एक्स्प्लोर

मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगमुळं 10 पैकी 8 कुटुंबं कोरोनापासून सुरक्षित, सर्व्हेतून माहिती 

Corora masks and social distancing : मास्क लावल्यामुळं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केल्यामुळं कोरोनाला आटोक्यात आणण्यात यश आलं असल्याचं म्हटलं आहे.   

नवी दिल्ली : देशात आता कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत मात्र एक वेळ अशी होती की देशात कोरोनानं भयंकर स्थिती निर्माण केली होती. या काळात मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगनं अनेकांना कोरोनापासून दूर ठेवलं आहे. एका सर्वेक्षणानुसार असा दावा करण्यात आला आहे की, भारतात 10 पैकी 8 कुटुंबं सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावल्यामुळं कोरोना प्रादुर्भावापासून बचावली आहेत.  हे सर्वेक्षण लोकल सर्कलनं भारतातील 345 जिल्ह्यांमध्ये केलं आहे. याक जवळपास 29 हजार लोकांनी सहभाग घेतला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेक राज्यांनी कोरोनाचे निर्बंध काढल्यानंतर हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे.

लोकल सर्कलनं दावा केला आहे की, या सर्वेक्षणातून असं समोर आलं आहे की, 57 टक्के भारतीय कुटुंबातील कमीत कमी एक किंवा दोन लोकांना गेल्या दोन वर्षात कोरोना झाला आहे. मास्क लावल्यामुळं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केल्यामुळं कोरोनाला आटोक्यात आणण्यात यश आलं असल्याचं म्हटलं आहे.  
 
सर्वेक्षणात सहभागी 10,200 लोकांपैकी 57 टक्के लोकांनी म्हटलं आहे की, महामारीमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत गेल्या दोन वर्षात त्यांच्या परिवारातील एक किंवा त्याहून अधिक सदस्य कोरोनाबाधित झाले. 10 पैकी 8 कुटुंबं सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावल्यामुळं कोरोना प्रादुर्भावापासून बचावली. त्यांच्या परिवारातील कुठलाही सदस्य कोरोनाबाधित झाला नाही कारण त्यांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन केलं.  

कोरोनाबाधित न झालेल्या लोकांचं विश्लेषण केलं असता असं समोर आलं आहे की, त्यातील 80 टक्के लोकांनी कोरोना महामारीत सामाजिक संपर्क कमी केला, मास्क लावला आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन केलं.  

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 53 टक्के लोकांनी सांगितलं की, त्यांनी महामारीच्या काळात आपली दिनचर्या व्यवस्थित पाळली, तसेच घरामध्ये सक्रिय राहत व्यायामावर लक्ष केंद्रीत केलं.

या सर्वेक्षणात सहभागी लोकांमध्ये 61 टक्के पुरुष तर 39 टक्के महिलांचा समावेश होता. यातील 45 टक्के लोकं प्रथम श्रेणीतील शहरांमधील, 31 टक्के द्वितीय श्रेणीतील शहरातील तर 24 टक्के लोकं तृतीय श्रेणीतील शहरं आणि गावखेड्यातील होते.  

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Surya Kant: सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
Amit Satam: संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sudam Shelke, Sunil Shelke : सुनील शेळकेंची प्रतिष्ठा पणाला, भावाच्या प्रचाराचा नारळ फुटला!
Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
Amit Satam: संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
Dharashiv Accident: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, गाडीचे टायर्स फुटले, धाराशिवमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, गाडीचे टायर्स फुटले, धाराशिवमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू
Local Train Block: मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा खोळंबा; ट्रेनचे बदलले मार्ग, वेळेत बदल, कुठल्या लोकल रद्द? पाहा सविस्तर
मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा खोळंबा; ट्रेनचे बदलले मार्ग, वेळेत बदल, कुठल्या लोकल रद्द? पाहा सविस्तर
D Mart sale: आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
Embed widget