एक्स्प्लोर

पहलगामध्ये हॉटेल, गाडी मालकानं पैसा घेतला नाही, ड्रायव्हर रडला, पण दिल्ली-श्रीनगर विमान तिकीट 38 हजार; 'धर्म पुछा, जाति नही' म्हणणाऱ्यांना प्रत्यक्षदर्शी अमरेंद्र कुमार सिंहांची चपराक

कोणी म्हणत आहे 'धर्म पुछा, जाति नही'. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. लक्षात ठेवा की हजारो बचावकार्य केवळ स्थानिक पाठिंब्यामुळेच शक्य झाले आहे असे अमरेंद्र सिंह कुमार म्हणाले.

Amrendra Kumar Singh on Pahalgam Terror Attack : अवघ्या देशाचे नंदनवन असलेल्या दक्षिण जम्मू आणि काश्मीरमधील मिनि स्वित्झर्लंड ओळख असलेल्या पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश स्तब्ध होऊन गेला आहे. मात्र दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांकडून  उच्चारलेल्या शब्दांमुळे देशामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यानंतर 'धर्म पुछा, जाति नही' असे म्हणत उन्मादी प्रवृत्तींनी विखारी प्रचाराला प्रारंभ करत स्थानिक काश्मिरी लोकांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हिंदी विरुद्ध मुस्लिम असा सुद्धा रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आणि दहशतवाही हल्ल्यापासून अवघ्या 300 ते 400 मीटर दूर असलेल्या अमरेंद्र कुमार सिंह यांनी (Amrendra Kumar Singh on Pahalgam Terror Attack) या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटर पोस्टने धर्मांधाना चपराक बसली आहे. 

हॉटेलवाल्यांनी पेमेंट घेतलं नाही, गाडीवाल्यांनी पैसे घेतले नाहीत

अमरेंद्र कुमार सिंह सपत्नीक जम्मू-काश्मीर पर्यटनासाठी गेले होते आणि त्यांनी जो काही रक्तपात बैसरन व्हॅलीमध्ये झाला तो त्यांनी प्रत्यक्ष पाहिला. यानंतर त्यांनी ट्विटर पोस्ट करून एक प्रकारे  तेथील भयकंप सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक लोकांनी कशा पद्धतीने मदत केली याबाबत त्यांनी सांगितलं आहे. गिधाडं संधी शोधत असतात. मात्र ज्या ठिकाणी हॉटेलवाल्यांनी पेमेंट घेतलं नाही, गाडीवाल्यांनी पैसे घेतले नाहीत, ड्रायव्हर सुद्धा रडत होता. जबरदस्ती केल्यानंतर त्याने टिप्स घेतली. मात्र, त्याचवेळी श्रीनगर ते दिल्ली विमान तिकीट 38 हजार झालं होतं, अशा शब्दात त्यांनी आपली संताप व्यक्त केला. दहशतवादी दहशतवाद्यांविरुद्धची लढाई सुरूच राहिली पाहिजे आणि संपूर्ण राष्ट्राने यामध्ये एकजूट राहिले पाहिजे असे अमरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. 

अमरेंद्र सिंह यांनी काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?

पहलगाममध्ये काल मृत्युमुखी पडलेल्या सर्व मृतांना विनम्र श्रद्धांजली आणि देव त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. "देव ज्याचे रक्षण करतो, त्याला कोणीही इजा करू शकत नाही" हे ऐकून आनंद होतोच, पण मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांबद्दल प्रचंड दुःख आणि रागही आहे, ज्यात किमान तीन घोडे मालकांचा समावेश आहे. घटनास्थळापासून फक्त 300 ते 400 मीटर अंतरावर मी आणि मोना घोड्यावर होतो. अचानक गोळ्यांचा आवाज आणि लोक पळून जाण्याचा आवाज पाहून आम्हाला लगेच कळले आणि आमचा जीव धोक्यात घालून आमचा घोडेस्वार आम्हाला घेऊन पळून गेला. मग मी पहलगाममध्येच असलेल्या हॉटेलमध्ये परत आलो. दौरा काल सुरू झाला आणि हे सर्व पहिल्याच दिवशी घडले. मग आम्ही भविष्यातील सर्व कार्यक्रम सोडून आजचे तिकीट घेतले आणि परत येत आहोत. फ्लाईट संध्याकाळची आहे आणि आम्ही नुकतेच विमानतळावर पोहोचलो आहोत.

कोणत्याही सुरक्षा दलातील एकही जवान तिथे तैनात नव्हता

तुम्हाला विनंती आहे की तुम्ही दिशाभूल करू नका, मी बातम्यांमध्ये ऐकले की रेकी करण्यात आली होती, जर तुम्हाला ते माहित असेल तर तुम्ही ते का होऊ दिले, कोणत्याही सुरक्षा दलातील एकही जवान तिथे तैनात नव्हता. बरं, आता राजकारण सुरूच राहील, कोणी म्हणत आहे 'धर्म पुछा, जाति नही'. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. जे गेले आहेत त्यांच्याबद्दल मला खूप दुःख आहे. लक्षात ठेवा की हजारो बचावकार्य केवळ स्थानिक पाठिंब्यामुळेच शक्य झाले आहे. घोडा मालक, गाडी मालक आणि हॉटेल मालक यांचे सहकार्य उत्कृष्ट होते. तथापि, गिधाडे संधी शोधत राहतात, जिथे हॉटेल मालकाने पैसे घेतले नाहीत, गाडी मालकाने पैसे घेतले नाहीत, ड्रायव्हरने रडून मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मला टिप्स मिळाल्या, तर मला रु. श्रीनगर ते दिल्ली दोन तिकिटांसाठी 38,000. दहशतवादी आणि दहशतवाद्यांविरुद्धची लढाई सुरूच राहिली पाहिजे आणि संपूर्ण राष्ट्राने यामध्ये एकजूट राहिले पाहिजे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Priyanka Gandhi : धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, प्रियांका गांधी यांची ठाम मागणी, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनाचं कारण सांगितलं...
काँग्रेसनं मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन का केलं? दिल्ली पोलिसांनी सुटका करताच प्रियांका गांधी यांनी कारण सांगितलं
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget