एक्स्प्लोर

Bharat Jodo Nyay Yatra : मेघालयात सुरु होणार भारत जोडो न्याय यात्रेचा पुढचा टप्पा, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची भारत जोडो ही यात्रा मेघालयामध्ये पोहचली असून पुन्हा ही यात्रा आसाममध्ये जाणार आहे. तसेच आसाम मेघालय राज्यांच्या सीमेवर राहुल गांधी तरुणांशी देखील संवाद साधणार आहे.

मुंबई : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) सोमवारी 22 जानेवारी रोजी मेघालयात (Meghalaya) पोहोचली. खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातून मेघालयात दाखल झाली. राज्याच्या सीमेवर प्रवेश केल्यानंतर लगेचच खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या अनेक नेत्यांनी री भोई जिल्ह्यातील नोंगपोह येथे पदयात्रेत भाग घेतला.

री भोई जिल्ह्यातील बर्निहाट येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा टप्पा असणार आहे. तसेच इथे नॉन्गपोहमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या एका बैठकीला देखील राहुल गांधी हे हजर राहणार असल्याची माहिती देण्यात आलीये. दरम्यान मेघालयमधून ही यात्रा पुन्हा एकदा आसाममध्ये जाणार आहे. तसेच मंगळावर 23 जानेवारी रोजी सकाळी आसाम -मेघालयच्या सीमेवर तरुणांशी राहुल गांधी हे चर्चा करणार आहेत. 

केंद्र सरकारवर हल्लाबोल

मेघालयातील जनतेशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी म्हटलं की, खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालय सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे म्हटले होते. मेघालय सरकारला सर्वात भ्रष्ट म्हटल्यावर लगेचच त्यांनी इथल्या सरकारसोबत युती देखील केली. तुमच्या भाषा आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नाहीत. तुमची जमीन, आदिवासी, स्थानिक लोक आणि जंगले यांचे संरक्षण करणाऱ्या वास्तू उखडून टाकल्या आहेत.

मी दिल्लीतील तुमचा पाईक - राहुल गांधी

मी दिल्लीत तुमचा शिपाई आहे. तुम्हाला माझ्याकडून जे काही लागेल, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन. आम्ही कधीही तुमच्या इतिहास, परंपरा, भाषा, धर्म किंवा जीवनशैली कोणालाही इजा होऊ देणार नाही. भाजप आणि आरएसएस आपल्या देशाच्या पायावर आघात करत होते. भारताच्या कल्पनेचे रक्षण करण्यासाठी आम्ही समुद्रातून काश्मीरच्या पर्वतापर्यंत चालत गेलो. आम्ही शेतकरी, मजूर आणि तरुणांचा आवाज ऐकला, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. दरम्यान राहुल गांधींची न्याय यात्रा ही सध्या आसाममधून मेघालय इथे आली असली तरीही ही यात्रा पुन्हा एकदा आसाममध्ये जाणार आहे. तसेच आसाम आणि मेघालयाच्या सीमेवर ते तरुणांशी देखील संवाद साधतील. 

हेही वाचा : 

Ayodhya : अयोध्येच्या राम मंदिरामुळे पर्यटक वाढणार आणि यूपीची तिजोरी भरणार, राज्याच्या महसुलात 25 हजार कोटींच्या वाढीची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.