एक्स्प्लोर

BjpFoundationDay | 40 वर्षात दोन ते 303 जागांपर्यंतचा प्रवास; पंतप्रधान मोदींकडून ध्येयपूर्ती

6 एप्रिल 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती. अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष होते.

नवी दिल्ली :  केंद्रात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष आज आपला 40 वा स्थापना दिन साजरा करीत आहे. जेव्हा भारतीय जनता पक्षाने देशाच्या राजकीय इतिहासामध्ये प्रवेश केला असेल, तेव्हा कदाचित त्या काळात कोणालाही वाटले नसेल की एक दिवस देशात ऐतिहासिक विजय नोंद होईल आणि केंद्रत एकहाती सत्ता घेतली जाईल. 80 च्या दशकात जेव्हा भाजपची स्थापना झाली आणि पक्षाने प्रथम लोकसभा निवडणूक राजकीय पक्ष म्हणून लढविली, तेव्हा पक्षाच्या खात्यावर केवळ दोन जागा होती, असे असूनही पक्षाच्या नेत्यांनी धैर्य गमावले नाही.

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या माध्यमातून आज पक्ष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पोहोचला आहे. 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केले गेले. येथून सुरु झालेला प्रवास आज शिखरावर आहे. 40 वर्षांच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाने यापूर्वीही सत्ता मिळविली होती. परंतु सध्या भाजप इतिहास रचत आहे. संघर्षातून बाहेर पडलेला पक्ष आज सत्तेच्या शिखरावर आहे. भारतीय जनता पक्षाचा आतापर्यंतचा प्रवास आणि पक्ष कसा बनला ते जाणून घेणार आहोत.

भारतीय जनता पक्षाची 1980 साली स्थापना झाली, पण त्याआधी 1951 साली श्यामा प्रसाद मुखर्जी कॉंग्रेस सोडून भारतीय जनसंघ स्थापना केली होती. 1952 साली लोकसभा निवडणुकीत जनसंघाला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या.

यानंतर जनसंघाचा संघर्ष सुरूचं होता. जेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली तेव्हा जनसंघाने कॉंग्रेसविरोधात आवाज उठविला. आता आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर जनसंघाने आपलं रूप बदललं आणि इतर पक्षांसह जनता पक्षाची स्थापना केली. या पक्षाने 1977 च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि मोरारजी देसाई यांना पंतप्रधान केले. देसाई यांना तीन वर्षांत माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर जनसंघाने 1980 मध्येच भाजपची स्थापना केली.

भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा अटलबिहारी वाजपेयी अध्यक्ष झाले. 1984 साली झालेल्या आठव्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला राष्ट्रीय निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाला. या निवडणुकीत भाजपच्या खात्यात केवळ दोन जागा मिळाल्या. 1984 च्या निवडणूकीत दोन जागा, 1989 मध्ये 85 जागा तर 1991 साली राम मंदिर प्रकरणानंतर 120 जागा मिळाल्या. यानंतरही पक्षाच्या जागा वाढतच गेल्या. 1996 मध्ये 161 जागा, 1998 मध्ये 182 जागा तर 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने इतिहास रचला. पक्षाला लोकसभेच्या 282 जागा मिळाल्या. त्याचवेळी 2019 मध्ये 303 जागा जिंकून भाजपने केंद्रात सत्ता मिळवली.

अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पक्षाची स्थापना झाली तेव्हा पहिले राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यानंतर, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना 1986 मध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केले गेले. 1991 मध्ये ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले गेले. तर 1993 साली लालकृष्ण अडवाणी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. दुसऱ्यांदा अडवाणी यांना हे स्थान देण्यात आले. दरम्यान, ज्येष्ठ नेते कुशाभाई ठाकरे यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली.

2000 साली बंगारू लक्ष्मण यांची भाजप अध्यक्षपदी निवड झाली. 2001 मध्ये जन कृष्णमूर्ती यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली. २००२ मध्ये केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 2005 मध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली.  2010 साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. 2013 साली राजनाथ सिंह दुसर्‍यांदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले. यानंतर 2014 साली अमित शहा यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. ऐतिहासिक विजयानंतर 2019 असल्याने जेपी नड्डा यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे

2014 साली ऐतिहासिक विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय मिळवला. 2014 च्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने लोकसभेच्या 282 जागा जिंकल्या. अमित शहा यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले. प्रथमच पक्षाने जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर युती करून सरकार स्थापन केले. यानंतर 2019 मध्ये भाजपाने 303 जागांवर कब्जा करून इतिहास रचला.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक; पंतप्रधान मोदी सर्व मंत्र्यांशी चर्चा करणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Gas Shortage: हॉटेल-दुकानं बंद, कुठे लाकडी भट्टी सुरु; धाराशिव, सोलापूर, सातारामध्ये महत्वाचे निर्णय, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती, A टू Z माहिती
LPG Gas Shortage: हॉटेल-दुकानं बंद, कुठे लाकडी भट्टी सुरु; धाराशिव, सोलापूर, सातारामध्ये महत्वाचे निर्णय, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती, A टू Z माहिती
चांदीच्या दरानं गाठला उच्चांक, एकाच दिवसात दरात 10 हजार 400 रुपयांची वाढ, सोन्याच्या दरालाही झळाळी
चांदीच्या दरानं गाठला उच्चांक, एकाच दिवसात दरात 10 हजार 400 रुपयांची वाढ, सोन्याच्या दरालाही झळाळी
इराण इस्त्रायल युद्धाचा हॉटेल व्यवसायिकांना फटका, जाणीपूर्वक गॅसचा तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा, बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 
इराण इस्त्रायल युद्धाचा हॉटेल व्यवसायिकांना फटका, जाणीपूर्वक गॅसचा तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा, बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 
Air India Fuel Surcharge : इराण युद्धाचा फटका विमान प्रवासाला, एअर इंडियाचे तिकीट दर महागले, इंधन दरवाढीमुळे अधिभार लागू
इराण युद्धाचा फटका विमान प्रवासाला, एअर इंडियाचे तिकीट दर महागले, इंधन दरवाढीमुळे अधिभार लागू

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget