एक्स्प्लोर

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक असलेली भाजप बिहारमध्ये इतकी उदार का?

बिहारमध्ये भाजप इतकी उदारता दाखवतेय की जागा जास्त आल्या तरी मुख्यमंत्रीपद नितीशकुमार यांच्याकडेच राहील. पण मग याच मुख्यमंत्रीपदाच्या हट्ट्टावरुन त्यांनी महाराष्ट्रासारखं राज्य का गमावलं.

नवी दिल्ली : बिहार निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी एका खासगी वाहिनीला मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एक महत्वाचं विधान केलंय. यासह महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरही त्यांनी टिपण्णी केलीय. बिहारमध्ये भाजपच्या जास्त जागा आल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमारच असणार आहेत असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

कारण बिहारमध्ये नेमकं कोण कुणाशी लढतंय हे कळत नाहीय. वरुन युती एका पक्षाशी आणि जास्त जागा पटकावण्यासाठी आतून दुसऱ्याच पक्षाशी संधान अशी काहीशी स्थिती आहे. म्हणजे भाजप आणि नितीशकुमार एकत्र लढतायत. पण आत्तापर्यंत त्यांच्यासोबत असलेले चिराग पासवान हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवतायत. चिराग यांचे बहुतांश उमेदवार हे जेडीयूविरोधातच आहेत. सगळी रस्सीखेंच मुख्यमंत्रीपदासाठी दिसतेय त्याचवेळी शाहांचं हे वक्तव्य आलं.

अमित शाहांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेला हसावं की रडावं हे कळत नसेल. कारण बिहारमध्ये भाजप इतकी उदारता दाखवतेय की जागा जास्त आल्या तरी मुख्यमंत्रीपद नितीशकुमार यांच्याकडेच राहील. पण मग याच मुख्यमंत्रीपदाच्या हट्ट्टावरुन त्यांनी महाराष्ट्रासारखं राज्य का गमावलं. तिथे अगदी मुख्यमंत्रीपद वाटून द्यायलाही भाजप तयार नव्हती. बिहारपेक्षा महाराष्ट्र हे कितीतरी महत्वाचं राज्य आहे. आर्थिक रसद इथून मोठी मिळते. त्यामुळेच भाजपच्या वागण्यातला हा फरक नेमका कशामुळे असा प्रश्न उपस्थित होतो.

राज्यपालांनी ते शब्द टाळायला हवे होते : गृहमंत्री अमित शाह

महाराष्ट्रात भाजपच्या जागा शिवसेनेच्या जवळपास दुप्पट आल्या ही गोष्ट खरी आहे. बिहारमध्ये हा फरक तितका नसेलही कदाचित. पण प्रश्न केवळ मुख्यमंत्रीपदाचा नव्हता तर शिवसेनेचा इगो शांत करण्याचा होता. भाजप हायकमांडनं महाराष्ट्राच्या बाबतीत तोही प्रयत्न फारसा केला नाही. खऱंतर शिवसेना हा एनडीएतला सर्वात जुना पक्ष. नितीशकुमार तर 2014 लाही मोदींच्या थेट विरोधात होते. त्यामुळे भाजपच्या या मैत्रीमागची समीकरणं काय असा प्रश्न उपस्थित होतो. त्यातही आत्तापर्यंत बिहारमध्ये भाजपचा एकदाही मुख्यमंत्री बनलेला नाहीय. त्यामुळे यावेळी ती संधी आली तरी सोडू नये अशी अनेक नेते, कार्यकर्त्यांची इच्छा दिसतेय. पण बाकीच्या राज्यांत शत प्रतिशत भाजपचा नारा देणारे शाह बिहारमध्ये मात्र इतकी मवाळ भूमिका का घेतायत.

बिहारमें कुछ भी हो सकता है असं मत अनेक स्थानिक पत्रकार व्यक्त करतायत. म्हणजे नितीशकुमार आरजेडी एकत्र येऊ शकतात. चिराग पासवान आणि भाजपचं सरकार बनवू शकतात. आरजेडी आणि काँग्रेसच्या सरकारला कुणी बाहेरुन पाठिंबाही देऊ शकतं. पण नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री बनतील का याबद्दल अनेकांना साशंकता वाटतेय. त्याचेवळी अमित शाहा यांनी हे ठासून सांगणं याचं अनेकांना आश्चर्य वाटतं.

याच मुलाखतीत अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या त्या वादग्रस्त पत्रावरही आपली नापसंती दर्शवली. या पत्राची भाषा योग्य नव्हती असं त्यांनी थेट म्हटलं आहे. हाथरस प्रकरणात यूपी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना शाहांनी मात्र एकप्रकारे योगींची पाठराखण केली. हा सगळा स्थानिक पातळीवरचा दोष असल्याचं सांगितलं.

अमित शाह हे आक्रमक शैलीबद्दल प्रसिद्ध आहेत. जिथे भाजप सर्वाधिक जागा असलेला पक्ष नाहीय, तिथेही त्यांनी भाजपचा मुख्यमंत्री याआधी बसवलेला आहे. तेच अमित शाह आज बिहारमध्ये आमच्या जागा जास्त आल्या तरी मुख्यमंत्री नितीशच असं म्हणतात हे पचनी पडायला कठीण आहे. आता हा महाराष्ट्रात हात पोळल्यानंतरचा धडा की नितीशकुमारांना राष्ट्रीय राजकारणात येऊ न देण्यासाठी राज्यातच कैद करण्यासाठीची चाल हे लवकरच कळेल. पण बिहारची खरी लढाई निवडणुकीच्या निकालानंतरच रंगणार हे मात्र त्यातून स्पष्ट होतंय.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget