एक्स्प्लोर

Farmers Protest : ... तर तीन तासांत मागे घेणार आंदोलन, शेतकऱ्यांनी सांगितल्या अटी 

मागच्या महिन्यात केंद्र सरकारकडून हे तीन कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. परंतु, सरकारच्या घोषणेनंतरही शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. आता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून दिल्लीच्या सीमेवर वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून शेतकरी आंदोलन (Farmers Protest)करत आहेत. मागच्या महिन्यात केंद्र सरकारकडून हे तीन कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. परंतु, सरकारच्या घोषणेनंतरही शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. आता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. एमएसपी (MSP law) कायदा तयार केला तर तीन तासांत आंदोलन मागे घेऊ, अशी भूमीका शेतकऱ्यांनी(farmers) घेतली आहे.   

केंद्र सरकारने नवे तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. परंतु, याबरोबरच आंदोलक शेतकऱ्यांच्या आणखी काही महत्त्वाच्या मागण्या होत्या. शेतकऱ्यांच्या पिकाला एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत मिळावी ही त्यातली महत्त्वाची मागणी आहे. ही मागणी मान्य करेपर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. जर एमएसपी कायदा मंजूर केला तर अवघ्या तीन तासात आंदोलन मागे घेऊ अशी भूमीकाही शेतकऱ्यांनी घेतली आहे. 

कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करताना एमएसपी कायद्यांबाबात विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल असेही सरकारने सांगितले आहे. घोषनेच्या एवढ्या दिवसानंतर आता शेतकरी आंदोलनात समिती तर तयार करण्यात आली आहे. परंतु, शेतकरी हे आंदोलन कधी मागे घेणार याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. शेतकरी नेते म्हणत आहेत की, सरकारने मागणी मान्य केली तर तोडगा निघू शकतो.  तर काही शेतकरी नेते म्हणत आहेत की, एमएसपी कायद्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. 
 
शेतकऱ्यांच्या समितीमध्ये मनोज सिंह कक्का, जैनेद्र युद्धवीर सिंह आणि बलवीर राजेवाल यांचा समावेश आहे. या नेत्यांचे मत आहे की, सरकारने त्यांची मागणी मान्य केली तर हे आंदोलन तीन तासात संपू शकते. हे तीन नेते शेतऱ्यांचे प्रतिनीधी म्हणून सरकारसोबत चर्चा करतील.

दरम्यान, शेतऱ्यांच्या या मागणीमुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की, हे आंदोनल सध्यातरी थांबणार नाही. चेंडू आता सरकारच्या कोर्टात आहे. याबरोबरच पुढची बैठक येत्या 7 तारखेला करण्याची घोषणा केली आहे.   

या मागणीवर ठाम आहेत शेतकरी 

कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आता शेतकरी एमएसपी कायदा, आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेणे आणि आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. शेतकऱ्यांनी तर आता आपल्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. परंतु, सर्वांचे लक्ष आता सरकारी आमंत्रणावर आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सरकारही या मागण्यांवर लवकरात-लवकर चर्चा करण्यास तयार आहे. त्यासाठी शेतकरी नेत्यांना फोनही करण्यात आले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का आणि शेतकरी एवढ्या दीर्घ काळापासून सुरू असलेले आंदोलन मागे घेणार का हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

एमएसपी म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?

शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वर्षांपासून एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत ही व्यवस्था सुरू आहे. केंद्र सरकार पिकांसाठी एक किमान दर ठरवते. यालाच हमीभाव देखील म्हणतात. समजा शेतकऱ्यांच्या पिकांचे दर बाजारात कोसळले तरी, केंद्र सरकार या दराने ते उत्पादन शेतकऱ्यांकडून खरेदी करते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही यंत्रणा आहे. त्यांच्यासाठी ही एक सामाजिक सुरक्षा आहे. 60 च्या दशकात सरकारने अन्नधान्याची कमतरता कमी करण्यासाठी सर्वांत आधी एमएसपी द्यायला सुरुवात केली होती. सरकारला गहू खरेदी करून पीडीएस योजनेंतर्गत गरीबांमध्ये वाटण्यासाठी ती सुरू करण्यात आली होती. 

संबंधित बातम्या 

Farmers Protest : आंदोलनात मृत शेतकऱ्यांना मदत नाही; केंद्र सरकार म्हणतंय आकडेवारीच नाही

One Year of Farmers Protest : ऊन, वारा, पाऊस अन् लाठीचार्ज, तरीही निर्धार ठाम; बळीराजाच्या आंदोलनाचं एक वर्ष!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Edible Oil Packing Rules : आता खाद्य तेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर, नाही चालणार वजनाचा 'खेळ'; ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
आता खाद्य तेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर, नाही चालणार वजनाचा 'खेळ'; ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
शेतकरी संकटात, मोदी मेलोडी मेलोडी करतात; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका, ट्रम्पतात्या म्हणत हल्लाबोल
शेतकरी संकटात, मोदी मेलोडी-मेलोडी करतात; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका, ट्रम्पतात्या म्हणत हल्लाबोल

व्हिडीओ

Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IPS Transfer : राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
Sunetra Pawar : सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धरमशालेचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धरमशालेचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
Sunil Tatkare : फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
Embed widget