एक्स्प्लोर

Domestic Flights Resume | 60 दिवसांनी टेकऑफ, देशांतर्गत विमान सेवा सुरु

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 24 मार्चपासून हवाई वाहतूक रोखण्यात आली होती. अखेर दोन महिन्यांनी देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यात आली आहे.

मुंबई : देशात लॉकडाऊनदरम्यान बस, रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर देशांतर्गत विमान सेवाही सुरु झाली आहे. 60 दिवसांनी म्हणजेच दोन महिन्यांनंतर विमानांनी आज टेकऑफ केलं. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी पुण्याच्या दिशेने पहिल्या विमानाने उड्डाण केलं. हे विमान इंडिगोचं होतं. तर मुंबईवरुन पहिल्या विमानाने पाटणाच्या दिशेने सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण केलं. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 24 मार्चपासून हवाई वाहतूक रोखण्यात आली होती.

सुरुवातीच्या टप्प्यात 2800 उड्डाणांचं नियोजन करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता संपूर्ण देशात मध्यरात्रीपासून प्रवाशांची ये-जा सुरु झाली होती. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावर उत्साह तर होता. परंतु मनात कोरोनाची भीती असल्याचंही काही प्रवाशांनी सांगितलं.

विमानतळावर विशेष तयारी यासाठी विमानतळांवर विशेष तयारी करण्यात आली होती. प्रवासी रात्रीपासूनच प्रवाशांची गर्दी दिसली. सोशल डिस्टन्सिंगसाठी विमानतळावर सुरक्षा तैनात करण्यात आली होती. ते प्रवाशांना सातत्याने डिस्टन्स ठेवण्याची सूचना करत होते. विमानतळावर सातत्याने उद्घोषणा केल्या जात होत्या. सोबतच सर्व प्रवासी मास्क परिधान केलेले दिसत होते.

Domestic Flights Resume | 60 दिवसांनी टेकऑफ, देशांतर्गत विमान सेवा सुरु

विमानतळावर सॅनिटायजर, पीपीई किट्स आणि मास्क खरेदीची सोय सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं यासाठी आसनव्यवस्थेतही बदल करेला आहे. प्रवाशांना एक खुर्ची सोडून बसावं लागणार आहे. सोबतच सर्व प्रकारच्या तपासणी करुनच प्रवाशांना आत सोडलं जात आहे. विमानतळावर सॅनिटायजर, पीपीई किट्स, मास्क्स यांसारखी साधनं उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

'मिशन वंदेभारत' कोणताही परिणाम नाही परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सुरु असलेलं 'मिशन वंदेभारत'वर कोणताही परिणाम होणार नाही. हे अभियान सुरुच राहणार आहे.

विमान प्रावासादरम्यान कोणत्या सूचनांचं पालन करणं गरजेचं?

- विमान प्रवास करताना उड्डाणाच्या दोन तास आधी विमानतळावर हजर राहणं गरजेचं

- प्रवास करताना मास्क, हॅण्ड ग्लोव्ह्ज परिधान करणे आवश्यक

- कमीत कमी सामान सोबत ठेवून एक व्यक्ती 1 हॅण्ड बॅग आणि एक मोठी बॅग सोबत घेऊ शकतो

- विमान प्रवास करत असताना दोन वेळा थर्मल स्क्रीनिंग करुन विमानात प्रवेश

- लक्षण आढळणाऱ्या व्यक्तीसाठी काही विमानतळावर क्वॉरन्टाईन सेंटरची वेगळी सुविधा

- प्रवासादरम्यान खाण्याची सोय नसणार, विनंती केल्यास पाणी प्यायला दिलं जाणार

- वय वर्ष14 वर्षावरील व्यक्तीला आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं बंधनकारक

- 80 वर्षां जास्त वयाचे व्यक्ती, गर्भवती, आजारी व्यक्तींना विमानप्रवास न करण्याचा सल्ला मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलाय

- कमीत कमी संपर्क कसा होईल या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याचा सूचना

- विमान प्रवास केल्यास दुसऱ्या शहरात गेल्यावर कमीत कमी लक्षणानुसार कमीत कमी 7 ते 14 दिवस क्वॉरन्टाईन होणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग रोखता येईल.

Domestic Flights Resume | आजपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु, मुंबई विमानतळावर काय स्थिती?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Hostage Crisis: 'A Thursday' पाहून Rohit Arya ने १७ मुलांना ओलिस ठेवले?
Harshwardhan Sapkal : पोलिसांची बेडरूमपर्यंत पाळत? काँग्रेसचा गंभीर आरोप
TOP 50 Superfast News : 31 OCT 2025 : बातम्यांचं अर्धशतक : Maharashtra Politics : ABP Majha
Casting Scam : 'निर्माता' असल्याचं सांगत Rohit Arya चा अनेक कलाकारांना गंडा, अभिनेत्री Ruchita Jadhav लाही केली होती ऑफर
Mumbai Hostage Crisis: 'सरकारच्या दुर्लक्षामुळे निष्पाप जीव धोक्यात', Rohit Arya प्रकरणी विरोधकांनी सवाल उपस्थित केले आहेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
Mohammad Azharuddin: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
मुख्यमंत्री म्हणाले जूनमध्ये कर्जमाफी करतो, उद्धव ठाकरेंचं खरमरीत पत्र; शेतकऱ्यांना झुलवू नका म्हणत अनेक सवाल
मुख्यमंत्री म्हणाले जूनमध्ये कर्जमाफी करतो, उद्धव ठाकरेंचं खरमरीत पत्र; शेतकऱ्यांना झुलवू नका म्हणत अनेक सवाल
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
Kerala High Court: तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget