एक्स्प्लोर

शाळांमध्ये हनुमान चालिसा अन् गीता पठण करण्याची मंत्री गिरीराज सिंहांची मागणी

कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. प्रत्येक खासगी शाळांमध्ये हनुमान चालिसा आणि गीता पठण करा, अशी मागणी त्यांनी आता केली आहे.

नवी दिल्ली : प्रत्येक खासगी शाळेमध्ये हनुमान चालिसा आणि गीता पठण करा, असं विधान केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बेगुसरायमधल्या एका कार्यक्रमात केलं आहे. इतकंच नाही तर प्रत्येक शाळेत मंदिर बांधा अशी मागणीही गिरीराज सिंह यांनी केली आहे. गिरीराज सिंह यांच्या या विधानांमुळे नव्या वाद्याला तोंड फुटले आहे. बेगुसरायमधील लोहिया नगर येथे भागवत कथा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विरोधकांना लक्ष्य करत गिरीराज सिंह यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले. पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या मिशनरी शाळांमध्ये घालतात. तिथे शिकून ही मुले पुढे डीएम, एसपी, इंजीनियर, आयआयटीत जातात आणि नंतर परदेशात निघून जातात. त्यापैकी अनेकजण नंतर गोमांस खाऊ लागतात. एवढे सगळे घडते कारण आपण आपल्या मुलांना आपली संस्कृती आणि परंपरा शिकवत नाही. त्यामुळे खासगी शाळांमध्ये आता भगवदगीता आणि हनुमान चालिसा शिकवण्याची मागील त्यांनी केली आहे. सोबतच शाळांमध्ये मंदिर बांधण्याची मागणीदेखील त्यांनी केली. ते म्हणाले जर सरकारी शाळांमध्ये गीता, हनुमान चालिसाचे पठण सुरू केले. तर, सरकार भगवा अजेंडा राबवत असल्याची टीका होईल. त्यामुळे याची सुरुवात ही खासगी शाळांमधून करण्याची मागणी त्यांनी केलाी आहे. गिरीराज सिंह पुन्हा वादात - गिरीराज सिंह हे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. भारतातील मुसलमान हे प्रभू रामाचे वंशज आहेत, मुघलांचे नाही. त्यामुळे त्यांनी राम मंदिराला विरोध करू नये, असे गिरीराज एका कार्यक्रमात म्‍हणाले होते. लोकसंख्या समाधान फाऊंडेशन आयोजित लोकसंख्या कायदा रॅलीत ते बोलत होते. यावरुन मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका झाली होती. नसबंदीसाठी कायदा - नोटबंदीनंतर आता नसबंदीसाठी कायदे करण्याची गरज आहे, असं वक्तव्य गिरीराज सिंह यांनी नोटबंदीनंतर केले होते. देशातील हिंदूंची लोकसंख्या वाढावी म्हणून हिंदूंनी अधिक मुलांना जन्म द्यावा, असे वक्तव्य गिरीराज सिंह यांनी 2016 मध्ये ऑक्टोबरमध्ये केले होतं. दहशतवादी एका धर्माचे असतात - दहशतवादी एका विशिष्ट धर्माचेच असतात. धर्मनिरपेक्ष नेते याकडे डोळेझाक करतात, हे नवनिधर्मीवादाचेच उदाहरण आहे, असं विधान भाजप नेते गिरीराज सिंह यांनी 2014 मध्ये केलं होतं. काँग्रेससह अन्य सर्व पक्षांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हेही वाचा - राजस्थानात बालकांच्या मृत्यूवरुन सोनिया गांधी गेहलोतांवर नाराज Giriraj Singh | प्रत्येक शाळेमध्ये हनुमान चालिसा आणि गीता पठण करा, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची मागणी | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget