एक्स्प्लोर

कावेरी निकाल : तामिळनाडूला 177 टीएमसी पाणी

कावेरी पाणीवाटपाबाबत सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली : कावेरी पाणीवाटपाबाबत सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. तर कावेरी नदीतून तामिळनाडूला मिळणाऱ्या पाण्यात कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे कर्नाटकच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम आता केंद्र सरकारचं असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने तामिळनाडूला मिळणाऱ्या पाण्यात कपात केली आहे. त्यामुळे आता तामिळनाडूला 177.25 टीएमसी पाणी मिळेल. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने कर्नाटक सरकारने आनंद व्यक्त केला आहे. कावेरी पाणीवाटप लवादाच्या २००७ मधील निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. या लवादाने तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पुद्दुचेरी यांच्या वाट्याचं पाणी ठरवून दिलं होतं. मात्र कर्नाटकने पाणी सोडण्यास नकार दिल्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं होतं. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. अखेर आज यावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आहे. नेमका वाद काय? कावेरी नदीचा उगम हा कर्नाटकमधील कुर्ग जिल्ह्यातील तल कावेरी येथे उगम पावते. 2007 मध्ये कावेरी पाणीवाटप लवादाने जवळजवळ तामिळनाडूला 419, कर्नाटकला 270, केरळला 30 आणि पद्दुच्चेरीला 7 टीएमसी पाणी देण्याचा आदेश दिला होता. ज्यावर सर्व राज्यांनी नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कावेरी पाणीवाटपावरुन मागील अनेक दिवसांपासून कर्नाटक आणि तामिळनाडूमधील राजकारणही प्रभावित झालं आहे. दोन्ही राज्यात यावरुन अनेकदा उग्र आंदोलनंही झाली आहेत. पाणी वाटपाचा हा वाद जवळजवळ 150 वर्ष जुना आहे. तेव्हा मैसूरच्या राजा आणि मद्रासच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये पाणी वाटपावरुन अनेक करार झाले होते. यामधील एक मोठा करार हा 1924 साली झाला होता. त्यावेळी दोन्ही राज्यांसाठी पाणी वाटपाची मर्यादा ठरवण्यात आली होती. पण 70 आणि 80 च्या दशकात कावेरीच्या पाणीवाटपावरुन दोन्ही राज्यांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला. जेव्हा जेव्हा मान्सूनची स्थिती वाईट असायची तेव्हा तेव्हा कर्नाटक तामिळनाडूला पाणी सोडण्यास नकार देत असे. 1995-96 आणि 2002 साली अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 2007 साली कावेरी पाणीवाटप लवादाने जवळजवळ तामिळनाडूला 419, कर्नाटकला 270, केरळला 30 आणि पद्दुच्चेरीला 7 टीएमसी पाणी देण्याचा आदेश दिला होता. ज्यावर सर्व राज्यांनी नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कर्नाटकचं म्हणणं होतं की, 'लवादाने जुन्या आकड्यांच्या आधारावर पाणी वाटप केलं आहे. पण आजच्या परिस्थितीनुसार एवढं पाणी देणं शक्य नाही. आमच्या राज्यातील मोठ्या शहरांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आम्हाला जास्त पाणी मिळणं गरजेचं आहे.' दुसरीकडे तामिळनाडूची मागणी होती की, सुप्रीम कोर्टाने आमच्या पाण्याचा हिस्सा वाढवावा. तसेच पाणी वाटपासाठी न्यायालयीन आदेश जारी करावा जेणेकरुन राजकीय लढाईमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget