एक्स्प्लोर

अण्णा हजारेंच्या आंदोलनावर उद्यापर्यंत तोडगा निघेल : गिरीश महाजन

अण्णा हजारेंसोबत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचंही गिरीश महाजन यांनी सांगितलं.

नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर सुरु असलेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनावर उद्यापर्यंत तोडगा निघेल, असा दावा महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी रामलीला मैदानावर जात अण्णा हजारेंशी चर्चा केली. अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा हा चौथा दिवस होता. अण्णांसोबत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचंही गिरीश महाजन यांनी सांगितलं. जनलोकपाल आणि शेतमालाला दीडपट भाव यासह अनेक मागण्यांसाठी अण्णा हजारे आंदोलनाला बसले आहेत. यामुळे अण्णा हजारेंचं वजन साडेचार किलोनं घटलं आहे, तर एका आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. महाजनांच्या भेटीनंतर अण्णा हजारेंची पत्रकार परिषद इतकी पत्र लिहिली, तेव्हा आता सरकारने चर्चा सुरु केली कृषी मूल्य आयोगाला स्वतंत्र दर्जा नेमका कसा देणार, हे तपशीलवार देण्यास सांगितलं कृषी हित कायदा, शेतकरी, मजुरांना पेन्शन मिळावी, या मागण्यांवरही सकारात्मक चर्चा, मात्र केवळ तोंडी आश्वासन नको, यावर मी ठाम प्रस्ताव काय येतो, त्यावर भूमिका ठरवणार, पण केवळ आश्वासनावर आंदोलन थांबणार नाही उद्या दुपारी पुन्हा सरकार आपल्या आश्वासनांवर प्रस्ताव घेऊन येणार आहे, त्यानंतर ठरवू राईट टू रिजेक्टबद्दलची मागणी मांडली, त्यावरही सरकारची भूमिका उद्या कळेल. आपल्या मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु, ठोस उत्तराशिवाय माघार घेणार नाही निवडणूक सुधारणांबाबत डेडलाईन दयायला हवी जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकरी प्रश्न आणि निवडणुकीसंदर्भातल्या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं सलग चौथ्या दिवशीही उपोषण सुरुच आहे. 23 मार्चला शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी रामलीलावर उपोषणाला सुरुवात केली. 2011 च्या जनलोकपाल वेळी दिल्लीत अण्णांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला पण यंदा म्हणावी तशी गर्दी जमली नाही. माध्यमांवर सरकारचा दबाव : अण्णा आंदोलनाला गर्दी का दिसत नाही, यावरुन अण्णांनी सरकारवर निशाणा साधला. ''गेल्या आंदोलनात रामलीला मैदानावर 65 ते 70 कॅमेरे असायचे. यावेळी केवळ एक कॅमेरा असतो दिवसभर. आमच्या मागण्याच लोकांपर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत. माध्यमांवर सरकारचा दबाव आहे,'' असा आरोप अण्णांनी केला. ''कृषी राज्यमंत्री आणि गिरीश महाजनांसोबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र कागदपत्र दाखवा, अशी अट त्यांना घातली. कागदपत्र घेऊन ते येणार होते. मात्र आले नाहीत. आज पुन्हा शिष्टमंडळ भेटायला येणार आहे. काही ठोस निर्णय घेणार असाल तरच या,'' असं त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं असल्याचं अण्णा म्हणाले. अण्णांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?
  • शेतकऱ्यांचे प्रश्न
कृषी उत्पन्नाला उत्पादन खर्चाच्या आधारावर 50 टक्के अधिक भाव मिळावा शेतीवर अवलंबून असलेल्या 60 वर्षांवरील शेतकरी आणि मजुरांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन द्यावं कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी, सरकारी हस्तक्षेप नसावा पिकाचा सामूहिक नव्हे, तर वैयक्तिक विमा असावा
  • लोकपाल, लोकायुक्त संदर्भातल्या मागण्या
जनलोकपाल कायदा त्वरीत लागू करावा, लोकपालची नियुक्ती व्हावी लोकपाल कायदा कमकुवत करणारे कलम 63 आणि 44 मध्ये बदल करावा केंद्राच्या लोकपालप्रमाणे प्रत्येक राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा लागू करावा
  • निवडणुकीसंदर्भातल्या मागण्या
बॅलेट पेपरवर उमेदवाराचा कलर फोटो हेच निवडणूक चिन्ह असावं मतमोजणीसाठी टोटलायझर मशिनचा उपयोग केला जावा NOTA ला Right To Reject चा अधिकार दिला जावा लोकप्रतिनिधिला परत बोलावण्याचा Right To Recall अधिकार जनतेला असावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटकTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget