एक्स्प्लोर

Delhi Lockdown Extended : दिल्लीत लॉकडाऊन एक आठवड्याने वाढवला, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

गेल्या महिन्यात दिल्लीती कोरोनाची स्थिती गंभीर होती. मात्र एका महिन्यात दिल्लीतील लोकांच्या शिस्त व संघर्षामुळे कोरोनाची ही लाट ओसरताना दिसत आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये लॉकडाऊन आणखी एक आठवड्याने वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा आज केली. दिल्लीत 31 मे सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे. दिल्लीत 19 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये वाढ करुन 24 मेपर्यंत लॉकडाऊन दिल्लीत लागू होता. मात्र आता दिल्ली सरकारने लॉकडाऊन एक आठवड्याने वाढवला आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की,  सध्याचा लॉकडाऊन उद्या पहाटे पाच वाजता संपत आहे. आज पुन्हा आपल्या सर्वांना, दिल्लीतील जनतेला लॉकडाऊन वाढवायचे की नाही हे ठरवायचे आहे. एप्रिल महिन्यात जेव्हा संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा लॉकडाऊन लागू करणारं दिल्ली देशातील पहिले राज्य होतं. तेव्हा परिस्थिती गंभीर होती, कोरोनाच्या लाटेचा सामना कसा करु हे सांगता येत नव्हतं. परंतु एका महिन्यात दिल्लीतील लोकांच्या शिस्त व संघर्षामुळे कोरोनाची ही लाट ओसरताना दिसत आहे. मी असं म्हणणार नाही की आपण युद्ध जिंकलं आहे, परंतु आपण यावर नियंत्रण मिळवलं आहे, असं केजरीवाल यांनी सांगितलं. 

दिल्लीतील कोरोनाच्या आकडेवारीचा संदर्भ देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, एप्रिलमध्ये एक दिवस असा होता की पॉझिटिव्हिटी रेट 36 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. म्हणजेच 100 लोकांची चाचणी घेतल्यानंतर 36 लोक बाधित आढळत होते. मात्र गेल्या 24 तासात हाच पॉझिटिव्हिटी रेट 2.5 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. एप्रिल महिन्यात एका दिवसात 28 हजार कोरोना रुग्णांची नोंद होत होती. गेल्या 24 तासांत 1600 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाविरोधातील युद्ध अद्याप शिल्लक आहे. 

केसेस कमी झाल्यास अनलॉक सुरु करू - केजरीवाल

लॉकडाऊनबाबत आम्ही अनेक तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यावर एक आठवड्यासाठी अधिक लॉकडाऊन वाढवला जावा असं उत्तर मिळालं. कारण जर आपण लॉकडाउन हटवला तर असं होऊ नये की आपण मागील 1 महिन्यात जे काही केलं ते पूर्ण वाया जावं. म्हणूनच दिल्लीत सोमवार 31 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे. जर अशा प्रकारे कोरोना संसर्ग कमी होत राहिला, लोक शिस्त पाळत राहिले तर 31 मे पासून अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्वरित अनलॉक करणे चांगले होणार नाही परंतु हळूहळू अनलॉक करणे सुरू होईल, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget