एक्स्प्लोर

राजस्थानात बालकांच्या मृत्यूवरुन सोनिया गांधी गेहलोतांवर नाराज

कोटा येथील जेके लोन रुग्णालयामध्ये जवळपास 100 बालकं दगावल्याची माहिती उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर जोरदार टीका होत असतानाच आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

जयपूर : राजस्थानातील कोटा येथे डिसेंबर महिन्यात जेके लोन रुग्णालयामध्ये जवळपास 100 बालकं दगावली. यावरुन राजस्थान सरकारवर सगळ्या स्थरातून टीका होत आहे. अशातच आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही याप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनाही दिल्लीला बोलावून घेतले आहे. सोनिया गांधींच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. जेके लोन रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूप्रकरणी सरकार संवेदनशील आहे. त्यावर राजकारण करता कामा नये. कोटाच्या या रुग्णालयातील बालमृत्यूचं प्रमाण सातत्याने कमी होत आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी आमचे यापुढेही प्रयत्न सुरू राहतील, आई आणि बाळ स्वस्थ राहवे, हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे ट्विट गेहलोत यांनी केलं आहे. राजस्थानमध्ये आमच्या सरकारने सर्वप्रथम 2003 मध्ये आयसीयू उभारले. तर, कोटात 2011 मध्ये बालकांसाठी आयसीयूची उभारणी केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे तज्ज्ञांचे पथक राजस्थानात येणार आहे. आरोग्य सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी या पथकाचे आम्ही स्वागत करत असल्याचे गहलोत म्हणाले. या पथाकाशी चर्चा करुन आमच्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी तयार आहे. निरोगी राजस्थान आमची प्राथमिकता असल्याचंही त्यांनी सांगितले. सोबतच माध्यमांचा कोणताही दबाव न घेता या पथकाने सत्य मांडण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. 'त्या' विधानामुळे गहलोत अडचणीत - "राज्यातील प्रत्येक रुग्णालयात दररोज 3-4 मृत्यू होतात. त्यामुळे या गोष्टी काही नवीन नाहीत", असे विधान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केलं होतं. या विधानानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली. दरम्यान, आत्तापर्यंत जवळपास 100 बालकं जेके लोन रुग्णालयामध्ये दगावली आहेत. हेही वाचा - धक्कादायक : राजस्थानमध्ये एका महिन्यात 100 बालकांचा मृत्यू Nashik Blind Cricket | दृष्टिहीनांच्या क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद विदर्भाला, नाशिकमध्ये आयोजन | ABP MAJHA

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget