एक्स्प्लोर

Bihar Election: जर भाजपने अवलंबला '1995 चा महाराष्ट्र फॉर्म्युला' तर नितीश कुमारांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात

महाराष्ट्र राज्याच्या 1995 सालच्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्याने भाजपला मुख्यमंत्री पदावरचा हक्क सोडावा लागला होता आणि शिवसेनेला मोठा भाऊ मानून मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं होतं. हाच फॉर्म्युला बिहारमध्ये अवलंबवायचा ठरवला तर नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदावरचा हक्क सोडावा लागेल.

पाटणा: बिहार निवडणुकीतील आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बिहारमध्ये एनडीएची सत्ता येण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या उलट आलेल्या निकालाने कालपर्यंत काहीशा नाराज असलेल्या एनडीएच्या गोटात आता मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकालात भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर आहेत. सध्याच्या कलानुसार असेच दिसते की भाजप हाच बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. कुणाच्याही जागा जास्त असो वा कमी, नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री बनतील अशा प्रकारचे वक्तव्य या आधी भाजपकडून सातत्याने करण्यात आले होते. आता प्रश्न असा आहे की भाजप त्याच्या या वक्तव्यावर ठाम राहतो का? का भाजप आपला मुख्यमंत्री बनवण्यासाठी 1995 सालचा महाराष्ट्र फॉर्म्युला अवलंबणार?

काय आहे महाराष्ट्र फॉर्म्युला? महाराष्ट्र राज्याच्या 1995 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती. युतीला बहुमत मिळाल्यानंतर भाजपला शिवसेनेपेक्षा कमी जागा मिळाल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडावा लागला होता. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपचे मुख्य़मंत्रीपदाचे त्यांचे स्वप्न भंगले होते. सर्वाधिक जागा शिवसेना पक्षाला मिळाल्याने त्याला राज्यात मोठा भाऊ मानून मुख्यमंत्री पद द्यावं लागलं होतं आणि उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यावेळी शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले होते.

1990 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 183 जागा लढवल्या होत्या आणि 52 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपने 105 जागा लढवल्या आणि त्यातल्या 42 जागा जिंकल्या होत्या. 1995 साली जागा वाटपाचा हाच फॉर्म्युला अवलंबण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेला 73 जागा तर भाजपला 65 जागांवर विजय मिळाला होता.

बिहार निवडणुकीत एनडीएचे घटक पक्ष जेडीयूने 115 जागा तर भाजपने 110 जागा लढवल्या होत्या. बाकी जागा इतर घटक पक्षांनी लढवल्या. महागठबंधनमध्ये राजदने 144 उमेदवार उभे केले होते तर कॉंग्रेसने 70 उमेदवार उभे केले होते.

सध्याची परिस्थिती बघता संयुक्त जनता दलापेक्षा भाजपच्या जवळपास 30 जागा जास्त येतील अशी शक्यता आहे. तसेच एनडीएला हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्मामुळे मिळाला आहे अशी सर्वत्र हवा केली जात आहे.

अजून जरी बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्य़मंत्री बनतील असे चित्र निर्माण केले जात असले तरी पडद्यामागे काही वेगळेच चालू असल्याची चर्चा आहे. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री अशी 1995 च्या अगदी सरळ सोपा फॉर्म्युला अमलात आणायचे ठरले तर सत्तेचे चित्र बदलू शकते. अशा वेळी भाजप आपल्या नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देण्याच्या शब्दावर कायम राहतो का ते पाहणे उत्सुक्याचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या:

Bihar Election Results : कसं आणि कुठे पाहू शकाल बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल?

तेजस्वीनं सर्वांना फेस आणला, ते आज मॅन ऑफ द मॅच ठरलेत : संजय राऊत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
LPG Gas Crisis: मोठी बातमी : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime Adinath Maharaj: तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Dhurandhar 2 Full Movie Leaked In HD: 400 कोटींची 'धुरंधर 2', पायरेटेड साईट्सवर HD मध्ये लीक; निर्मात्यांचं टेन्शन वाढलं
400 कोटींची 'धुरंधर 2', पायरेटेड साईट्सवर HD मध्ये लीक; निर्मात्यांचं टेन्शन वाढलं
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
Embed widget