एक्स्प्लोर

आमच्यासाठी ना पक्ष, ना विपक्ष, सर्वजण समकक्ष; मतचोरीच्या आरोपावर निवडणूक आयुक्त पहिल्यांदाच बोलले

निवडणूक वेळापत्रकाच्या घोषणा करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही मुद्द्यावर निवडणूक आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेणे तसं कमीच आहे

नवी दिल्ली : आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून बिहारमध्ये (Bihar) मतदार यादीच्या विशेष पुनर्रचनावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार आरोप आणि निदर्शने सुरू आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज दुपारी 3 वाजता नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली. बिहारमध्ये विशेष मतदारयादी सुधारणा (SIR) प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाची (Election commission) ही पहिली पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेतून आयोगाने काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या (Rahul gandhi) आरोपावर सडेतोड उत्तर देत पलटवार केला. निवडणूक आयोगाचा ना कुठला पक्ष आहे, ना विपक्ष आहे, आयोग तर सर्वांसाठी समकक्ष आहे.. असे म्हणत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी भूमिका मांडली. 

निवडणूक वेळापत्रकाच्या घोषणा करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही मुद्द्यावर निवडणूक आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेणे तसं कमीच आहे. मात्र, राहुल गांधींकडून सातत्याने होत असलेल्या आरोपाने निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन झाली असून आयोग संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळेच, आज मुख्य निवडणूक आयुक्तांसह आयोगाने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. तसेच, मतचोरी शब्दाला आक्षेप घेत राहुल गांधींनी कुठलेही पुरावे दिले नसल्याचा दावाही त्यांनी केलाय. 

कायद्यानुसार, निवडणूक आयोगाकडील नोंदणीनंतरच एखाद्या राजकीय पक्षाचा जन्म होतो. त्यामुळे, निवडणूक आयोग कुठल्याही पक्षासोबत भेदभाव कसा करेल. निवडणूक आयोगासाठी ना कुठला पक्ष आहे, ना विपक्ष आहे, आयोगासाठी सर्वच पक्ष समकक्ष आहेत, असे आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटले. गेल्या 20 वर्षांपासून सर्वच राजकीय पक्ष मतदान यादीत सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. या मागणीचा विचार करुनच निवडणूक आयोगाने बिहारमधून एसआयआरची सुरुवात केल्याचं कुमार यांनी म्हटले. 

मतचोरी शब्दाचा उल्लेख म्हणजे जनतेची दिशाभूल 

राहुल गांधींकडून होत असलेल्या मतचोरीच्या मुद्द्यावरूनही आयोगाने पलटवार केला. कायद्यानुसार उचित वेळेत मतदारांकडून मतदान यादीतील त्रुटींची माहिती न मिळाल्यास, तसेच निवडणूक निकालानंतर 45 दिवसांत मतदारांकडून विजयी उमेदवाराबाबत आक्षेप घेत न्यायालयात निवडणूक संदर्भात याचिका दाखल न केल्यास, पुन्हा मत चोरीचा आरोप करणे योग्य नाही. मतचोरीसारख्या शब्दाचा प्रयोग करुन जनतेची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. भारतीय संविधानाचा हा अपमान असल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले. 

राहुल गांधींना प्रतिज्ञा सादर करण्याचे चॅलेंज

दरम्यान, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदान डेटामध्ये फेरफार केल्याचा वारंवार आरोप केला आहे आणि महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुका आणि कर्नाटकमधील लोकसभा निवडणुका भाजपला जिंकवण्यासाठी 'मत चोरी' करण्यात आल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने जोडल्या गेलेल्या किंवा वगळल्या गेलेल्या लोकांची नावे स्वाक्षरी केलेल्या घोषणापत्रासह सादर करण्यास सांगितले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर करू शकले नाहीत तर त्यांनी देशाची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी, असेही आयोगाने म्हटले आहे. 

हेही वाचा

शोलेस्टाईल इंजिन पुढे, डबे मागे; नागपूर-पुणे वंदे भारत 2 तास खोळंबली, जिथं थांबा नाही तिथं 2 तास थांबली

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Online food delivery: 25 लाखांच्या नोकरीला लाथ मारून डिलिव्हरी बॉय बनण्याचा धाडसी निर्णय; तरुणाचा भन्नाट प्लॅन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
25 लाखांच्या नोकरीला लाथ मारून डिलिव्हरी बॉय बनण्याचा धाडसी निर्णय; तरुणाचा भन्नाट प्लॅन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Online food delivery: 25 लाखांच्या नोकरीला लाथ मारून डिलिव्हरी बॉय बनण्याचा धाडसी निर्णय; तरुणाचा भन्नाट प्लॅन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
25 लाखांच्या नोकरीला लाथ मारून डिलिव्हरी बॉय बनण्याचा धाडसी निर्णय; तरुणाचा भन्नाट प्लॅन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Shirdi Trust Provide 11 Lakh For Actor Sudhir Dalvi Treatment: अखेर साईबाबाच सुधीर दळवींच्या मदतीसाठी धावले; हायकोर्टाच्या परवानगीनंतर शिर्डी संस्थानाकडून उपचारासाठी 11 लाखांची मदत
अखेर साईबाबाच सुधीर दळवींच्या मदतीसाठी धावले; हायकोर्टाच्या परवानगीनंतर शिर्डी संस्थानाकडून उपचारासाठी 11 लाखांची मदत
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Embed widget