एक्स्प्लोर

राणेंनी ज्यांना ‘दुर्योधन’ म्हटलं, त्या मोहन प्रकाश यांचं राणेंना उत्तर

राणे काँग्रेसला रिकामं करण्याची भाषा करतायत, त्यावर विचारलं असता राणे आणि त्यांच्या पुत्रांचे राजकीय व्यवहार काय प्रकारचे आहेत याची चांगली कल्पना महाराष्ट्रातल्या जनतेला असल्याचं मोहन प्रकाश म्हणाले.

नवी दिल्ली : काँग्रेस सोडताना नारायण राणे यांनी ज्यांचा उल्लेख ‘दुर्योधन’ म्हणून केला, त्या काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत राणेंच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. एका कुटुंबात तीन तीन तिकिटं, दोनदा निवडणूक हारल्यावरही पुन्हा सन्मानानं आमदारकी असं आजवर कुठल्या पक्षाच्या इतिहासात झालंय का? असा तिखट टोला मोहन प्रकाश यांनी लगावला. नारायण राणेंचा काँग्रेसनं नेहमीच सन्मान केलाय. मला ते दुर्योधन का म्हटले ठाऊक नाही, पण ते काँग्रेसमध्ये आले तेव्हा मी पक्षाचा सचिव नव्हतो. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हाही मी सचिव नव्हतो. शिवाय मुख्यमंत्री कुणाला करायचं याचा अधिकार एखाद्या सचिवाच्या नसतो हे राणेंनी लक्षात घ्यायला हवं असंही ते म्हणाले. राणे काँग्रेसला रिकामं करण्याची भाषा करतायत, त्यावर विचारलं असता राणे आणि त्यांच्या पुत्रांचे राजकीय व्यवहार काय प्रकारचे आहेत याची चांगली कल्पना महाराष्ट्रातल्या जनतेला असल्याचं वक्तव्य केलं. राणेंच्या पत्रकार परिषदेला त्यांचे पुत्र आणि काँग्रेस आमदार नितीश राणे हे उपस्थित नव्हते, ते अजूनही काँग्रेसमध्येच आहेत का या प्रश्नावर जो कुणी पक्षात आहे, त्याचा आम्ही सन्मानच करु, त्यांचे नाते कुणाशी कसेही असले तरी. मोहन प्रकाश हे गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आहेत. काँग्रेसच्या परंपरागत दरबारी राजकारणाच्या शैलीतच ते काम करतात. आजच्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांच्यासह राणेंचा सर्वाधिक निशाणा मोहन प्रकाश यांच्यावरच होता. मला कुणी चक्रव्यूहात फसवू शकत नाही, आणि फसवायचे प्रयत्न केलाच तर ते करणारे दुर्योधन अशोक चव्हाण, मोहन प्रकाश यांच्याशिवाय दुसरं कुणी नसेल असं वक्तव्य राणेंनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
मुंबईचा वडापाव आवडला, दिल्लीच्या तरुणीने थेट विमानाने प्रवास केला, 20 रुपयांच्या वडापावसाठी खर्चीले तब्बल 15 हजार रुपये 
मुंबईचा वडापाव आवडला, दिल्लीच्या तरुणीने थेट विमानाने प्रवास केला, 20 रुपयांच्या वडापावसाठी खर्चीले तब्बल 15 हजार रुपये 
तब्बल 28 वर्षानंतर विलक्षण योगायोग येणार, 3 ऑक्टोबरचा दिवस भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरणार, नेमकं काय घडणार? 
तब्बल 28 वर्षानंतर विलक्षण योगायोग येणार, 3 ऑक्टोबरचा दिवस भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरणार, नेमकं काय घडणार? 
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडू पाकिस्तानला जाणार, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडू पाकिस्तानला जाणार, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
Embed widget