिवसेना पक्षाला मिळाल्याने त्याला राज्यात मोठा भाऊ मानून मुख्यमंत्री पद द्यावं लागलं होतं आणि उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यावेळी शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले होते.

1990 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 183 जागा लढवल्या होत्या आणि 52 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपने 105 जागा लढवल्या आणि त्यातल्या 42 जागा जिंकल्या होत्या. 1995 साली जागा वाटपाचा हाच फॉर्म्युला अवलंबण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेला 73 जागा तर भाजपला 65 जागांवर विजय मिळाला होता.

बिहार निवडणुकीत एनडीएचे घटक पक्ष जेडीयूने 115 जागा तर भाजपने 110 जागा लढवल्या होत्या. बाकी जागा इतर घटक पक्षांनी लढवल्या. महागठबंधनमध्ये राजदने 144 उमेदवार उभे केले होते तर कॉंग्रेसने 70 उमेदवार उभे केले होते.

सध्याची परिस्थिती बघता संयुक्त जनता दलापेक्षा भाजपच्या जवळपास 30 जागा जास्त येतील अशी शक्यता आहे. तसेच एनडीएला हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्मामुळे मिळाला आहे अशी सर्वत्र हवा केली जात आहे.

अजून जरी बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्य़मंत्री बनतील असे चित्र निर्माण केले जात असले तरी पडद्यामागे काही वेगळेच चालू असल्याची चर्चा आहे. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री अशी 1995 च्या अगदी सरळ सोपा फॉर्म्युला अमलात आणायचे ठरले तर सत्तेचे चित्र बदलू शकते. अशा वेळी भाजप आपल्या नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देण्याच्या शब्दावर कायम राहतो का ते पाहणे उत्सुक्याचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या:

Bihar Election Results : कसं आणि कुठे पाहू शकाल बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल?

तेजस्वीनं सर्वांना फेस आणला, ते आज मॅन ऑफ द मॅच ठरलेत : संजय राऊत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Embed widget